Farmer Success Story नांदेड : अर्धापूर तालुका हा प्रामुख्याने केळीसाठी प्रसिद्ध आहे. पन्नास टक्केहून अधिक शेतकरी आपल्या शेतात केळीचं उत्पादन घेत असतात. आता मात्र शेतकर्‍याचा कल केळी सोबतचं इतर फळ उत्पादनाकडे वाढला आहे. कमी खर्चात फळबाग फुलवून लाखोचं उत्पन्न मिळवत आहे. असाच काहीसा यशस्वी प्रयोग अर्धापूर (Ardhapur) तालुक्यातील युवा शेतकरी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांनी केला आहे. आपल्या पाच एकरमध्ये चिकू आणि खरबूजची लागवड करून वर्षाकाठी आठ लाख रुपयाच उत्पन्न त्यांनी मिळवले आहे. 

Continues below advertisement


संतोष देशमुख हे अर्धापूर तालुक्यातील महादेव पिपंळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना सहा एकर शेती आहे. सुरुवातीला देशमुख हे कापूस विक्रीचा व्यवसाय करायचे, मात्र त्यात त्यांना 19 लाख रुपयाचं नुकसान सोसावं लागलं. त्यानंतर त्यांनी शेतात फळबाग फुलवण्याचा निर्णय घेतला. एक एकरात चिकू फळाची बाग फुलवली. 2003 साली संतोष देशमुख यांनी सिंधुदुर्ग येथून 220 रुपये प्रति प्रमाणे चिकूची 40 रोप खरेदी केले होते. त्यांनी त्या पिकाचे मोठ्या मेहनतीने संगोपन केलं. आता याच पिकातून त्यांना दरवर्षी 40 क्विंटल चिकूचे उत्पादन होतं असते. बाजारात 30 रुपये प्रति किलो प्रमाणे त्यांना 2 लाख 40 हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या विक्रीमध्ये त्यानं एक रुपया देखील खर्च लागत नाही.


खरबूजच्या लागवडीतून लाखोच रुपयाचं उत्पन्न


संतोष देशमुख हे चिकूच्या फळबागेसह दरवर्षी आपल्या चार एकरमध्ये खरबूजची लागवड करत असतात. यातून त्यांना चांगल उत्पन्न देखील मिळतो. खरबूज लागवडीसाठी त्यांना 4 लाख 10 हजार इतकं खर्च येतो, तर त्यातून वर्षाकाठी त्यांना 11 लाख 60 हजार रुपयाचं उत्पन्न मिळत आहे. फळांना बाजारात नेहमी मागणी असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागेचा प्रयोग करावा आणि लाखोचं उत्पन्न मिळवावे, असा सल्ला युवा शेतकरी संतोष देशमुख यांनी दिला आहे.


मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी; आईने किडनी देत दिले जीवदान


नांदेड शहरालगत असलेल्या भालकी गावात आईच्या प्रेमाचा प्रत्यय देणारी घटना घडलीय, गावातील 39 वर्षीय देवानंद धाडवे या मुलांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. ही घटना कळताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले मात्र देवानंदची आई शिवगंगाने स्वतःची किडनी देऊन मुलाचा जीव वाचवलाय. छत्रपती संभाजीनगर इथे 15 एप्रिल रोजी किडनी प्रत्योरोपणाची ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून माय-लेक सुखरूप आहेत.


हे ही वाचा