मुंबई : मुंबईत कालच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या काहीशी वाढली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,12,570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4696 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1286 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या 38 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.
देशात 24 तासांत 27 हजार नवे कोरोनाबाधित
आरोग्यमंत्रालयानं सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 27,254 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकादिवसापूर्वी 28,591 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत 219 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 37,687 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 3,530 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 3,530 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 685 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 12 हजार 706 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 06 टक्के आहे.
राज्यात आज 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 671 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 101 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (10), नंदूरबार (2), धुळे (1), जालना (36), परभणी (55), हिंगोली (17), नांदेड (25), अकोला (29), वाशिम (01), यवतमाळ (05), वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), चंद्रपूर (51), गडचिरोली (12 ) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.