Maharashtra Live Blog Updates: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: मुंब्रा येथील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद चांगलाच पेटला आहे. विजयानंतर सहरने केलेल्या भाषणात, संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवण्याचं आवाहन केलं होतं. तिच्या...More
बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडलीय. स्कूल व्हॅनमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मागील १६ महिन्यांपासून पगार थकले असून याविरोधात कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पगार न मिळाल्याने अनेक शिक्षक शाळा सोडून जात आहेत, तर नव्याने नियुक्त शिक्षकांनाही वेतन मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तात्काळ पगार न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
बोरीवलीतील एक्सर गाव परिसरात मराठी महिलेच्या तक्रारीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. अमराठी लेडीज टेलरकडून शिवीगाळ व धमक्यांचा आरोप करत वैशाली म्हात्रे यांनी मनसे शाखेत धाव घेतली होती. घटनेच्या वेळी उपस्थित असल्याच्या कारणावरून मनसेचे किरण नकाशे व विजय पाटील यांच्यावर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मराठी माणसाची बाजू घेणे गुन्हा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी एअरपोर्ट रोडवरील शांती होंडा रोड क्रमांक १ येथे मुख्य पिण्याच्या पाण्याची लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. संपूर्ण रस्त्यावर पाणी साचून परिसराला नदी-नाल्याचे स्वरूप आले आहे. तक्रारी करूनही महापालिकेचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भिवंडी महानगरपालिकेत भाजपने २२ जागा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला असतानाच, पुढील राजकीय गणिते जुळवण्यासाठी भाजपने हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने गटनेते पदाची निवड तसेच मॅजिक आकड्यांचे नियोजन करण्यासाठी भिवंडी येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत गटनेते पदासाठी इच्छुक उमेदवारांवर सविस्तर चर्चा झाली. यशवंत टावरे, प्रकाश टावरे, संतोष शेट्टी, नारायण चौधरी, सुमित पाटील आणि वैभव भोईर ही नावे गटनेते पदासाठी समोर आली असून, ही सर्व नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जाणार आहेत. त्यानंतर प्रदेश पातळीवरून निर्णय घेऊन गटनेत्याची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
मनोज जरांगे यांनी घातपाताच्या कटाचा आरोप केलेला कांचन साळवी यांना औरंगाबाद हायकोर्टातून जामीन.
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जीवे मारण्याची सुपारी आरोप केला होता , कांचन साळवी हा द्या धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता..
आज या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली या नंतर कोर्टाने कांचन साळवी याला जामीन मंजूर केला...
कारच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, सी सी टिव्ही मध्ये घटना कैद
काळीज पिळवटून टाकणारी पुण्यातील घटना समोर
पुण्यातील लोणी काळभोर मध्ये झालेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणी काळभोर भागातील एका सोसायटी मध्ये पाच वर्षीय मुलगा हा त्याच्या सायकल वर सोसायटीच्या पार्किंग मध्ये खेळत होता
अचानक त्याच ठिकाणाहून जात असलेल्या कारच्या समोर आल्यामुळे आणि चालकाला तो समोर न दिसल्यामुळे कार ची त्याला धडक बसली. गाडीचा वेग अत्यंत कमी असला तरी सुद्धा वाहनाची धडक बसली आणि यात त्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महाड मधील राडा प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या शिवसेनेच्या विकास गोगावले यांच्यासह अन्य 7 जणांनी आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. विकास गोगावले यांनी आज सकाळी महाड पोलिस ठाण्यात स्वतःला आत्मसमर्पण करत कोर्टाच्या आदेशाचे पालन केल्याचे बघायला मिळतंय मात्र परस्पर विरोधात गुन्हे दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या नाना जगताप, श्रीयस जगताप, धनंजय देशमुख, निलेश महाडिक, सुशांत जाबरे यांच्यासह अन्य. आरोपींना देखील पोलिसांनी अटक कराव अस मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधी अटक होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाड नगर पालिका निवडणूक राडा प्रकरण अपडेट
मंत्रीपुत्र विकास गोगावले यांचे महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण
विकास गोगावले महाड शहर पोलिसांसमोर हजर
मागील दीड महिन्यांपासून विकास गोगावले आणि अन्य आरोपी होते फरार
काल न्यायालयाने विकास गोगावले यांना शरण येण्याचे दिले होते आदेश
महाड पोलीस ठाण्यात हजर झालेल्या आरोपींची पुढील प्रमाणे नावे
विकास गोगावले
महेश गोगावले
विजय मालूसरे
रत्नागिरी- पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवाराचे निधन
आपचे उमेदवार सुजीत सुर्वे यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन
संमगेश्वर तालुक्यातील पंचायत समितीच्या धामणी गणातून होते उमेदवार
संगमेश्वर तहसिल कार्यालयाच्या बाहेरच आला त्यांना हृदयविकाराचा झटका
सजीत सुर्वे यांच्या सुचकाकडून उमेदवारी अर्ज मागे, त्यामुळे धामणी गणात निवडणुक होणार कि नाही याचा आज निवडणूक निर्णय अधिकारी देणार फैसला
महाड नगरनपरिषद निवडणुकीदरम्यान मारहाण प्रकरण
मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यावरुन राज्य सरकारवर कठोर शब्दात ताशेरे
विकास गोगावले फरार असल्यावरुन उच्च न्यायालयाचे ताशेरे
मंत्र्यांची मुलं सापडत कशी नाहीत यावरुन न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त
विकास गोगावले यांना आज सकाळी ११ वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले आहेत
थोड्याच वेळात कोर्टात सुनावणी पार पडणार
महाड मारहाण प्रकरणी मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे सुपुत्र विकास गोगावले (Vikas Gogawale) आज महाड पोलिसांसमोर शरण झाले आहेत. 2 डिसेंबर 2025 पासून आजपर्यंत विकास गोगावले फरार होते.
रत्नागिरीत शिंदेच्या शिवसेनेतुन पहिली बंडखोरी....
कोकरे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी नाकारलेल्या किशोर घाग यांनी अपक्ष फॉर्म भरला.
उमेदवारीचा शब्द देऊन उदय सामंत आणि सदानंद चव्हाण यांनी शब्द फिरवल्याचा आरोप.
दोन महिन्यापूर्वी उमेदवारीचा शब्द घेऊन केला होता शिवसेनेत प्रवेश...
मात्र उमेदवारी न मिळालेल्या नाराज किशोर घाग यांनी भरला अपक्ष उमेदवारीचा अर्ज...
सर्वसाधारण आरक्षण असताना दुसऱ्याला जागा दिल्याने नाराजी.
जलसंपदा विभागाच्या कार्यालयात चक्क विजेची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयातील ही घटना असून, एका अधिकाऱ्यानं किंवा कर्मचाऱ्यानं आपली खासगी इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी चक्क कार्यालयातील वीज कनेक्शनचा गैरवापर केला आहे. MH 49 BW 8658 या क्रमांकाची टाटा टियागो EV गाडी या कार्यालयाच्या आवारात उभी करून ती कार्यालयातील इलेक्ट्रिक पॉईंटला जोडून खासगी गाडी चार्जिंग करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. "सरकारी काम आणि वैयक्तिक लाभ" अशा वृत्तीमुळं शासनाचे किती नुकसान होत आहे, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
येवला: येवला तालुक्यातील ममदापूर येथे पाण्याची मोटर सुरू करण्याहून झालेल्या वादामध्ये सासऱ्याने आपल्या सुनेलाच काठीने बेदम मारहाण केली असून सासऱ्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. बबन किसन गुडघे असे सासऱ्याचे नाव असून मनीषा दत्तू गुडघे मारहाण झालेल्या सुनेचे नाव आहे..या मारहाणीचा व्हिडिओ मनीषा गुडघे यांच्या मुलाने शूट केला असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मारहाण करणाऱ्या सासरा विरोधात संताप व्यक्त होत आहे..दरम्यान येवला तालुका पोलिसात बबन किसन गुडघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई येवला तालुका पोलीस करत आहेत...
ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित
ओबीसी आरक्षण आणि निवडणुकांसंबंधी सुनावणी २७ जानेवारीला
५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे काही जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकाही प्रलंबित
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत निवडणुकीवर स्पष्टता येण्याची शक्यता
भंडारा : पिकप वाहनांमधून वन्यप्राणी असलेल्या रानडुकराची तस्करी करणाऱ्यांना भंडारा वन विभागानं पाच जणांना अटक केली. ही कारवाई भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मार्गदर्शनात बेरोडी पुनर्वसन इथं करण्यात आली. या रानडुकरांची नागपूर इथं वाहतूक करण्यात येणार होती. तत्पूर्वी वन विभागानं सापडा रचून पिकअप वाहनासह रानडुक्कर आणि त्याची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी रानडुकरांना जंगलात सोडून त्यांना जीवदान देण्यात आलं तर, पाच जणांच्या विरोधात वन गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
- वाघांच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल
- वाघांच्या मृत्यूचे प्रकरण आता न्यायालयात
- राज्यात जानेवारीच्या पहिल्या काही दिवसात चार वाघांचा मृत्यू झाला
- 2025 सुरुवातीला अवघ्या 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू झाला होता
- या प्रकरणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांना घेतली असून याबाबत जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे
जळगाव : जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील जुना मारुती मंदिर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. सागर अरुण बिऱ्हाडे याचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले असून ढकलल्याने डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे सागरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सागरला डॉक्टरांनी मृत घोषित करतात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. यामुळे रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. तर दुसरीकडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा रुग्णालयात येऊन नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेत तपास चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडलीय. स्कूल व्हॅनमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झालाय. बदलापूर पश्चिमेकडे ही घटना घडलीय. पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केलाय. बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला.
आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केलाय.
दरम्यान हा प्रकार समजताच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला.
बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळलीय.
त्रिभाषा धोरण समितीला 4 फेब्रुवारीपर्यत आपला अहवाल सादर करावा लागणार, राज्य सरकारकडून समितीला दुसऱ्यांदा मुदतवाढ
राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी ३० जून रोजी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा धोरण समिती स्थापन करण्यात आली
इयत्ता पहिली पासून हिंदी शक्तीला विरोध राज्यघरातील विविध संघटना आणि राजकीय पक्षाने केल्यानंतर राज्यभर या समितीने दौरे करून शिक्षण तज्ञ शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी विचारवंतांची मत जाणून घेतली
त्यानंतर 19 नोव्हेंबर पर्यंत अहवाल सादर करणे अपेक्षित होतं मात्र समितीने मुदत वाढ मागितल्यानंतर पाच डिसेंबर पासून पुढे एक महिना मुदत वाढ देण्यात आली
त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितल्यानंतर आता 4 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला समितीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत
राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या बहीण-भावाच्या मोपेडला भरधाव ट्रेलरनं धडक दिली. या भीषण अपघातात बहिणीचा घटनास्थळीच चिरडून मृत्यू झाला. तर, भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शहापूरजवळ रात्रीच्या सुमारास घडला. राणू ऊर्फ अंजुम बबलू शेख (37) असं मृताचं नावं आहे. तर, आशिक अली सैय्यद (43) असं गंभीर जखमी भावाचं नाव आहे. घटनेच्या माहितीवरून जवाहरनगर पोलिसांनी पाठलाग करून ट्रेलरला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आज बाळासाहेब ठाकरेंची आज १००वी जयंती...मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमात ठाकरे बंधू येणार एकत्र...निवडणूक निकाल, केडीएमसीतल्या युतीनंतर पहिल्यांदा भेटणार...
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत गेल्या सप्टेंबर महिन्यापासून झपाट्याने वाढ होत आहे व या वाढलेल्या पाण्यामुळे लोणार सरोवरात अकराव्या व बाराव्या शतकातील अनेक प्राचीन मंदिरे ही पाण्यात बुडाली आहेत. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे लोणार सरोवराची जैवविविधता ही धोक्यात आली आहे मात्र यावर केंद्र आणि राज्य सरकारचा कुठलाही विभाग दखल घेत नसल्याने आता लोणारवासियांनी चक्क "वर्ल्ड हेरिटेज सेंटर" व "युनेस्को" ला पत्र लिहून याबाबत हस्तक्षेप करून तात्काळ लोणार सरोवर वाचवावं अशी विनंती केली आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वीच युनेस्कोने लोणार सरोवराला "रामसर दर्जा" दिलेला आहे.लोणार सरोवराचे अभ्यासक डॉ.गोपाल बच्छिरे यांनी केंद्र सरकारला ही पत्र लिहून लोणार सरोवराबाबत उपाययोजना कराव्या अन्नथा पंधरा दिवसात पंधरा ते वीस हजार लोणारवासीय हे समृद्धी महामार्ग रोखून धरतील असा इशाराही दिला आहे.
आडगाव शिवारातील डी मार्टच्या पाठीमागे असलेल्या सद्भावना पोलीस सोसायटीमध्ये राहणारे आणि ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी विजय गायकवाड हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहण्यास आहे. बुधवारी रोजी ते कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. यावेळी घरी त्यांची पत्नी, मोठा मुलगा संदीप विजय गायकवाड ३३ आणि लहान मुलगा अरविंद विजय गायकवाड ३१ हे घरी होते. दुपारच्या सुमारास संदीप हा त्याच्या आईशी भांडण करीत होता. यावेळी अरविंद याने त्याला आईशी भांडू नको असे सांगितले. याचा राग आल्याने दोघा भावांमध्ये भांडण सुरु झाले. यावेळी अरविंद याने घरातील चाकूने संदिपवर वार केला. हा वार वर्मी बसल्याने रक्तस्राव होऊन यात संदीपचा मृत्यू झाला.या घटनेनंतर आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत. संदीपला जिल्हा रुग्नालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी अरविंद गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी