Kabutarkhana Jain Community Dharm Sabha मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा (Dadar Kabutar Khana) प्रश्न गाजतोय. या आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज (11 ऑक्टोबर) जैन धर्मियांकडून (Jain Community) मुंबईमध्ये धर्मसभा भरविण्यात आलीय. या धर्मसभामध्ये जैनमूनी कैवल्य रत्न महाराज (Kaivalya Ratna Maharaj) बरळल्याचे दिसून आले.
कबूतर शांतता प्रिय प्राणी आहे. आमचा धर्म सांगतो, दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल. रावणासमोर जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रीराम यांनी एवढं केलं. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको आहे. मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं?, दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही, असं विधानही कैवल्य रत्न महाराज यांनी केलं. कबुतरखान्यावरुन राजकारण सुरु आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा आज धर्मसभेत आले नाही, ही सरकारची मिलीभगत आहे, असा निशाणा देखील कैवल्य रत्न महाराज (Kaivalya Ratna Maharaj) यांनी साधला.
सुरेशजी महाराज काय म्हणाले? (What did Sureshji Maharaj say?)
कबूतर हा प्राणी आहे. त्याची हत्या झाली म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखं आहे. सर्व सनातनी धर्म तुमच्यासोबत आहे. कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, ही माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, असं सुरेशजी महाराज म्हणाले.
स्वरूपानंदजी महाराज काय म्हणाले? (What did Swaroopanandji Maharaj say?)
आमच्यामध्ये एक मानलं जातं ते आमच्या प्राण्यांवर जर हल्ला झाल्यास त्याला उत्तर देतो. मग त्यामध्ये त्यांना वाचवण्यासाठी शस्त्र उचलले तरी चालतील. जे सत्तेत बसलेत त्यांना साधूसंतांनी बसवले. आम्ही घरोघरी पोहोचलो आणि प्रचार केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहे. आम्ही साधूसंत रस्त्यावर उतरू, असा इशाराही स्वरूपानंदजी महाराज यांनी दिला.
जैन धर्मियांचा सरकारला इशारा- (Jain religious leaders warn the government)
कबुतरांमुळे आजार होतो आतापर्यंत असं कधीही पुरावा आलेला नाही. प्राण्यांवरती महापालिका आयुक्त अन्याय करत आहेत. एवढ्या वर्षांपासून कबूतर खाणे असतानाही यावरती कधी प्रश्न निर्माण झाला नाही आणि आताच प्रश्न निर्माण होतोय याचा अर्थ आजूबाजूला कोणाला डेव्हलपमेंट करायची आहे त्यामुळे हा मुद्दा समोर येतोय. नवीन ठिकाणी कबूतर खाणा हलविण्यासाठी हा काही एसआरए प्रोजेक्ट आहे का? याची किंमत आगामी निवडणुकांमध्ये सरकारला मोजावी लागेल असा इशारा जैन धर्मियांनी दिला.
कैवल्य रत्न महाराज बरळले, काय म्हणाले?, VIDEO:
आणखी वाचा:
दादर कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजाचं महत्त्वाचं पाऊल, कबुतरांना खाणं घालण्यासाठी शोधली नवी जागा