Chhagan Bhujbal on NCP Merger: अजित पवार यांच्या निधनानंतर (Ajit Pawar Death) राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतच्या (NCP Merger) चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील काही नेत्यांच्या मते, 12 फेब्रुवारी रोजी अजित पवार विलिनीकरणाबाबत अधिकृत घोषणा करणार होते. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, आता या विलीनीकरणाचे पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विलिनीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही. हा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा केली जाईल, असे म्हटले. आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलंय.

Continues below advertisement

Chhagan Bhujbal on NCP Merger: विलिनीकरणाची घाई कशाला?

छगन भुजबळ म्हणाले की, रोज विलिनीकरणाची काय चर्चा आहे? विलिनीकरण करायचे तर आजही करता येईल आणि एक महिन्याने देखील करता येईल त्यात घाई करण्याचे कारण काय? सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करतोय. दोन्ही बाजूच्या लोकांकडून चर्चा होईल, मात्र घाई का करत आहात?  आधी ठरलं होतं हे म्हणण्यात अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन आले आहेत, त्यांना ठरवू द्या. माझ्या समोर कधीही हा विषय झालेला नाही. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा ताई यांना बसविणे हा माझा अजेंडा आहे. हे 100 टक्के ठरलं आहे, असे त्यांनी सांगितले. 

Chhagan Bhujbal on NCP Merger: आता कॅप्टन नेमले आहेत ते बघतील

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत इच्छा व्यक्त केली. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, मोघम बोलण्यात अर्थ नाही. आता कॅप्टन नेमले आहेत ते बघतील. आमदारांची मिटिंग घेतील. हा म्हणतो, तो म्हणतो म्हणून घाई का करत आहात? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

Continues below advertisement

Chhagan Bhujbal on Narhari Zirwal:  खरं काय, खोटं काय ते समोर येईल

राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पैसे घेताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. लाच प्रकरणाशी माझा संबंध आला तर मी राजीनामा देईन, असे वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलंय. याबात विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, बरोबरच आहे. पोलीस चौकशी करतील. खरं काय, खोटं काय ते समोर येईल. त्यांनी स्वतःच सांगितले की, माझं नाव आलं तर राजीनामा देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. 

आणखी वाचा 

Narhari Zirwal: नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण, आदिवासी संमेलनाला गेलेच नाहीत, लाचखोरी प्रकरणामुळे प्रचंड कोंडी