Anjali Damania on Chhagan Bhujbal : फडणवीस तुम्हाला सभ्य माणसं मिळत नाही का? छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने अंजली दमानिया चिडल्या!
Anjali Damania on Chhagan Bhujbal : भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय.

Anjali Damania on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनामध्ये त्यांचा शपथविधी पार पडला. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा होती. पण, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे काही काळ ते नाराजही होते. मात्र आता भुजबळांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आता भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी संताप व्यक्त केलाय.
अंजली दमानिया म्हणाल्या की, मला जेव्हा आज कळले छगन भुजबळ यांचा शपथविधी होत आहे. तेव्हा मला खूप राग आला. भुजबळ यांच्या विरोधात मी लढले, पहिल्यांदा चीफ जस्टीस समोर उभं राहून लढले. त्यांच्यावर एफआयआर झाली, अडीच वर्षे ते जेलमध्ये होते. ते बाहेर येत असताना आम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढलो. धनंजय मुंडेंची दहशत बाहेर काढली. धनंजय मुंडे गेल्यावर परत त्या जागेवर भुजबळांवर जर तुम्ही संधी देत असाल तर असा त्रास जनतेला का देत आहात? आमच्या सारखा लोकांना त्रास देतात, जे भ्रष्टाचारा विरोधात लढत आहेत. तुम्ही आम्हाला संदेश देतात का की आमचं तुम्ही काही बिघडवू शकत नाही. मला खरा हा प्रश्न पडलाय की हा लढा पुढे चालू ठेवू की नाही? असे त्यांनी म्हटले.
छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 20, 2025
वाह फडणवीस वाह !
म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ?
असा… pic.twitter.com/dLj7MN79JE
महाराष्ट्राच्या राजकारणाची किळस वाटतेय!
दरम्यान, अंजली दमानिया यांनी ट्विट करून देखील भुजबळांवर निशाणा साधला होता. छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ? वाह फडणवीस वाह ! म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात? आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची. खालच्या घोषणा आठवतात? “भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार 400 पार”, “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम”, हा आहे का तो बडा कदम? ही ती कारवाई? असा हल्लाबोल त्यांनी केला होता.
आणखी वाचा


















