- मधुकर शेलार पदनिर्देशित अधिकारी
- धनराज शिंदे ज्युनिअर इंजिनियर
- महाले सब इंजिनिअर
- पडगिरे - वैद्यकीय आरोग्य अधिकारी
- एस. एस. शिंदे -अग्निशमन अधिकारी
मुंबईतील लोंढे आवरा: हेमा मालिनी
एबीपी माझा वेब टीम | 29 Dec 2017 06:30 PM (IST)
लोअर परळमधील कमला मिल कम्पाऊंड आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. त्याबाबत बोलताना हेमा मालिनी यांनी मुंबईतील लोंढ्यावर बोट ठेवलं आहे.
मुंबई: “मुंबईसारखं शहर हे अस्ताव्यस्त वाढत आहे. कोणत्याही शहराची एक मर्यादा असते. तुडूंब भरलेल्या मुंबईत लोकसंख्येवर आळा घालायला हवा”, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार हेमा मालिनी यांनी दिली. लोअर परळमधील कमला मिल कम्पाऊंड आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. त्याबाबत बोलताना हेमा मालिनी यांनी मुंबईतील लोंढ्यावर बोट ठेवलं आहे. “मुंबईत गर्दी खूपच वाढली आहे. मुंबई अस्ताव्यस्त वाढत दुसऱ्या शहरांपर्यंत पोहोचली आहे. एक शहर संपतं की नाही, तोच दुसरं शहर सुरु होतं. त्यामुळे मुंबई कुठे संपते हेच कळत नाही. मुंबईची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सर्वात आधी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायला हवं. प्रत्येक शहराला काही मर्यादा, काही बंधनं असतात. त्यानंतर त्या शहरात कोणालाही परवानगी दिली जाऊ नये. त्यांना दुसऱ्या शहरात जाऊ द्या”, असं हेमा मालिनी म्हणाल्या. यावेळी हेमा मालिनी यांनी पोलीस आणि प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं. आपत्ती काळात पोलीस आपली जबाबदारी चोख पार पाडतात, मात्र अतिलोकसंख्येमुळे अशा दुर्घटनांना सामोरं जावं लागत असल्याचं, हेमा मालिनी यांनी नमूद केलं. दोषींवर कारवाई होणारच: मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्नितांडव झालेल्या कमला मिल कम्पाऊंड परिसराला आज भेट दिली. "ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी अजॉय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉटेल मालकांवर कारवाई होणारच", असं मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, अशा 5 बीएमसी अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर जाणीवपूर्वक परवाने दिले असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत काही संशयित बांधकामं आहेत, त्याचं ऑडिट करण्याचे आदेश बीएमसीला दिले आहेत. तसंच जे विनापरवाना हॉटेल्स वगैरे चालत असेल, तर ते पाडून टाकलं पाहिजे, असंही सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 5 अधिकाऱ्यांवर कारवाई कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. पालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कमला मिलच्या परवानग्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई - जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर अन्य पाच इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे. निलंबित अधिकारी