Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
Rohit Pawar: आमची ही इच्छा होती आणि दादांचीही इच्छा होती की 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावे. आमची इच्छा कुणासाठी होती तर ती अजितदादांसाठी होती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून कोण, याची स्पर्धाच लागली आहे. बारामती पोटनिवडणुकीदिवशीच जय पवार (Jay Pawar) यांनी बारामती विधानसभेसाठी 2029 मध्ये कोण याची चर्चा केल्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) आणि युगेंद्र पवार यांनीही भाष्य केलं होतं. त्यामुळे, एका जागेसाठी तीन पवार मैदानात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यानंतर, जय पवार यांनी आज पुन्हा 2029 साठी बारामतीमधून सुनेत्रा पवारच उमेदवार असतील असे म्हटले. त्यासोबत, त्या मुख्यमंत्रीपदाच्या (Chief minister) उमेदवार असतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आता, त्यांच्या या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा विरोध केल्याशिवाय
आमची ही इच्छा होती आणि दादांचीही इच्छा होती की 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावे. आमची इच्छा कुणासाठी होती तर ती अजितदादांसाठी होती. अजित दादा कार्यकर्त्यांमध्ये मिसळून दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि रस्त्यावरची लढाई लढून 2029 मध्ये आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी दादांची इच्छा होती. मला असं वाटतं की, या राज्यात भाजप सोडून दुसरा कोणताही मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर भाजपला विरोध करावाच लागेल, असे म्हणत रोहित पवार यांनी जय पवार यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
जर दादांच्या शेवटच्या चार महिन्यांचे वक्तव्य बघितले तर दादा भाजपचा विरोधच करत होते. जर आपण कुणी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघत असाल तर भाजपचा विरोधच करावा लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी आणि जय पवार यांना भाजपला विरोध केल्याशिवाय मुख्यमंत्री होता येणार नाही, असे रोहित पवार यांनी सूचवले आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत व हुशार आहेत व त्यांच्यानंतर जर कोणी भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर तो सांग काम्या असेल. विरोधी पक्षाचा आणि इतर पक्षाचा मुख्यमंत्री तिथे होणार नाही, असेही रोहित पवार यांनी परखडपणे सांगितले.
काय म्हणाले जय पवार
बारामतीत 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानेही राष्ट्रवादीचे युवा नेते तथा अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभा राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे वक्तव्य जय पवार यांनी केले आहे.
हेही वाचा
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Before You Go
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न























