Maharashtra Breaking News: माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी
Maharashtra Breaking News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....

पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: विधिमंडळात रमी खेळल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलीय आहे. माणिकराव कोकाटेंकडून कृषिखात्याचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांना भरणेंकडे असलेल्या क्रीडा, युवा...More
भात पिकाची लागवड कामासाठी घेवून जाणाऱ्या महिला मजुरांचं भरधाव वाहन झाडावर आदळलं. या भीषण अपघातात वाहनात बसलेल्या २१ महिला मजूर जखमी झाल्यात. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील मासलमेटा गावाजवळ घडली. सर्व जखमींवर लाखणी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
राज्यातील गोविंदांसाठी आनंदाची बातमी
गोकुळाष्टमीनिमित्त राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण
तब्बल एक कोटी बारा लाख 50 हजार इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला
गोविंदांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पूर्वेस सरनाईक यांनी केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
राज्यातील गोविंदांसाठी आनंदाची बातमी
गोकुळाष्टमीनिमित्त राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण
तब्बल एक कोटी बारा लाख 50 हजार इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला
गोविंदांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पूर्वेस सरनाईक यांनी केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे
माझी वाटचाल पुढे चालू राहणार आहे
दत्ता मामा हे शेतकरी पुत्र आहेत त्यांना मी मदत करेल, त्यांना हे खातं सोपवल्यामुळे खात्याला न्याय मिळेल
मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी मामांची मदत करेल
मी नाराज नाही, आय एम वेरी हॅपी
मी हॅपी आहे
शेत व पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी राज्य सरकारचे मोठं पाऊल
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगट समिती गठीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी आणि त्यांचे दीर्घकालीन नियोजनबद्ध विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, या उद्दिष्टासाठी एक उच्चस्तरीय मंत्रिगट समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्त करण्यात आले असून ग्रामविकास मंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री हे सदस्य म्हणून समितीत असतील. तसेच समितीत विविध विभागांचे मंत्री आणि आमदारांचा समावेश असून, त्यात राज्यमंत्री, विधानसभेचे सदस्य आणि विधानपरिषदेचे सदस्य यांचा समावेश आहे.
या निर्णयामागील प्रमुख हेतू म्हणजे – शेतीमधील कामांसाठी व यंत्रसामग्रीच्या वापरामुळे शेतीक्षेत्रात प्रवेशासाठी चांगल्या रस्त्यांची गरज लक्षात घेऊन, शेत रस्त्यांचे मजबुतीकरण व गुणवत्ता सुधारणा करणे. यामुळे उत्पादन, वाहतूक आणि शाश्वत शेतीविकासाला चालना मिळणार आहे.
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात मोठा अपघात
एमआयडीसी परिसरात पासपोर्ट सेवा केंद्र जवळ भरधाव वेगाने जात असलेली पाण्याची टँकर एका महिलेला चिराडल्यामुळे महिलेच्या दुर्दैवी जागेवरच मृत्यू
आज सकाळी साडे अकराच्या सुमारास महिला एमआयडीसी पासपोर्ट सेवा केंद्रा जवळ एक्टिवा बाईक वर जात असताना मागून पाण्याची टॅंकर ने बाईक ला धडक दिली
यात महिला टँकरचा चाकाखाली गेली, टँकरनी चिरडल्यामुळे महिलेचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू
टँकर चालक पडून जात असताना एका बाईक चालकांनी पकडून पोलिसांचा हातात दिला आहे
सध्या या अपघातामुळे एमआयडीसी विजयनगर ला जाणारा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली
टँकर चालका विरोधात एमआयडीसी पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याचे प्रक्रिया सुरू
अपघात कशामुळे झाला या संदर्भात एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत....
मनसेचा २७ जुलै रोजीचा पुढे ढकलेला मेळावा ४ ऑगस्टला होणार
वांद्रे येथील रंगशारदा येथे मनसेचा मेळावा होणार
मेळाव्यात राज ठाकरे मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार
पक्षाची भूमिका, पक्षाची प्रतिमा, स्थानिक स्वराज्य संथ निवडणुकीसाठी लोकांपर्यंत पोहोचण्याबाबत राज ठाकरे करणार मार्गदर्शन
मालेगाव : तब्बल 17 वर्षांनी काल मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला..या निकालानंतर मालेगावकरांनी आपली शांततेची परंपरा व जातीय सलोखा अबाधित ठेवत दैनंदिन जीवनाला सुरुवात केली..मात्र, बाँबस्फोट निकालाच्या नंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणा सतर्क असून शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यास आता सुरुवात केली आहे..कालचा ठेवलेला बंदोबस्त व्यतिरिक्त आज दोन अतिरिक तुकड्या मागवून त्या अलर्ट ठेवण्यात आल्या आहे..दरम्यान, नाशिकचे ग्रामीण पोलिस जिल्हा अधीक्षक यांनी मालेगावकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे देखील नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले..
तुळजाभवानी देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातून दर्शन बंद, भाविकांना आजपासून फक्त मुखदर्शन
भवानीशंकर मंडपातून भाविकांना देवीचे मुखदर्शन
एक ते दहा ऑगस्ट दरम्यान देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील संवर्धनाच काम त्यामुळे दर्शन बंद
सिंहाच्या गाभाऱ्यातील सिंह आणि दर्शन व्यवस्थेसाठी असलेली व्यवस्था हटवली
देवीच्या नियमित असलेल्या सिंहासन पूजा आणि अभिषेकपूजा सुरळीत सुरू राहणार
मुंबई गोवा महामार्गावर अपघात
एसटी आणि टेम्पोची समोरासमोर धडक
अपघातात टेम्पो चालकाच्या पायाला गंभीर दुखापत
टेम्पो मध्ये अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू
बसच्या सहाय्याने टेम्पोच्या चेपलेल्या भागाचा पत्रा खेचून काढण्यासाठी प्रयत्न सुरू
मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे कोलेटी परिसरात घडला अपघात
अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेला सावली बारमधील ॲार्केस्ट्राचा परवाना कदम कुटुंबियांनी परत केल्याची माहिती.
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची अडचण वाढली असताना ॲार्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हाॅटेल परवाना ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे
कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला त्यासोबतचा करारनामा अगोदरच रद्द केला आहे.
गृहराज्यमंत्री कदम यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली असतानाच बचावात्मक पवित्रा घेण्याचा पवित्रा कदम यांनी घेतलाय
सावली बार आधी ॲार्केस्ट्रा परवाना असताना तिथं डान्सबार चालवत असल्यानं कारवाई झाली होती. त्यानंतर योगेश कदम यावर कारवाई करावी अशी विरोधक मागणी करत होती
सोलापुरातील नामवंत खाजगी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
19 एप्रिल ते 3 जुलैच्या दरम्यान शाळेच्या पार्किंग मध्ये प्रकार घडल्याचा पीडित मुलीचा आरोप
विनयभंग करणाऱ्या शिक्षकाने धमकावल्याने विद्यार्थिनीने कोणाकडेही केली नव्हती तक्रार
तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तु दहावीला आहे, आता तु चांगली सापडली आहेस अशा अनेक प्रकारे पीडित विद्यार्थ्यांनीला देण्यात येत होती धमक्या
मात्र खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांच्या सल्ल्याने गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवायीन मुलीचा विनयभंग केल्याने पोस्कोसह विविध कलमअन्वये गुन्हा दाखल
सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
लातूर: शंखी गोगलगायीच्या नंतर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं राहिलंय...ते आफ्रिकन गोगलगाईचं..लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकरी महादेव गोमारे यांच्या शेतात आफ्रिकन गोगलगायीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालाय...या गोगलगायींमुळे त्यांच्या दोन एकर सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे...महादेव गोमारे गेल्या दोन वर्षांपासून या समस्येला सामोरे जात आहेत...उपाययोजना करूनही प्रादुर्भाव कायम आहे आणि यामुळे ते सध्या चिंतेत आहेत...हे संकट केवळ त्यांच्यापुरतंच मर्यादित नसून, आजूबाजूच्या जवळपास दहा ते पंधरा एकर क्षेत्रात आफ्रिकन गोगलगायींचा फैलाव झालेला आहे...या गोगलगायींची वाढणारी संख्या लक्षात घेता, वेळीच उपाययोजना करणं अत्यावश्यक ठरतंय...शेतकरी गोमारे यांनी कृषी विभागाने तातडीने याकडे लक्ष द्यावं आणि प्रतिबंधक उपाय योजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.
तीन वर्षांपासून आमच्या शेतात या आफ्रिकन गोगलगायींचा त्रास सुरू आहे... औषधं वापरली, पण काही उपयोग नाही... आता सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. रात्रीतून हजारोंच्या संख्येने शेतात पसरणाऱ्या गोगलगायीवर अनेक उपाययोजना केल्या मात्र सगळे उपाय व्यर्थ आहेत असे मत व्यक्त केला आहे बाभळगाव येथील शेतकरी महादेव गोमारे यांनी..
जीशान सिद्धीकी धमकवल्या प्रकरणी एकाला अटक
मोहम्मद दिलशाद नावेद त्रिनिदाद अँड टोबॅगो येथून मुंबई विमानतळावर दाखल होताच त्याला करण्यात आली अटक
नावेद विरोधात लुक आऊट सर्क्युलर बजावण्यात आलं होत
19-21 एप्रिलच्या दरम्यान झीशान सिद्दिकी यांना डी कंपनीच्या नावावर देण्यात आल्या होत्या धमक्या
धमकीचे इमेल पाठवून १० कोटींची मागणी करण्यात आली होती
खंडणी न दिल्या वडील बाबा सिद्दिकी यांच्यासारखा शेवट करण्याची देण्यात आली होती धमकी
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचा करण्यात आला होता ईमेल मध्ये दावा
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघ हा कायमच शिवसेने सोबत राहिला आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतरही या मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात हे प्रचंड मतांनी निवडून आले. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ही सिद्धार्थ खरात मैदानात उतरले असून त्यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेले शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात उद्धव सेनेत प्रवेश घेतला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच शिंदे गटाला या मतदारसंघात मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. तर " डरो मत.... आगामी काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल..!" असा विश्वास आ. सिद्धार्थ खरात यांनी कार्यकर्त्यांना दिला.
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षात पक्ष प्रवेश करणार आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत थोरात यांचा पक्ष प्रवेश पार पडेल. दौंड तालुक्यातील वरवंड येथे अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार सोहळा पार पडेल. विधानसभा निवडणुकीच्या आधी रमेश थोरात यांनी शरद पवारांच्या पक्षांमध्ये प्रवेश केला होता. तिकीट मिळत नसल्याच्या कारणावरून विधानसभेच्या आधी अजित पवारांची साथ सोडून थोरात यांनी शरद पवारांच्या पक्षात पक्षप्रवेश केला होता. कामे होत नसल्याने पुन्हा एकदा अजित पवारांना साथ देण्याची थोरात यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा त्यामुळे थोरात आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी सात वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत थोरात यांचा पक्ष प्रवेश होईल.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली असती तरी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक होणार आहे. बीड शहरातील एका मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
20 महिन्यांपूर्वी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची क्रूर हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात अद्याप एकही आरोपी अटक नाही. न्यायाच्या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. दरम्यान काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्ञानेश्वरी मुंडे यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
मात्र तरी देखील बीडमध्ये बोलावण्यात आलेली व्यापक बैठक होणार आहे. या बैठकीत महादेव मुंडे यांचे कुटुंब देखील सहभागी होणार आहे. मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर सर्व पक्ष संघटना या बैठकीत सहभागी होणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात नऊ तपास अधिकारी बदलण्यात आले तरी देखील एकाही आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पुढील दिशा या बैठकीतून ठरवली जाणार आहे.
भंडाऱ्याचा साकोली येथील जुना शहरात असलेला मुख्य तलाव पहाटे फुटला. मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता आणि तलाव फोडण्याची शक्यता साकुलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी काही दिवसापूर्वीचं व्यक्त केली होती. मात्र, प्रशासनानं याकडं दुर्लक्ष केल्यानं आज पहाटे हा तलाव फुटला. तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वात असल्यानं परिसरामधील शेतशिवारात सध्या जलमयस्थिती निर्माण झालेली आहे. तलाव फुटल्यानं साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इटारसी–नागपूर चौथ्या मार्गिकेसह छत्रपती संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरण प्रकल्पाला मंजुरी ....विदर्भ, मराठवाडा विभागांतील रेल्वे जाळं अधिक मजबूत होणार
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Breaking News: माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी