Nawab Malik on Amit Satam: अमित साटम लोकांची दिशाभूल करत आहेत. मागील 50 वर्षापासून बांगलादेशी आहे की नाही याचा तपास केला जात आहे. पहिल्यांदा शेख हसीना याना भारतातून बाहेर काढावं, त्यांच्यामुळे बांगलादेशमधे हिंदू अडचणीत असल्याचा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना लगावला. मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी झाल्याने केंद्रीय गृह मंत्रालय कारवाई करत असल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 

Continues below advertisement

तर आम्ही त्यांच्या विरोधात उभ राहू

नवाब मलिक म्हणाले की, धारावी पुनर्विकास  प्रस्ताव मी २००२ साली मांडला आहे. सगळ्यांना घरे मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. धारावी विकास व्हावा अशी आमची भूमिका आधी देखील होती आणि आता देखील आहे. धारावीबाबत प्रश्न निर्माण झाल्यास अदानी विरोध करणार असतील, तर आम्ही त्यांच्या विरोधात उभ राहू असे मलिक म्हणाले. 

कटुता होऊ नये यासाठी एकमत 

दरम्यान, राजकीय आरोपांवरून नवाब मलिक म्हणाले की, कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपने एकमेकांवर जोरदार टीका केली. परंतु, नंतर ते एकत्र आले आणि सत्तेत देखील सहभागी झाले आहेत. आमच्यात कटुता वाढू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी दोनवेळा बोललो आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील बोललो, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी देखील बोललो आहे. पुढे अशी कटुता होऊ नये यावर एकमत झालं असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या