Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अनेक पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवण्याची धमकीचा मेल; छत्रपती संभाजीनगरसह नागपूर नंदुरबार, बीड अन् धुळ्यात खळबळ
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नाशिक सत्र न्यायालयात खरातविरोधात सुनावणी पार पडली....More
हिंगोली चे पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवण्याची धमकी
ईमेलवर धमकी मिळाल्याने तत्काळ सर्वाधिकारी कर्मचारी बाहेर काढत पोस्ट ऑफिस खाली करत सर्व नागरिकांना बाहेर काढलं
आता घटनास्थळी डॉग्स कोड आणि बॉम्ब शोधक पथक दाखल
अज्ञात व्यक्तीने उडवण्याची धमकी दिल्याने पोस्ट ऑफिस परिसरात पोलिसांचा फौज फाटा दाखल
बॉम्बशोधक पथक आणि डॉग्सच्या साह्याने संपूर्ण कार्यालयाची छान बिन सुरू
सातारा जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणी एसपी तुषार जोशींच्या निलंबनावर शिवसेना ठाम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत आज सभागृहात काय घोषणा करतात याकडे शिवसेनेचे लक्ष
निलंबन मागे घेतल्यास शिवसेनेकडून तीव्र नाराजी नोंदवण्याची शक्यता
या टोकाचे वादातून मंत्री किंवा आमदार राजिनामाअस्त्र बाहेर काढणार का याकडे लक्ष
या निवडणूकीत पोलिस चुकीच्या पद्धतीने वागल्याचा आरोप सत्ताधारी मंत्र्यांनी केला होता
बीड मधील मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याचा मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देताच डॉग स्कॉटसह बॉम्बशोधक पथक पोस्ट ऑफिस कार्यालयात दाखल झाले. या पथकाकडून तपासणी सुरू आहे. सदरील मेल प्राप्त होताच पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणच्या नागरिकांना बाहेर काढल आहे. घटनेची माहिती बाहेर कळताच नागरिकांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाबाहेर गर्दी केली. दरम्यान हा मेल नेमका कोणी केला? या मागचा नेमका उद्देश काय? याचा तपास यंत्रणेच्या माध्यमातून केला जातोय.
नंदुरबार पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट ऑफिस आरडीएक्स बॉम्बने उडवण्याची धमकी असलेला मेल आला आहे
नागपूर कार्यालयाला मेल आला असून राज्यातील सर्वे पासपोर्ट ऑफिस आणि पोस्ट ऑफिस उडवून देण्याची मेल आला होता....
विभागीय कार्यालयातून माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोस्ट ऑफिस खाली करण्यात आलं आहे....
राज्यातील सर्व टपाल कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालय दुपारी बारा वाजून दहा मिनिटाला उडवून देण्यात येणार असल्याचा मेल आला आहे.....
माहिती मिळाल्यानंतर तातडीने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे....
विभागीय कार्यालयाकडून माहिती मिळाल्यानंतर तातडीने टपाल कार्यालय रिकामे करण्यात आलं आहे.....
महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात कठोर कारवाई करावी यासाठी आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने रायगडच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अंनिसचे राज्य समन्वयक नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . याप्रकरणाचा सखोल आणि निःपक्षपाती तपास व्हावा, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच पीडित महिलांना पूर्ण संरक्षण मिळावे, अशोक खरात याला पाठबळ देणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तींवर देखील कारवाई करावी अशी मागणी यावेळी या संघटनेकडून करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी अंनिसने या भोंदू बाबाविरोधात आंदोलन सुरू केलं होतं मात्र यंत्रणांना हाताशी धरून त्याने आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले जर तेंव्हाच कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती, असं अंनिसचे नितीन राऊत म्हणालेत.
स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये प्रत्येक गुरुवारी मांस विक्री राहणार बंद
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अक्कलकोट नगरीमध्ये नगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद ठेवण्याचा नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
स्वामीभक्त आणि अक्कलकोट वासियांकडून अक्कलकोट नगरपरिषदेच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करण्यात येतंय
गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी भक्तांकडून होत असलेली मागणी अखेर पूर्ण
सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याला वाढती मागणी; कुलाब्यात संस्थांचा पुढाकार; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर
मलजल प्रक्रिया केंद्रातील ३७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पातून १० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर
पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री प्रक्रिया केलेले पाणी प्रति हजार लिटर हे १५ रुपये दराने विकणार
कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रिया केलेले सांडपाण्याची खरेदी करण्यासाठी कंपन्या पुढे सरसावल्या
मुंबई मलनिःसारण प्रकल्प भाग २ अंतर्गत कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्राचे काम २०२० मध्ये पूर्ण
कुलाबा मलजल प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या पाण्यावर प्रति किलो लिटर १२ रुपये खर्च
मात्र महापालिका प्रति किलोलीटर अर्थात एक हजार लिटर पाण्यासाठी १५ रुपये दर आकारणार
कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रिया केलेले सांडपाण्याच्या खरेदीसाठी एस. आर. एंटरप्राजेस ही संस्था सरसावली
एस.आर. एंटरप्राइजेस महिला बचत गटाने या केंद्रातून सुमारे ३० लाख लिटर प्रतिदिन इतके प्रक्रिया केलेले पाणी खरेदी करण्याची तयारी दर्शवलीये
* एसआयटी पथकातील अधिकारी नाशिक क्राईम ब्रँच युनिट एकच्या कार्यालयात दाखल...
* एसआयटी कडून तपासाबाबत घेतली जात आहे क्राइम ब्रांच कडून माहिती...
* अशोक खरात वर आत्तापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल...
* एसआयटी आणि नाशिक पोलीस संयुक्तपणे करत आहे गुन्ह्यांचा तपास ...
- आज पुन्हा भोंदू अशोक खराची एसआयटी कडून चौकशी सुरू
चंद्रपूर : सरपण गोळा करायला जंगलात गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू... नागभीड तालुक्यातील सावर्ला जंगल परिसरातील आज सकाळची घटना, प्रमिला अरुण वाडगुरे (वय ४६, रा. तळोधी बाळापुर) असं मृतक महिलेचं नाव, आज सकाळी प्रमिला वाडगुरे या नेहमीप्रमाणे इतर पाच ते सहा महिलांसोबत जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सर्व महिलांनी काड्या जमा करून परतीची तयारी सुरू केली होती. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. तसेच वन विभागाला तात्काळ कळविण्यात आले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Crime News : नाशिकच्या मालेगावात मागील भांडणाची कुरापत काढून सात ते जणांच्या टोळक्याने एकावर लाठ्या - काठ्या, कोयता, तलवारीने सपासप वार करून ठार केले.मारहाणीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.सलीम शेख असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.मालेगावच्या अख्तराबाद भागातून सलीम शेख जात असताना सहा ते सात जणांनी त्याचा पाठलाग करून निर्दयीपणे त्याच्यावर वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता..मृत सलीम शेख याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हल्लेखोराविरुद्ध पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे..
कॅप्टन खरातवर प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावलांचा काढता पाय
पर्यटन मंत्री असताना जयकुमार रावलांकडून कॅप्टन खरातला निधी
खरातच्या संस्थानाला दीड कोटींचा निधी दिला होता
खरात प्रकरणावर प्रश्न विचारताच मंत्री रावल विधीमंडळ पायऱ्यांवरून धावले
भोंदूबाबा अशोक खरातने ज्या ठिकाणी विकृतीचा कळस गाठला, त्याचं बांधकाम हे सरकारी खर्चातून झालं. धक्कादायक म्हणजे पर्यटनाचा निधी मंदिरासाठी दिल्याचा आरोप करत खरात सरकार पुरस्कृत बाबा आहे. असा दावा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभारांनी केलाय. नाशिकच्या मिरगावमधील श्री सिद्धेश्वर इशानेश्वर देवस्थानला 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पर्यटन विभागाने 31 मार्च 2018ला हा निर्णय घेतला आणि त्या वर्षी 25 लाखांचा निधी देण्यात ही आला. हे काम मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचं असं त्यात नमूद आहे. असा दावा करत कुंभारांनी पुरावे सादर केलेत. म्हणजे ज्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींचं शोषण झालं, त्यासाठी सरकारने निधी पुरवला. असा आरोप करत सरकार खरातवर कशी खैरात करत होतं, हे कुंभारांनी पुराव्यानिशी मांडण्याचा प्रयत्न केला.
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणातलं पुणे कनेक्शन समोर
अशोक खरात यांचे आर्थिक गणित सांभाळणारा चार्टर्ड अकाउंटंट ललित पोफळे यांचा पुण्यात कार्यालय
पुण्यातील स्वारगेट परिसरात त्यांच कार्यालय आहे
ललित पोफळे हे पाच वर्ष अशोक खरात यांच्या सोबत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम पहायचे
ललित पोफळे ट्रस्टवर देखील होते
आता ललित पोकळे अशोक खरात यांच्या ट्रस्टवर नाहीत मात्र पाच वर्ष कुठे कुठे जमिनीचे व्यवहार आणि आर्थिक व्यवहार केले याची सगळी माहिती CA यांच्याकडे असल्याची माहिती.
एस आय टी आणि नाशिक पोलीस या चार्टर्ड अकाउंटंट ची चौकशी करणार का?
भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी मंजूर...
भोंदू अशोक खरातवर महायुती सरकारची देखील मेहरबानी,२०१८ चा GR आला समोर...
तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर...
सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते काम पूर्ण...
सभामंडप बांधकाम ,पेव्हर ब्लॉक बसवणे,महिला व पुरुष प्रसाधनगृह , चेंजिंग रूम,भक्तनिवास बांधकाम ,विद्युतीकरण व लैंडस्केपिंग करता निधी मंजूर केल्याची बाब उघडकीस...
31 मार्च 2018 रोजी काढण्यात आला जी आर...
मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
मेहतांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने स्वीकारण्यात आल्याचा दावा नयना वसानी यांनी केला होता
मात्र हा दावा त्या सिद्ध करू न शकल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा
उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रात त्यांच्या विरोधात दाखल फौजदारी गुन्ह्यांसह सरकारी थकबाकी, त्यांच्या नावे असलेले शेअर्स तसेच उत्पन्नाच्या स्त्रोतांची माहिती न दिल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप होता
दोन गुन्ह्यातील एक गुन्हा हा अदखलपात्र तर दुसऱ्या गुन्ह्यात ए समरी रिपोर्ट दाखल करण्यात आल्याचा तसेच आरोप निश्चित करण्यात करण्यात आले नसल्याचा दावा मेहतांच्या वकिलांकडून करण्यात आला होता
* एसआयटीची इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक गावी झाडाझडती
- गावातील एका व्यक्तीची चौकशी केल्याची सूत्रांची माहिती
* भोंदू अशोक खरात याच ठिकाणाहून काळी जादू आणि पूजा विधीसाठी लागणारे सामान आणत असल्याचा एसआयटीला संशय...
* भोंदू अशोक खरातला गंडे-दोरे व अंगठ्या पुरवला गेल्याचा देखील संशय
* एसआयटीने घटनास्थळी जात केली सखोल चौकशी...
बीडच्या परळी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या सूर्यकांत मुंडे यांना सायबर भामट्याने 23 लाख 42 हजार रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सूर्यकांत मुंडे यांना 5 मार्च रोजी एका व्यक्तीने फोन करत तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे असे सांगत रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नावाने नोटीस पाठवली तसेच स्वतः सीबीआय पोलीस असल्याचे भासवले यासाठी त्या व्यक्तीने मुंडे यांना व्हिडिओ कॉल देखील केला होता.
यानंतर त्याने वेगवेगळे कारणे सांगत काही खाते क्रमांक देत त्यावर रक्कम भरायला भाग पाडले.यानुसार दिनांक 5 ते 18 मार्चपर्यंत मुंडे यांनी तब्बल 23 लाख 42 हजार रुपये या खात्यावर भरले.यानंतर देखील त्यांना पैशाची मागणी होत असल्याने मुंडे यांनी ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. आता या प्रकरणात बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
सोलापूर महापालिकेवर जलसंपदा विभागाच्या थकबाकीमुळे दुहेरी जलसंकट ओढवलेय
महापालिकेने जलसंपदा विभागाची पाणीपट्टी थकवली असून हिप्पारगा तलावातून अतिरिक्त पाणी उपसा केल्याने ही नामुष्की ओढवलीय
त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सोलापूर शहरावर जलसंकट येणार का? अशी शक्यता वर्तवली जातेय
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिप्परगा तलावातून ठरवून दिलेल्या पाण्यापेक्षा जास्त उपसा केल्यामुळे सोलापूर मनपाला 1 कोटी 20 लाख रुपयांचा दंड करण्यात आलाय
तर दुसरीकडे टाकळी येथील पंप हाऊसची 38 कोटींची पाणीपट्टी अद्याप भरलेली नाही
त्यामुळे जलसंपदा विभागाकडून हिप्परगा आणि टाकळी हे दोन्ही पंप हाऊस सील करण्याची कारवाई सुरु केली होती
मात्र थकीत पाणीपट्टी आणि दंडासाठी सोलापूर मनपाने काही रकमेचा चेक दिल्याने सील करण्याची नामुष्की टळली आहे
अशोक खरातच्या शैक्षणिक वास्तव समोर
दहावी परीक्षेत गणितात नापास झाल्याची माहिती समोर
गुणपत्रिकेनुसार एकूण २५१ गुण, टक्केवारी सुमारे ३५.८८%
मराठीमध्ये 39 इंग्रजीत 37 गणितात 28 विज्ञानात 62 समाजशास्त्राचा 38 आणि हिंदीमध्ये 47
नाव बदलून ‘अशोककुमार’ तर कॅप्टन उपाधी लावून जहाजावर अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले असण्याची शक्यता
त्याचे खरे नाव लक्ष्मण असल्याचं समोर
सिन्नर तालुक्यातील कहांडळावडीमध्ये खरात वावी येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी
अंकशास्त्र शिकवणारा व्यक्ती स्वतःच गणितात अपयशी
दोन बिबट्यांची झाडावरील भेट ठरली चर्चेचा कारण... जंगलातील उंच झाडावर रंगली भेट
- उमरेड-पवनी-कन्हांडला अभयारण्यात नर आणि मादी बिबट एकाचवेळी उंच झाडावर पर्यटकांना दिसले
- उंच झाडावर मादी असताना खाली रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची चाहूल लागताच नर बिबटने ही झाडावर झेप घेतली..
- खाली पर्यटक असल्याने दोघेही बराच वेळ झाडावरच मुक्कामी राहिले
- अभयारण्यातील मोडक्या पुलाजवळ हा दुर्मिळ क्षण पर्यटकांना दिसून आला..
- उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात २५ ते ३० बिबट असून १३ वाघांमुळेही अभयारण्य प्रसिद्ध आहे..
१७ ते २३ मार्च दरम्यान भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसात ७६.०३ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. भंडारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं याचा प्राथमिक नजर अंदाज तयार केला आहे. लाखनी तालुक्यातील १६ गावांना या अवकाळीचा फटका बसला असून १७५ शेतकऱ्यांचं यात नुकसान झालं आहे. गहू, चना, पोपट, उडीद, जवस आणि लाखोळी या पिकांना याचा फटका बसला आहे.
गोंदियाकडून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या एका वाहनात गोवंशाची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून भंडाऱ्याच्या लाखनी पोलिसांनी सिनेस्टाईल नाकाबंदी करत एका ट्रकला थांबविले. या ट्रकची तपासणी केली असता त्यात एक जनावर मृत २२ जनावरांना क्रूरतेने बांधून त्यांची वाहतूक करीत असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी नागपूरच्या ट्रक चालक शितलसिंग राठोड (४२) ला ताब्यात घेत २२ जनावरांची सुटका करीत त्यांना गराडा येथील ध्यान फाउंडेशनमध्ये दाखल केलं. या कारवाईत ट्रक आणि जनावर असा एकूण साडेअकरा लाखांचा मुद्देमाल लाखनी पोलिसांनी ताब्यात घेतला.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अपहरण प्रकरणात अटकेत असलेल्या झेडपी सदस्य अनिल शिवाजीराव देसाई आणि संदीप नारायण मांडवे याना आज महाबळेश्वर न्यायालयाने प्रत्येकी ५०,०००/- च्या वैयक्तिक जामीन आणि तितक्याच रकमेचा हमीदार देण्याच्या अटीवर पोलिसांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले.. तसेच न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत या प्रकरणाच्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याना ''कारणे दाखवा'' नोटीस बजावण्याचे आदेश दिले. आज महाबळेश्वर न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती..काल या प्रकरणात ज्यांचे अपहरण झाले होते ते बापूसाहेब शिंदे यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेमध्ये हजर राहून माझे अपहरण झाले नसल्याचा जबाब नोंदवला होता.. यामुळे आता सातारा पोलीस कारणे दाखवा नोटिसीचे उत्तर नेमकं काय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..
आखाती देशातील युद्धामूळं पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याचा एका चुकीच्या मॅसेजमुळे रात्री भंडाऱ्याच्या ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपावर नागरिकांनी तुंबड गर्दी केली. पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करण्यासाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा सर्वत्र बघायला मिळाल्या. एवढंच नव्हे तर, अनेकांनी साठेबाजी करण्यासाठी वाहनाच्या अतिरिक्त प्लॅस्टिक कॅन भरून नेण्यात आल्या. ज्यांनी कधी त्यांच्या वाहनाची टाकी पूर्ण भरली नाही, अशांनीही त्यांच्या वाहनाची टाकी पूर्ण भरल्याचा प्रकार बघायला मिळाला. मोहाडी येथील एका पेट्रोल पंपावर महिला नायब तहसीलदार रात्री याची तपासणी करायला गेल्या असता पेट्रोल पंप धरकानं त्यांच्याशी हुज्जत घातली. यावर, नायब तहसीलदार मोहाडीकर यांनी पेट्रोल पंप चालकाला चांगलेच खडेबोल सुनावले....पेट्रोल पंप चालक आणि नायब तहसीलदार यांच्या संवादाचा व्हिडिओ आता समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होतं आहे....भंडारा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येतं आहे.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर मंदिरात खास नारळांची विशेष आरास करण्यात आली आहे.. तब्बल 17000 नारळांनी मंदिराचे सभा मंडप तसेच प्रवेशद्वार वेगळ्या पद्धतीने सजवण्यात आले आहे.. हा केवळ संख्येचा विक्रम नाही, तर या आरासामागील भावना खऱ्या अर्थाने भक्तांना भारावून टाकणारी आहे. कारण प्रत्येक नारळ लाल-पिवळ्या संकल्प धाग्याने (मौली) अत्यंत नीटपणे बांधलेला आहे, जणू प्रत्येक धागा हा एखाद्या भक्ताच्या मनातील श्रद्धेचा, संकल्पाचा आणि विश्वासाचा धागा आहे... राम नवमी उत्सव संपल्यानंतर, काही दिवसांनी हे सर्व नारळ फोडून प्रसाद स्वरूपात वाटले जाणार आहे.. म्हणजेच ही आरास केवळ डोळ्यांचे समाधान नाही, तर शेवटी भक्तांच्या हातात आशीर्वाद म्हणून पोहोचणारी आहे... नारळांची ही आरास तयार करण्यासाठी कुठेही कलावंतांची मदत घेण्यात आलेली नाही तर रामभक्तांनीच दिवस रात्र मेहनत करून ही आरास साकारली आहे...
इराण-इस्त्रायल युद्धामुळे पेट्रोल संपणार आहे अशा अफवा पसरल्याने रात्री वाहनधारकांची धांदल उडाली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास वाहनधारकांनी पेट्रोल खरेदीसाठी रांगा लावल्या. चक्क मध्यरात्री रांगेत तासनतास उभे राहत वाहनधारकांनी पेट्रोल भरून घेतलंय. या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. युद्धामुळे सध्या मोठया प्रमाणात अफवा पसरत असून त्यातून सर्वसामान्य लोक संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सध्या पेट्रोलची टंचाई होईल अशी स्थिती नसल्याचा खुलासा यापूर्वीच प्रशासनाने केलाय. मात्र प्रधानमंत्री मोदी यांच्या संसदेतील भाषणानंतर लोक साठवणूक करण्यावर भर देतायत असे दिसतंय.
जंगलाचा राजा म्हटलं की त्याची डरकाळी ऐकूनही भल्याभल्यांची बोबडी वळते. पण विचार करा, रात्रीच्या किर्रर्र अंधारात तुम्ही गाडीनं जात आहात आणि अचानक हेडलाईटच्या उजेडात साक्षात वाघोबा समोर प्रकट झाले तर? असाच काहीसा काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चोरखमारा मार्गावर घडला आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाणाऱ्या एका वाहनधारकासमोर अचानक वाघ आला. वाघ समोर दिसताच वाहनधारकाची पाचावर धारण बसली. मात्र, वाघोबा कोणत्याही आक्रमक पवित्र्यात नव्हते. उलट, त्यांनी अगदी निवांतपणे वाहनाचा मार्ग रोखून धरला आणि थेट रस्त्यावरच लोळण घेतली. जणू काही पूर्ण रस्ता त्यांचाच आहे, अशा थाटात वाघाने तिथेच आळस दिला. काही वेळ रस्त्यावर आपला मुक्काम ठोकल्यानंतर, वाघोबानं स्वतःहून रस्ता मोकळा करून दिला आणि संथ गतीनं जंगलाच्या दिशेनं प्रस्थान केलं. या संपूर्ण घटनेचा थरार वाहनधारकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं असून सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे....
- नाशिक गंगापूर रोड गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल आणि निकटवर्तीय मामा राजवाडे यांना जामीन मंजूर...
- अजय बागुल मामा राजवाडे यांच्यासह पाच जणांना हायकोर्टातून जामीन मंजूर...
- बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे हे ठाकरे सेनेच्या महानगरप्रमुख पदावर असताना त्यांनी भाजपमध्ये केला होता पक्ष प्रवेश...
- नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मोहीम राबवत केली होती राजकीय हितसंबंध असलेल्यांवर कारवाई...
- अजय बागुल आणि मामा राजवाडे यांच्यासह पाच जणांना हायकोर्टातून जामीन मंजूर झाल्याने त्यांची होणार तब्बल सहा महिन्यानंतर न्यायालयीन कोठडीत सुटका...
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत
मुंबईतील उप जिल्हाधिकाऱ्यांची पहिली बदली
प्रतिनियुक्ती सम्पूष्टात आणून मंत्रालयात बदली
अभिजित भांडे पाटील उप जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिककर झोपडपट्टी पुनर्वसन यांची एकतर्फी प्रतिनियुक्ती सम्पूष्टात
खरातच्या मुली सोबत पत्नीच्या नावे जमिनीत गुंतवणूक भोवली
खरातशी सबंधित इतर महसूल अधिकारीचे धाबे दणाणले
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अनेक पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवण्याची धमकीचा मेल; छत्रपती संभाजीनगरसह नागपूर नंदुरबार, बीड अन् धुळ्यात खळबळ