Babanrao Taywade on Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना इशारा दिला आहे. मराठ्यांवर जळणारे एवढे लोक का आहेत? आपला खरा शत्रू कोण हे कळालं. आता चिंता करायची नाही विरोध करणारा संपवायचं, असे त्यांनी म्हटले. यावरून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पलटवार केलाय.
बबनराव तायवाडे म्हणाले की, 1994 साली ओबीसी समाजाला मिळालेल्या 27 टक्के आरक्षणाला आम्ही आव्हान देऊन संपवू टाकू, हे मनोज जरांगे यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. आम्हाला मिळालेले आरक्षण हे संविधानिक आहे. आमचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी आमचा संघर्ष सुरु राहील. मनोज जरांगे आपल्या लोकांना खुश करण्यासाठी विवादास्पद वक्तव्य करत असतात, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांच्यावर केला.
Babanrao Taywade on Manoj Jarange: ...तर आम्ही काय भांडे धुवायला बसलोय का?
बबनराव तायवाडे पुढे म्हणाले की, मनोज जरांगे हे विरोध करणाऱ्यांचा गेम असे म्हणत असतील, तर आम्ही काय भांडे धुवायला बसलोय का? आमच्या मनगटात ताकद नाही का? मनोज जरांगे यांच्याकडून कोणत्याही ओबीसी नेत्यांना संपवण्याची भाषा केली जात असेल तर आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू, असे आव्हान त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे.
Babanrao Taywade on Manoj Jarange: मनोज जरांगेंवर कायदेशीर कारवाई कारवाई
मनोज जरांगे वारंवार भडकाऊ भाषण करत आहे. ओबीसी नेत्यांना संपवण्याची भाषा करत आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील बबनराव तायवाडे यांनी केली. राज्य सरकार ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करते मग मनोज जरांगेंवर का नाही? असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारची ही भेदभावपूर्वक भूमिका योग्य नसल्याची खंत देखील बनराव तायवाडे यांनी व्यक्त केली.
Manoj Jarange : काय म्हणाले होते मनोज जरांगे?
दरम्यान, ओबीसी नेत्यांची मागणी ऐकून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील संतप्त प्रतिक्रिया दिली होती. मराठ्यांवर जळणारे एवढे लोक का आहेत? बैठकीवरून यामुळे ते उघडे पडले, आपला खरा शत्रू कोण हे कळालं. आता परिणामाची चिंता करायची नाही, विरोध करणारा संपवायचा. एवढे मराठ्यांनी लक्षात घ्यावे. मराठ्यांनी मराठ्यांच्या लेकरांबाबत जी अडचण आहे ती दूर करायच्या कामाला लागायचं. जो विरोध करेल त्याला राजकीय संपवायचं, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा