नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक (Ramtek) तालुक्यातील देवलापार परिसरात वाघाच्या हल्ल्याची आणखी एक घटना घडली असून सावरा गावाजवळ शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुक्ता जोगड्या मरसकोल्हे या दुपारच्या सुमारास शेतात काम करत असताना अचानक वाघाने (Nagpur Tiger Attack) त्यांच्यावर झडप घातल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही वेळाने इतर शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली.(Nagpur Tiger Attack)

देवलापार आणि आसपासच्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली वाढल्याच्या तक्रारी होत होत्या. शेताच्या बांधावर पायांचे ठसे, जनावरांवर हल्ल्याच्या घटना यामुळे नागरिकांमध्ये आधीच भीती होती. या ताज्या घटनेनंतर दहशतीचे सावट आणखी गडद झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येत असून परिसरात कॅमेरे लावणे, पिंजरे उभारणे आणि गस्त वाढविणे यांसारख्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती आहे.(Nagpur Tiger Attack)

दरम्यान, ग्रामस्थांनी वन विभागाकडून तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना सकाळ-संध्याकाळ शेतात जाणे धोकादायक बनले असून कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना, भरपाईची तत्काळ घोषणा आणि वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

शेतात काम करताना हल्ला

मुक्ता जोगड्या मरसकोल्हे या काल दुपारी अंदाजे शेतात काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली. देवलापार आणि आसपासच्या भागात मागील काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली वाढल्या असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. या ताज्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे सावट आणखी गडद झाले आहे. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, नागरिकांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.