मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्डयांच्या मुद्यावरुन सर्वपक्षीयांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली. गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांच्या मुद्यावरुन भाजपसह सर्वपक्षीयांनी सभात्याग केला होता.
त्यावेळी प्रशासनानं 5 ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात जे जे पुलाजवळ खड्ड्यामुळे रिजवान खान नावाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता.