जळगाव:  निवडणुकीच्या (Election News) तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. जळगावमधील (Jalgaon News) पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत काल रात्री हा पक्षप्रवेश पार पडला.. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील. बुलढाण्याचे खा. प्रतापराव जाधव, माजी आ. चिमणराव पाटीला उपस्थित होते.. 


जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास 400 कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला.  यावेळी मंत्री गुलाबराव पाटील , बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते जवळपास 60 ते 70 वाहनातून बुलढाण्यात पोहोचले होते. बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश समारोहाच्या वेळी मोठी घोषणाबाजी झाली यामुळे मात्र जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का पोहोचला आहे.


 शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,  आम्ही निवडणुकीत गुंतलो असलो तरी मी दररोज सकाळी माहिती घेतो.   त्याप्रमाणे मी मुख्य सचिव , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतो . त्यांना सूचना देतो की, तात्काळ पंचनामे करा हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरूक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळेल.


भाजपचा जाहीरनामा हाच महायुतीचा जाहीरनामा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री एकनाथ शिंगे भाजपा जाहीरनाम्यावर म्हणाले, भाजपचा जाहीरनामा हाच महायुतीचा जाहीरनामा आहे. त्याच मी स्वागत करतो. गेल्या दहा वर्षात मोदींनी जे केलं या जाहीरनामा सर्वसामान्यांचं जीवन बदलणारा जाहीरनामा आहे . त्याच मी स्वागत करतो आणि मोदींना धन्यवाद देतो.


काही दिवसापूर्वी भाजपच्या माजी खासदारांनी केला ठाकरे गटात प्रवेश 


काही दिवसापूर्वी भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पवार आणि त्याचे अनेक सहकारी, पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश केला. उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटात प्रवेशामुळे जळगावची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. भाजपने जळगाव मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं. जळगाव मतदारसंघातून भाजपने ऐनवेळी उन्मेष पाटलांचा पत्ता कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याचं समोर आलं होतं.


हे ही वाचा:


नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं फोडलं, रडले आणि निवडणूक जिंकली; भाजप नेत्याचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप