आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी भागांवर मान्सूनची प्रगती पाहायला मिळत असून तेलंगणाच्या काही भागांमध्ये देखील मोसमी वारे सक्रिय झाले आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी (Farmer) पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. शेतकऱ्याना दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कल्पना शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तर, जून महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतरही मान्सूनच्या (Monsoon) पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. याबाबत सातत्याने हवामान विभागाकडून माहिती देण्यात येत आहे. मात्र, आता आनंदाची बातमी असून राज्यात मान्सूनची आणखी आगेकूच पाहायला मिळत आहे. 8 जून रोजी नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत दाखल झाला असून हरनाई, सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, लवकरच राज्यात पावसाच्या (Rain) सरी कोसळणार आहेत.
मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी भागांवर मान्सूनची प्रगती पाहायला मिळत असून तेलंगणाच्या काही भागांमध्ये देखील मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. रत्नागिरीच्या दापोरीजवळी हरनाई, सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, पुढील 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांतही मान्सूनच्या पुढील प्रगतीस अनुकूल वातावरण आहे. तर, ईशान्य भारतातील उर्वरित राज्यांमध्येही लवकरच मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. त्यामुळे, राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
कोकणात पावसाचे आगमन
कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. रत्नागिरीमध्ये देखील पावसाचे ढग जमा झाल्याचे चित्र आज सकाळपासूनच बघायला मिळतंय. त्यामुळे शेतकरी देखील शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले.
पेरणासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा करावी
दरम्यान, मान्सूनचे आगमन लांबवणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसारच आपली शेतीची काम करायला हवीत. कारण, 15 जूनपर्यंत पेरणीसाठीचा पाऊस पडणार नसल्याची माहिती सीएमओने दिली होती. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असेही सांगण्यात आलं आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे, मान्सूनच्या आगमनानंतर देखील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी प्रतीक्षा करायली हवी.
हेही वाचा
Before You Go
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला























