Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर पायी चालत असाल तर सावधान! वायरचा शॉक लागून जीव जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Mumbai News: स्पार्क सुरू असतानाही त्याच ठिकाणाहून वाहनांची वर्दळ सुरू होती आणि अनेक नागरिक जीव धोक्यात घालून पायी जात होते.

मुंबईच्या रस्त्यांवर पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरावी अशी धक्कादायक घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. दहिसर येथील एस. व्ही. रोडवर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या उघड्या (Mumbai News) केबलमधून करंटचे स्पार्क होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Mumbai News)
केबलमधून वारंवार ठिणग्या उडताना स्पष्टपणे दिसते
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यावर एक केबल पडलेली दिसत आहे. त्या केबलमधून वारंवार ठिणग्या उडताना स्पष्टपणे दिसते. विशेष म्हणजे, स्पार्क सुरू असतानाही त्याच ठिकाणाहून वाहनांची वर्दळ सुरू होती आणि अनेक नागरिक जीव धोक्यात घालून पायी जात होते. एखाद्याला शॉक लागून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.(Mumbai News)
सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही
ही घटना सुमारे सात ते आठ दिवसांपूर्वीची असून दहिसर एस. व्ही. रोडवरील रवींद्र हॉटेलसमोरील परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेमुळे शहरातील पादचारी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.(Mumbai News)
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित पालिका प्रशासन, रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार तसेच संबंधित वीज वितरण कंपनीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. रस्त्यावर उघडी केबल कशी राहिली, सुरक्षेची उपाययोजना का करण्यात आली नाही, याबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.(Mumbai News)
दरम्यान, व्हायरल व्हिडिओची दखल घेत दहिसर पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. संबंधित केबल रस्त्यावर कशी आली, ती कोणाच्या अखत्यारीत होती आणि स्पार्क होण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शहरातील वाढत्या पायाभूत कामांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.(Mumbai News)
























