Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: राज्यभरात गॅसचा तुटवडा पाहायला मिळत आहे. सोलापुरात घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या ठिकठिकाणी रांगा पाहायला मिळतायत. गॅसची उपलब्धता लक्षात घेत गॅस एजन्सीमार्फत व्यावसायिक तत्वावर पुरवण्यात येणाऱ्या सर्व...More
यंदाच्या शिक्षक भरतीत कला आणि कार्यानुभव शिक्षकांचीही भरती प्राधान्याने करावी या मागणीसाठी राज्यभरातील कला शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे...कला आणि कार्यानुभव शिक्षकांची बिंदूंनामावली स्वतंत्र करावी तसेच कला आणि कार्यानुभव शिक्षकांची जास्तीत जास्त पद भरावीत अशी मागणी शिक्षकांनी केलीये... राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलाताना कला शिक्षकांची पदभरती करू असं आश्वासन दिलं आहे मात्र किती पदे रिक्त आहेत आणि किती पदे भरली जाणार याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही, त्यामुळे कला शिक्षक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे...दरम्यान या शिक्षण व्यवस्थेबाबत जेष्ठ शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
नागपूर मुंबई महामार्गावर जळगावात हरताळा फाटा इथं एका कारने चौघांना उडवल्याची घटना घडली. राँग साइडने आलेल्या कारनं धडक दिल्यानं चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या कारला दोन नंबर प्लेट असल्याने आणि अपघातानंतर कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला असल्याने विविध तर्क वितरक लढविले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. जखमींवर उपचार सुरू आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये गॅस टंचाईचा फटका बसल्याचं समोर आलं आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा परिणाम आता महानगरपालिकेच्या कॅन्टीनवरही झाला आहे. कॅन्टीनमध्ये दररोज शेकडो कर्मचारी जेवणासाठी अवलंबून असतात. मात्र गॅसची कमतरता निर्माण झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना अडचण होऊ नये यासाठी कॅन्टीन प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. सध्या कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांवर जेवण तयार करण्यात येत असून कर्मचारी वर्गासाठी जेवणाची व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही. वारंवार मेंढपाळावर हल्ल्याच्या घटना घडत आहेत.परंतु माझे समाज बांधवांना आवाहन आहे. आपल्या हातामध्ये ढाळा पाडण्यासाठी कुऱ्हाड असते तिचा वापर जीव वाचवण्यासाठी करा.मी चितावणी देत नाही तर जबाबदारीने बोलतो आहे. पोलिसांचा धाक आरोपींवर नाही.आणि कोणी जर सामाजिक भावनेने बोलत असेल तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. माजलगाव तालुक्यात मेंढपाळ बांधवांना झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक न केल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिला. माजलगाव तालुक्यामध्ये मेंढपाळांना मारहाण केल्याची घटना घडली होती या प्रकरणात आरोपींना अटक करावी या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी माजलगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत चर्चा केली यानंतर मारहाण झालेल्या बीटे बंधूंच्या आई-वडिलांशी चर्चा देखील केली. दरम्यान यावेळी मारहाण झालेल्या बीटे यांच्या आजोबांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही तो सहन करणार नाही असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या कॅन्टीनमध्ये केवळ एकच कमर्शियल गॅस सिलेंडर शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कॅन्टीनचे कामकाज आता तात्पुरत्या स्वरूपात इलेक्ट्रिक शेगडीवर चालवले जात आहे.
महापालिकेच्या कॅन्टीनवर दररोज शेकडो कर्मचारी, अधिकारी तसेच भेट देणारे नागरिक जेवणासाठी अवलंबून असतात. मात्र गॅस पुरवठ्यातील अडचणीमुळे कॅन्टीनच्या कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसून येत असल्याची चर्चा आहे. त्याचा फटका मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनलाही बसत असल्याचे समोर येत आहे. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत इलेक्ट्रिक शेगडीच्या मदतीने कॅन्टीनची सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विधीमंडळ धमकी ई-मेल प्रकरण
पोलिसांकडून संपूर्ण विधिमंडळ परिसरात दोनदा कसून तपासणी
सकाळी ५ वाजता पासून पोलिसांकडून रुटीन तपासणी करण्यात आली होती
त्यानंतर, धमकीचा ई-मेल सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी आला होता
अशात, विधिमंडळ कार्यालयातील कर्मचारी वर्गानं ई-मेल बघितल्यानंतर पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली
सकाळी ८ः४५ मिनिटांनी दुसऱ्यांदा पुन्हा सर्च ऑपरेशन राबवण्यात आले
ज्यात, बॉम्ब आणि डॉग स्क्वॉड पथके दाखल झाली
विधिमंडळाची बहुमजली इमारत, सोबतच विधान भवनातील विधानसभा, विधान परिषद आणि सेंट्रल हॉलची देखील तपासणी पूर्ण
सोबतच, बाहेरील परिसरात देखील पोलिसांनी पूर्ण केली असून पथकं रवाना झाल्याची माहिती
दरम्यान, हॉक्स कॉल असला तरी प्रोटोकॉलनुसार तपासणी पूर्ण
तपोवनातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमींचा मोर्चा 15 ते 20 मिनीटांनी सुरू होणार आहे
मनसे नेते अमित ठाकरे मोर्चात सहभागी होणार आहेत
कुंभमेळा च्या पार्श्वभूमीवर साधुग्राम उभारणीसाठी वृक्ष तोड करण्याचा मनपा चा प्रस्ताव
मनपाच्या निर्णय ला पर्यावरण प्रेमीचा विरोध
हुतात्मा स्मारक ते मनपा मुख्यालय पर्यत निघणार मोर्चा
रायगडमधील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष नावावर शिक्कामोर्तब
भाजपचे मंगेश वाकडीकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार
भाजपकडून पत्रकाद्वारे अधिकृत घोषणा
रायगडमध्ये शेकापच्या अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या पुढाकारातून महायुती सत्तेत
तिन्ही पक्षांना अध्यक्षपद मिळणार, पहिली सव्वा वर्ष भाजप, अडीच वर्ष शिवसेना आणि अखेरची सव्वा वर्ष राष्ट्रवादी कांग्रेसकडे अध्यक्षपद असणार
मराठी माध्यम शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी बीएमसीकडून 'उपस्थिती भत्ता' देण्याचा विचार
मात्र विद्यार्थ्याला किती रक्कम दिली जाईल, याचा निर्णय अद्याप नाही
शिक्षण समितीच्या पहिल्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला
बीएमसीच्या आकडेवारीनुसार
- २०१४–१५ मध्ये ३६८ शाळांमध्ये ६३,३३५ विद्यार्थी होते,
- तर २०२३–२४ मध्ये हा आकडा ३३,७३९ इतका झाला आहे.
- म्हणजेच जवळपास ५० टक्क्यांनी पटसंख्या घटली आहे.
- या कालावधीत मराठी माध्यम शाळांची संख्या देखील ३६८ वरून २६२ इतकी कमी झालीय.
हा प्रस्ताव बीएमसीच्या मुलींसाठी असलेल्या विद्यमान उपस्थिती भत्ता योजनेच्या धर्तीवर
इयत्ता १ ते ८ मधील मुलींच्या नावाने पोस्ट खात्यात मुदतठेवी (एफडी) केल्या जातात
२०२५–२६ मध्ये १२,१४८ मुलींना १,००० ते ५,००० रुपयांपर्यंतच्या एफडी प्रमाणपत्रे देण्यात आली
सध्या या योजनेत ५,००० रुपयांपर्यंत लाभ दिला जातो.
नव्या प्रस्तावानुसार, मराठी माध्यम शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही हा भत्ता लागू होईल, आणि मुलींसाठी असलेल्या योजनेव्यतिरिक्त हा लाभ दिला जाईल.
दरम्यान, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांचं शिक्षण समितीला पत्र, पत्रातून योजनेबाबत स्पष्टता मागितली आहे. योग्य अर्थसंकल्पीय तरतूद केल्याशिवाय योजना प्रभावी ठरणार नाही असं मत व्यक्त केलय
विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ईमेल
धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधानभवन परिसरात सर्च आॅपरेशन सुरू
अधिवेशन सुरू असून अनेक मंत्री आणि व्हीआयपी या परिसरात असतात
त्यामुळे विशेष काळजीही पोलिसांनी घेतली जात असून सर्च आॅपरेशन होईपर्यंत कोणालाच आत सोडले जात नाही आहे
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार कराड येथील शासकीय विश्रामगृहात दाखल थोड्याच वेळात स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर 113 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी रवाना होणार...
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष...
मुंबईच्या ओशिवरा पोलिसांची मोठी कारवाई
अंधेरी लोखंडवाला परिसरात महिलेचा चैन चोरी करणाऱ्या सराईत चैन स्नैचर ला अवघ्या 5 तासात अटक
लोखंडवाला परिसरात वयस्कर महिला रात्री अकरा वाजता वॉक करत असताना मागून येऊन तिच्या गळ्यातील 3 टोळे ची चैन या आरोपीने चोरी फरार झाले
महिलेच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरात असलेल्या सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करत अवघ्या पाच तासांमधून आरोपीला वर्सोवा चार बंगला परिसरातून अटक केली आहे
आरोपीचे नाव राजमडी पाल वय 33 वर्ष असून ज्येष्ठ नागरिकांचा चैन स्नैचिंग करणाऱ्या सराईत आरोपी आहे
अटक आरोपीकडून महिलेचा चोरी झालेला गळेतील चैन ओशिवारा पोलिसांनी जप्त केली आहे
त्यासोबत या आरोपींने यापूर्वी आणखी किती मुंबई शहरात चैन चोरी केला आहे त्यासोबत या आरोपीचे अजून कोण मित्र आहेत का? याच्या शोध देखील ओशिवरा पोलिसांकडून सुरू आहे.
- बांधकाम व्यावसायिक मेहुल मेहता यांना डॉन छोटा शकीलच्या नावे धमकी
- धमकीसोबत लिफाफ्यात जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ
- "मेहता सुधार जा, तुझे समज मे नाही आ रहा, आज ये बार है, कल ये तेरे सिने के अंदर होगा... अल्ला हाफिज छोटा शकील.." अशी होती धमकीची चिठ्ठी..
- मॉडेल टाऊन भागातील मेहुल मेहता यांची बांधकाम साईट
- त्याच ठिकाणी वाहनाच्या नंबर प्लेटच्या इथे सापडला लिफाफा
- मेहताचा खाजगी सुरक्षा रक्षक वैभव सोमा बावकर यांच्याकडून तक्रार दाखल
- वर्सोवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल
- मेहुल मेहता यांना याआधी देखील छोटा शकीलच्या नावे धमक्या आल्याची माहिती
मुंबईत आज सकाळी अटल सेतू परिसरात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पाहायला मिळाली. समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुलाच्या काही भागांवर दाट धुके पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळच्या वेळेत वाहनचालकांना पुढील रस्ता स्पष्ट दिसण्यात काही अडचणी निर्माण झाल्या. धुक्यामुळे दृश्यता कमी झाल्याने वाहनचालकांनी वेग कमी ठेवून आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या धुक्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नसला तरी सकाळी काही काळ पुलावर वातावरण धुक्याने वेढलेले दिसून आले.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर आज विधानसभेत होणार चर्चा
विरोधकांच्या 293 च्या प्रस्तावावर होणार चर्चा
माजी मंत्री जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे आणि इतर महाविकास आघाडीचे नेते उपस्थित करणार मुद्दा
अजित पवारांच्या अपघाती निधनावरती विधानसभेत पहिल्यांदाच होणार चर्चा
रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना धरून यावरती होणार चर्चा
तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा
पर्यावरण प्रेमींच्या मोर्चात मनसे नेते अमित ठाकरे सहभागी होणार
हुतात्मा स्मारक ते महापालिका मुख्यालय पर्यंत निघणार मोर्चा
कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम उभारणीसाठी वृक्ष तोडीचा मनपाचा प्रस्ताव
वृक्षतोडी ला पर्यावरण प्रेमींचा विरोध
न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू असतानाही आज निघणार मोर्चा
अमित ठाकरे आज काय भूमिका मांडणार याकडे लक्ष
सकाळी 10 ते 10.30दरम्यान सुरू होणार मोर्चा
आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून पराभूत झालेल्या शिंदे सेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांनी विजयी झालेल्या भाजप उमेदवार माधवी पडळकर आणि निवडणूक आयोगाविरोधात विटा न्यायालयात याचिका दाखल केलीय. हुकुमशाही आणि दडपशाहीने जिल्हा परिषदेची ही निवडणूक झाल्याची तक्रार करत मोटे यांनी विटा न्यायालयात न्यायासाठी धाव घेतलीं आहे. निवडणुकीत माधवी पडळकर यांचा विजय जरी झाला असला तरी हा विजय आम्हाला मान्य नाही . मतदारांमध्ये दहशत माजवून ही निवडणूक हुकुमशाही आणि दडपशाही पद्धतीने झाली असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांनी केला आहे. याविरोधात मोटे यांनी विटा न्यायालयात माधवी पडळकर आणि निवडणूक आयोगा विरोधात याचिका दाखल केली आहे. निकालानंतर निवडणूक आयोगाविरोधात तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात निवडणूक मधील प्रकारावरून न्यायालयात याचिका दाखल करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमण्याच्या निर्णयाला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे .
नागपूर जिल्ह्यातील दवलामेटी येथे 11 फेब्रुवारी 2021 ला ग्रामपंचायत निवडणूक झाली व 10 फेब्रुवारी 2026 ला त्याची मुदत संपली.
त्यांनतर 20 फेब्रुवारीला राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने संपूर्ण राज्यात मुद्दत संपलेल्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच यांचा प्रशासक म्हणून नेमण्याचे परिपत्रक काढले.
याच निर्णयाला सिद्धार्थ धोके या याचिकाकर्त्याने नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करत सरपंचाला ग्रामपंचायतचा प्रशासक म्हणून नेमणूक करणे हा असंवैधानिक निर्णय असल्याचे असून हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली.
न्यायालयाने याची दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
इराणविरुद्धचं युद्ध लवकरच थांबवणार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य
इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही-ट्रम्प
अमेरिकेनं इराणविरुद्धचं युद्ध जिंकलंय, इराण उद्ध्वस्त - ट्र्म्प
इराणच्या ५८ जहाजांना समुद्राच्या बुडाला नेले-ट्रम्प
नागपूर -
- 2026 मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी भारतातील यात्रेकरूंना सोबत धान्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
- सौदी सरकारने जारी केलेल्या गाईड लाइन नुसार यात्रेकरूंना धान्य किंवा अन्नधान्य सोबत नेण्याची परवानगी राहणार नाही.
- मात्र भारतीय हज यात्रेकरूंना सौदी अरेबियामध्ये भारतीय पद्धतीचे भोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- यासाठी हज कमिटी ऑफ इंडिया कडून भारतीय कॅटरिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठीचा कॅटरिंग चार्ज यात्रेपूर्वी तिसऱ्या हप्त्यानंतर भरावा लागणार आहे.
- 18 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या हज यात्रेसाठी इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमान उड्डाणांबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
- 2026 च्या हज यात्रेसाठी महाराष्ट्रातून 30 हजार 144 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी वैद्यकीय कारणे आणि मृत्यूमुळे रद्द झालेल्या अर्जांनंतर 19 हजार 278 यात्रेकरूंची निवड करण्यात आली आहे.
- नागपूर एम्बार्केशन पॉईंटवरून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील सुमारे 3 हजार यात्रेकरू रवाना होणार आहेत.
- हज यात्रा 2026 संदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ईदनंतर बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
सध्या मध्यम व लागू उद्योगाला एलपीजी सिलेंडर तुटवड्याची मोठी झळ बसत आहे ..
स्टील , टेक्स्टस्टाईल, स्टाईल, प्लास्टिक सह इतर उद्योग हे पूर्णतः बंद होण्याचा मार्गावर आहे.
स्टील व पोलाद कारखान्यातील बर्निंग, रोलिंग, कटिंग, प्रोसेसिंग या प्रक्रिया ठप्प होण्याच्या स्थितीत आहे.
पर्यायायी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करणे हा पर्याय उद्योजकांकडे आहे मात्र ते पण अवघड काम आहे
आखाती युद्धाचा भंडाऱ्याच्या तांदूळ निर्यातीला मोठा फटका
भंडारा जिल्ह्यातील तांदूळ निर्यात संकटात
वाहतूक खर्च वाढल्यानं व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
भंडारा जिल्ह्यातील तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट
समुद्री मार्ग बदलल्याने ट्रान्सपोर्ट खर्चात
प्रति मेट्रिक टन २० डॉलरने वाढ
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यासंदर्भात "कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया" या गॅस वितरण कंपनीच्या सहा विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे...
त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे....
आखाती देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील पेट्रोलियम व नॅचरल गॅस विभागाने एलपीजी उत्पादन व पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे आदेश दिले असताना कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया ही कंपनी घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे...
कंपनीला निवेदन सादर करूनही काहीही परिणाम होत नसल्याचे आरोप याचिकेत करण्यात आले आहे....
मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
मुंबई मेट्रो अक्वा लाईन ३ वरील स्थानका बाहेरील परिसर ३०मीटर परिघात २४ तासासाठी नो पार्किंग झोन राहणार
मुंबई मेट्र अक्वा लाईन ३ कफपरेड ते आरे मेट्रोलाईन एकूण ३३.५ किमी असून त्यावर मेट्रोच ी २७ स्थानके आहेत
या मेट्रो स्थानकांना विविध रस्त्यांवर प्रवेश आणि निकास देण्यात आले आहेत. मात्र अनेक प्रवेशद्वार व निकासद्वारावर वाहने उभी राहत असल्याने नागरिकांची गैरसोय होते
तसेच या प्रवेशद्वार किंवा निकासद्वारावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळं वाहतुकीसाठी अडथळा होत असल्याने वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे
वाहतूक विभागाने मेट्रो स्थानकाबाहेर असलेल्या प्रवेश आणि निकासबाहेर ३० मीटर परिघात २४ तास नो पार्किंग झोनच्या घोषणा केली आहे
अप्पर पोलिस आयुक्त वाहतूक विभागाच्या डाॅक्टर प्रियांका नारनवरं यांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून हे आदेश पारित केले आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार