Omraje Nimbalkar धाराशिव : राज्याच्याराजकारणातखळबळउडवणाऱ्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) यशस्वी झाल्यानंतरआरोप-प्रत्यारोपांनीराजकीयवातावरणतापलंआहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड घडामोडीघडतआहे. अशातच ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर काही तासांमध्येच एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील राजकारणाच्यादृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत.
Operation Tiger Eknath Shinde शिवसेनेत प्रवेश करताच धाराशिवसाठी 18 कोटींचा निधी
तरदुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच धाराशिवसाठी 18 कोटींचा निधी देण्यातआलाआहे. विविध विकास कामाच्या स्थगिती दिलेला निधीला एकनाथ शिंदेंकडून तात्काळ मंजुरी देण्यात आलीआहे. ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा व्हिडिओ देखील शेअर केलाआहे. धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध कामांसाठी हा निधी देण्यातआल्याचीमाहितीआहे. एकनाथ शिंदेंकडूनही तात्काळ मंजुरी देण्याचे आदेश देण्यातआलेआहे.
Archana Patil: कट्टर राजकीय विरोधक पाटील कुटुंबाकडून ओमराजेंचे महायुतीत स्वागत
कट्टर राजकीय विरोधक पाटील कुटुंबाकडून ओमराजेंचे महायुतीत स्वागत केले आहे. युतीने उमेदवारी दिल्यास प्रचारही करू, असे सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटीलांकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत करण्यात आले. छोटे छोटे जॅक टॉमी , बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो असा चिमटा अर्चना पाटील यांनी काढला; लोक भावनिक झाले म्हणून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याची सल त्यांनी बोलून दाखवली. आता विकासासाठी ते महायुतीत आले असतील तर त्यांना आमचं सहकार्यच असेल. अर्चना पाटलांनी २०२४ मध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.
Operation Tiger Timeline : नेमकं काय घडलं?
शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू झाल्यानंतर 16 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता हे बंडखोर खासदार दिल्लीत पोहोचल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एकनाथ शिंदे यांनी या खासदारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. या सहा खासदारांनी 17 जून रोजी सकाळी 7 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र दिल्याची माहिती आहे. त्यानंतर सहापैकी चार खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव जयपूरमधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं तर दोन खासदार इतरत्र गेल्याचं सांगितलं जातंय.
इतर महत्वाच्या बातम्या
