Devendra Fadnavis and Ajit Pawar: न लाभलेला बेस्ट मुख्यमंत्री, अजित पवारांबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस हळहळले, अख्खं सभागृह स्तब्ध!
Devendra Fadnavis :महाराष्ट्रात वसंतदादा आणि अजित दादा हे दोन दादा कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहील अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Devendra Fadnavis and Ajit Pawar: वक्तशीरपणा आणि घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या अजितदादांनी यावेळी मात्र टायमिंग चुकवलं. खऱ्या अर्थाने ज्यावेळी खूप मोठी इनिंग खेळतील असं सर्वांनाच दिसत होतं त्यावेळी मात्र अजितदादांनी (Ajit Pawar) जीवनाच्या वेळेचं टायमिंग चुकवलं. अजितदादा सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. पण अनेकवेळा ते म्हणायचे कि मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, मात्र यावेळी देखील उपमुख्यमंत्री मीच राहील, असेही ते गमतीने म्हणायचे. मात्र आज मी हक्काने म्हणू शकतो कि, 'अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड'
अजित दादांच्या रूपानं एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता, ते आता नसणार आहे. मला विश्वासही होता कि नियतीने त्यांना ती संधी दिली असती, ती समता त्यांच्यात होती. महाराष्ट्रात वसंतदादा आणि अजित दादा हे दोन दादा कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहील अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आजपासून सुरु झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. (Maharashtra Adhiveshan 2026)
Devendra Fadnavis : पोकळी या शब्दाची व्याप्ती काय असते हे आज मला कळतंय
पोकळी या शब्दाची व्याप्ती काय असते हे आज मला कळतंय, कारण असे अजित दादा पुन्हा होऊ शकत नाही. शिवाय हि पोकळीही कोणी भरून काढू शकत नाही. खऱ्या अर्थानं अजित दादांचा अकास्मात निधन हे सर्वांना धक्का देणारं आहे. सकाळी सहा वाजल्यापासून काम करणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. प्रत्येक गोष्टीचं नियोजन, सखोल अभ्यास आणि सेकंदाचाही सदुपयोग करणारा नेता म्हणून अजित दादांकडे बघितलं जायचं. ते खऱ्या अर्थानं माझे दादाच होते. 2014 नंतर आमची जावळीक झाली आणि ती जवळीक शेवटपर्यंत कायम राहिली. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis and Ajit Pawar: अजित दादांचं व्यक्तिमत्व हे केवळ एक व्यक्ती नव्हे तर एका पिढीचा विश्वास होते
अजित दादांचं व्यक्तिमत्व हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर एका पिढीचा विश्वास होते. त्यांच्या अपघाताची बातमी सर्वप्रथम आली तेव्हा असं वाटलं कि अपघात झाला असेल त्यात थोडंफार काही झालं असेल. मात्र नंतर दुसरी बातमी आली तेव्हा धक्काच बसला. मातीतून तयार झालेलं नेतृत्व अजित दादांचं होतं. ते कधीही कुणापुढे झुकले नाही. मात्र जेव्हा आपली चूक झाल्याचे लक्षात आलं तर ते जाहीर माफी मागायलाही डगमगले नाही, हे हि लक्ष्यात घेण्यासारखं होतं. अनेक टीका आणि विरोधाला समोर जावं लागलं असताना देखील त्यांनी संकटांना पाठ दाखवली नाही. त्यांच्या स्वभावात पारदर्शकता होती. शब्दाला, वेळेला जगणारा आणि एकवचनी अशी दादांची ओळख होती. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
























