Chandrashekhar Bawankule: 'पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडायला हव्यात, उगाच गावागावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलू नये'; चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंना सुनावलं
Chandrashekhar Bawankule on Bacchu Kadu: गावागावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलून आपल्या भूमिका व्यक्त करू नये. असा सल्लाही शिवसेनेचे आमदार बच्चू कडू चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला आहे.

Chandrashekhar Bawankule: शिवसेनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी जाहीर इच्छा भंडाऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली आहे. आमदार कडूंच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चेला उधाण आलं असून मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचीही चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. एकंदरीत या सर्व घडामोडीवरराज्याचे महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. गावागावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलून आपल्या भूमिका व्यक्त करू नये. असा सल्लाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. (Chandrashekhar Bawankule on Bacchu Kadu)
राज्यात 51% बहुमत महायुतीला मिळाल आहे. आमचं सर्वात मजबूत सरकार असून आम्ही सर्व एकत्र आहोत. देवेंद्र फडवणीस दिल्लीत जावे, हा निर्णय करण्याचा अधिकार कोणाला नाही. देवेंद्र फडवणीस यांना महाराष्ट्राला कर्तृत्वान, विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून देशातील सर्वात अव्वल राज्य करायचे आहे. हा निर्णय देवेंद्र फडणीस यांनी घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र फडवणीस दिल्लीत जावे, हा विचार कोणी करू नये. शिवाय असे गावागावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलून आपल्या भूमिका व्यक्त करू नये. असा सल्लाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारूनच मांडायला हव्यात
प्रत्येकाला वाटतं कि आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. महायुतीमध्ये सर्व एकमत आहे आणि देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री आहेत. काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडायला पाहिजे. असं समन्वय समितीमध्ये ठरलं आहे. समन्वय समितीमध्ये ठरलेल्या गोष्टी कोणी पाळत नसेल तर त्यावर चर्चा करू. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule: सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकी मोठी कर्जमाफी
महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकी मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, एकनाथ शिंदे, सुनीत्रा पवार यांनी केली. या कर्जमाफीच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. 36 हजार कोटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करिता दिले. निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी म्हटलं होतं, ती केलेली आहे. पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी धोरण आखत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
Chandrashekhar Bawankule: नवनीत राणा कट्टर हिंदुत्ववादी, एक निवडणूक हरली म्हणजे सर्व संपलं का?
नवनीत राणा भारतीय जनता पार्टीचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्या आहे. त्या कधीही भाजपसोडून जाणार नाही. त्या हिंदुत्ववादी आहेत. जय श्रीराम, जय हनुमान म्हणत काम करत आहे. नवनीत राणा या कधीही भाजप सोडू शकत नाही. नवनीत राणा कट्टर हिंदुत्ववादी. जय श्रीराम म्हणत काम करत असतात. त्यांच्याबाबत कधी संभ्रम निर्माण करू नये. नवनीत राणा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या आहे. नवनीत राणा भाजपच्या विचाराच्या आहेत. आयुष्यभर त्या भाजपमध्ये राहतील. नवनीत राणा यांचा मानसन्मान उच्च पदावर भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. एक निवडणूक हरली म्हणजे सर्व संपलं का? नवनीत राणा यांना आजही आम्ही खासदार मानतो. त्या खासदारच्या कमी नाहीत. काही मतांनी नवनीत राणा हरल्या, त्या पुन्हा निवडून येतील. नवनीत राणा यांचा योग्यवेळी पक्ष विचार करेल. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप























