एक्स्प्लोर

MNS Nagpur : विदर्भातील कार्यकर्त्यांच्या प्रश्नांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची गोची

विदर्भात कोण जिंकले, पराभूत झाले याची साधी विचारणाही पक्षाने केली नाही. मुंबई, पुणे आणि नाशिक हीच शहरे मनसेच्या अजेंड्यावर होती. विदर्भात कोणीच लक्ष घातले नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

नागपूर : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत (Shivsena) पडलेली फूट आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबतच्या राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्यात (State Politics) पक्षाच्या विस्ताराच्या तयारीत मनसे असून विदर्भात पक्षाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns raj thackeray) अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज नागपुरात (Nagpur) आगमन झाले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर जल्लोषात त्यांचे स्वागत केले. गेल्या तीन दिवसांपासून राज ठाकरेंचे विश्‍वासू संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि राजू उंबरकर दौऱ्याच्या तयारीसाठी नागपुरात तळ ठोकून आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून रवी भवन (Ravi Bhavan Nagpur) येथे या नेत्यांनी नागपूर, चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि राज ठाकरेंची भूमिका आगामी निवडणुकांविषयी (Elections) काय आहे, हे कार्यकर्त्यांना सांगितले. या तिन्ही दिवसांत कार्यकर्त्यांनी नेत्यांना एक प्रश्‍न केला. तो म्हणजे 'गेल्या 15 वर्षांत तुम्ही पक्षासाठी काय केले?' वारंवार येणाऱ्या या प्रश्‍नाने नेत्यांना भंडावून सोडले. आता खुद्द राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांच्या या प्रश्‍नाचा सामना करावा लागेल, असं दिसतंय.

पक्षाचे सुरुवातीपासूनच विदर्भाकडे दुर्लक्ष!

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मागील 15 वर्षांत फक्त 15 सभा जरी विदर्भात घेतल्या असत्या तरी पक्षावर ही वेळ आली नसती असे विदर्भातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेला विदर्भात पुन्हा पुनजिर्वित करण्यासाठी राज ठाकरे आज नागपुरात दाखल झाले. नागपूरच नव्हे तर अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यालाही ते भेटी देणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार आहेत. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर येथील महापालिका निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. महानगरपालिका निवडणूक मनसे ताकदीने लढणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सांगितले.
 
आम्ही मनसेत टिकून आहोत ही पक्षासाठी उपलब्धी

राज ठाकरे यांचे विश्वासू असलेले संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि विदर्भातील नेते राजू उंबरकर (Raju Umbarkar) हे तीन दिवसांपूर्वीच नागपूरला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आनंद एंबडवार हे सुद्धा आले आहेत. नागपूर, अमरावती आणि चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी बैठका घेतल्या. त्यांच्याकडून राजकीय परिस्थिती जाणून घेतली. मुंबईवरून आलेले पदाधिकारी बैठकांमध्ये पंधरा वर्षांत तुम्ही पक्षासाठी काय केले, पक्ष वाढला का नाही, इतकी अधोगती का झाली असे सवाल करीत आहेत. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते फारच अस्वस्थ झाले आहेत. त्यांना काय उत्तर द्यावे हेच सूचत नाही. उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमतही नाही. जे काही पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेत टिकून आहेत हीच मोठी पक्षासाठी उपलब्धी आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

विदर्भासह नागपूरही वाऱ्यावर

संघभूमी असल्याने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात (National Politics) नागपूरचे महत्त्व आहे. मात्र आजवर मनसेच्या एकाही वरिष्ठ नेत्यांने विदर्भात लक्ष घातले नाही. पाठबळ दिले नाही. निवडणुकीची तयारी करून घेतली नाही आणि कोण जिंकले, पराभूत झाले याची साधी विचारणाही केली नाही. मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि नाशिक (Nashik) हीच शहरे मनसेच्या अजेंड्यावर होती. त्यामुळे विदर्भात कोणीच लक्ष घातले नाही. पंधरा वर्षांत झालेल्या विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकात जरी मुंबईतून लक्ष घातले असते आणि राज ठाकरे वरचेवर येत राहिले असते तरी पक्ष जिवंत राहिला असता. ही अवस्था झाली नसती असे स्थानिकांचे खासगीत म्हणणे आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vasant More : वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, प्रकाश आंबेडकरांची घेणार भेटABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaMVA Loksabha Election 2024 :  मविआचा तिढा सुटता सुटेना?, 31 मार्चला नवी दिल्लीत बैठक : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
Embed widget