Tanaji Mutkule हिंगोली : महायुतीत आसलो तरी ही युती देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या पुरती मर्यादित आहे. हिंगोलीत कधीही युती नव्हती. माझ्या चारही निवडणुकीत संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी माझं काम केलं नाही. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही काम केलेलं नाही. त्यामुळे मित्र म्हणण्याचे कारण नाही. विधानसभा निवडणुकीत संतोष बांगर यांनी स्वतः चे सुध्दा मतदान मला दिले नसल्याचाखळबळजनकदावा हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनी(Tanaji Mutkule) केलाय.
आधल्या दिवशी उद्धव ठाकरे देव आहेत, त्यांना सोडून गेल तर तुमचे लेकरं मरतील. असं म्हटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांना सोडून जातात, याचा अर्थ काय? अनेक गावात संतोष बांगर यांना '50 खोके एकदम ओके' असे म्हणत हिणवण्याचे काम नागरिकांनी केलंय. त्यांनी ते पैसे घेतले असं जनमत आणि माझही मत आहे. असेम्हणतपुन्हाएकदा आमदार तानाजी मुटकुळेंनी (Tanaji Mutkule) शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांनाडिवचलंआहे. त्यामुळे भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेतील (Shivsena) संघर्षाची मालिका हिंगोलीतही कायम असल्याचं चित्र पुन्हाएकदा बघायलामिळालं आहे.
Tanaji Mutkule on Santosh Bangar : संतोष बांगर यांना समज कमी, त्यांना काही कळत नाही
उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपशी संधान बांधल्यानंतर '50 खोके एकदम ओके' या विरोधकांच्या बोचऱ्या आरोपांनी शिंदेसेनाला अक्षरश घायाळ केलं होतं. विरोधकांच्या याच आरोपांना आता हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनीच (Tanaji Mutkule) बळ दिल्याचं दिसतंय. सत्तांतरासाठी कमळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी 50 कोटी घेतल्याचा खळबळजनक आरोप मुटकुळेंनी केला. यामुळे हिंगोलीतल्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीत वादाची नवी ठिणगी पडलीय. संतोष बांगर यांना समज कमी आहे, त्यांना कळत नाही असंही तानाजी मुटकुळे म्हणालेय.
दरम्यानबिनबुडाचेआरोप करू नये आस माझं मत आहे. कपड्यांच्या आतून सगळेच भोंगळे आहेत, त्यांच्या बाबतीत भरपूर प्रकरण आमच्याकडे आहेत. कळमनुरीचे प्रकरण, राहोलीचे प्रकरण आमच्याकडे आहेत. इतक्या खाली आम्हाला जायचं नाही. आम्ही विकासाचा राजकारण करतो. असेही तानाजी मुटकुळे म्हणाले.
Tanaji Mutkule: मी वीस कोटी रुपयांचा बंगला बांधला ते काही लपून थोडे आहे
हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी ते आरोप फेटाळले आहेत. पोलिसांनी सांगितल्यानंतर काय बाकी राहतं? पोलीस अधिकाऱ्यांनी जर सांगितलं की पोलीस पाठवलेच नाही तर माझं काय संबंध आहे. मी वीस कोटी रुपयांचा बंगला बांधला ते काही लपून थोडे आहे. 1500 एकर जमीन माझ्या आजोबाची गावी आहे. त्यामुळे मी काही भिकारी नाही. सुरुवातीपासून आम्ही जमीनदार माणसं आहोत. असेही तानाजी मुटकुळे म्हणाले.
आणखी वाचा
