MNS-Shivsena UBT Morcha: मिरा-भाईंदरमध्ये पोलिसांचा धडकी भरवणारा फौजफाटा, आंदोलकांना डांबण्यासाठी मनपाच्या बसेस आणल्या
MNS-Shivsena UBT Morcha: आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; मनपाच्या बससह पोलिसांच्या गाड्याही बोलावल्या, चौकात जवळपास 200 पोलिस अन् दहा-बारा पोलीस अधिकारी

मुंबई: मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची (MNS-Shivsena UBT Morcha) हाक दिली आहे. आज सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाआधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना ताब्यात घेतलं. तर वसई विरारमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे. पोलिसांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतलं असलं तरी, मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली. या मोर्चाच्या अनुषंगाने संपूर्ण शहरात चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराची कायदा सुवेवस्था कायम रहावी यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे,अशी माहिती मीरा-भाईंदर, वसई-विरार अतिरिक्त पोलीस आयुक्त,दत्ता शिंदे यांनी दिली आहे,
त्यांनी माहिती देताना सांगितलं की, पोलिस दलाकडून मोर्चा परवानगी नाकारली आहे. कायदा सुवेस्वस्था राहावी यासाठी काहींना ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अजूनही कारवाई सुरू आहे.मोर्चाला परवानगी नाकारली आहे त्यामुळे लोकांनी यामधे सहभागी होऊन नये, नाहीतर कारवाई केली जाईल, असंही दत्ता शिंदे यांनी म्हटलं आहे.
जवळपास 200 पोलीस कर्मचारी उपस्थित
संदीप देशपांडेंने ताब्यात घेण्याबाबत बोलताना दत्ता शिंदे म्हणाले की, त्यांच्या मोर्चाला देखील परवानगी नव्हती, त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांसाठी सर्वजण सारखेच असतात, जमावबंदीचे आदेश संपूर्ण शहरात लागू करण्यात आले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. आज दहा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती त्याच भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या चौकामध्ये आताच्या घडीला जवळपास 200 पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. दहा-बारा पोलीस अधिकारी आहेत. त्यामध्ये पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त आहेत. या सर्वांचा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे. जर कोणी मोर्चा करी आले तर त्यांना घेऊन जाण्यासाठी महानगरपालिकेच्या बसेस देखील ठेवण्यात आलेले आहेत. या बसेस मधून आंदोलकांना घेऊन जातील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणावर बोलावण्यात आलेल्या आहेत. ही सर्व तयारी पोलिसांनी केलेली आहे. ही तयारी केवळ मराठी अस्मितेच्या मोर्चाला दडपण्यासाठी किंवा तू मोर्चा येथे निघू नये या एका कारणासाठी करण्यात आलेले आहे. मात्र काही झालं तरी मोर्चा निघणारच यावर अनेक आंदोलनकारी ठाम आहेत, तिथे येणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा आंदोलकांना ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे.
मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात-
आज मीरा रोडमध्ये होत असलेल्या मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमधील बऱ्याच मनसे पदाधिकाऱ्यांना पहाटे तीन वाजता घरातून, उचलून विविध पोलीस ठाण्यात बसवण्यात आलं आहे. नालासोपारा पोलीस ठाणे, विरार पोलीस ठाणे, नायगांव पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे इत्यादी ठिकाणी त्यांना ठेवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील. माजी नगरसेवक आणि शहर सचीव प्रफुल्ल पाटील, वसई शहर संघटक राकेश वैती, शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, विरार शहराध्यक्ष विनोद मोरे, नालासोपारा उपशहरअध्यक्ष संजय मेहरा , नालासोपारा विभागध्यक्ष दिलीप नेवाळे, कल्पेश रायकर, वाहतूक सेना अध्यक्ष पांडुरंग लोखंडे यांच्यासह अनेकांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
























