<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला</title><atom:link href="https://marathi.abplive.com/mumbai/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Wed, 15 Jul 2026 16:48:41 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[Navi Mumbai Crime News: नवऱ्याला संपवलं, बॉडीचे तीन भाग केले, प्रियकराच्या ऑटो रिक्षातून गवळीदेवच्या डोंगरावर टाकले, ऐरोलीतील केसची स्टार्ट टू एंड स्टोरी]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/navi-mumbai-crime-news-woman-lover-arrested-for-husbands-death-in-airoli-navi-mumbai-after-11-months-story-of-the-case-from-start-to-finish-1431893</link><comments>https://marathi.abplive.com/crime/navi-mumbai-crime-news-woman-lover-arrested-for-husbands-death-in-airoli-navi-mumbai-after-11-months-story-of-the-case-from-start-to-finish-1431893#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 15:38:19 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अंकिता खाणे ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/navi-mumbai-crime-news-woman-lover-arrested-for-husbands-death-in-airoli-navi-mumbai-after-11-months-story-of-the-case-from-start-to-finish-1431893</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Navi Mumbai Crime News:&lt;/strong&gt; &amp;nbsp;आधी मुस्कान, मग प्रियंका, त्यानंतर सिया आणि आता सुनिता... आपल्याच पतीचा काटा काढणाऱ्या महिलांच्या (Navi Mumbai Crime News) या यादीत आता आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. आपल्या प्रेमसंबंधांत अडसर ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या (Navi Mumbai Crime News) केल्याची ताजी घटना नवी मुंबईतील ऐरोली परिसरात समोर आली आहे.(Navi Mumbai Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Navi Mumbai Crime News: असा रचला हत्येचा कट&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ही घटना जवळपास ११ महिन्यांपूर्वीची आहे. सुनिता कुशवाहा हिचे राहुल प्रजापती नावाच्या एका रिक्षावाल्यासोबत प्रेमसंबंध होते. पती बळीराम हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याने सुनिताने प्रियकराच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला. ९ ऑगस्ट २०२५ च्या रात्री सुनिताने मुलांना नातेवाईकांकडे पाठवले. त्यानंतर बळीराम गाढ झोपेत असताना आरोपीने त्याची गळा दाबून हत्या केली आणि नंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Navi Mumbai Crime News: पुराव्यांची विल्हेवाट आणि पलायन&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गुन्ह्याचा कोणताही सुगावा लागू नये म्हणून आरोपींनी बळीरामच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. हे तुकडे पोत्यात गुंडाळून प्रियकर राहुलच्या ऑटो रिक्षातून गवळीदेव डोंगरावरील जंगलात नेण्यात आले आणि तिथे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या हत्याकांडानंतर सुनिताने तिचे वडीलोपार्जित घर भाड्याने दिले आणि मुलांसह &lt;a title=&quot;नवी मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/navi-mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नवी मुंबई&lt;/a&gt;तील घणसोली भागात राहायला आली.(Navi Mumbai Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Navi Mumbai Crime News: असा झाला गुन्ह्याचा पर्दाफाश&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा संपूर्ण गुन्हा एप्रिल महिन्यापर्यंत लपून राहिला होता. मात्र, बळीरामचा भाऊ जेव्हा सुनिताला त्याच्या बेपत्ता होण्याबद्दल विचारायचा, तेव्हा ती टाळाटाळीची उत्तरे द्यायची. सुनिताच्या वागण्यावर संशय आल्याने अखेर बळीरामच्या भावाने पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Navi Mumbai Crime News: सिम कार्ड बदलूनही पोलीस पोहोचले आरोपींपर्यंत&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पकडले जाऊ नये म्हणून दोन्ही आरोपींनी वारंवार आपली सिम कार्ड्स बदलली होती. परंतु, पोलिसांना त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) द्वारे त्यांच्यातील संवादाचा सुगावा लागला आणि पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या कडक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गवळीदेवच्या जंगलातून मृतदेहाचे काही अवशेष ताब्यात घेतले असून, इतर भागांचा शोध सुरू आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Mumbai crime News: नेमकं काय आहे प्रकरण?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ऐरोली परिसरात एका महिलेने तिच्या रिक्षाचालक प्रियकराच्या मदतीने पतीला निर्घृणपणे संपवलं. तिने एवढ्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्यासाठी पतीच्या मृतदेहाचे कटरने तीन तुकडे करून ते जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले, धक्कादायक बाब म्हणजे, या महिला आरोपीने तब्बल ११ महिने हा गुन्हा पचवला होता, मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पत्नी सुनीता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. बलीराम सूर्यनाथ कुशवाह असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.(Mumbai Crime News)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नवी &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तील ऐरोली परिसरात ११ महिन्यांपूर्वी घडलेल्या थरारक हत्याकांडाचा रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे कटरने तीन तुकडे करून गवळी देव डोंगर परिसरातील जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचे तपासात समोर आले आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सुनिता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती यांना अटक केली असून न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मयताचा भाऊ संशय व्यक्त करत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि चौकशीतील विसंगतींच्या आधारे या हत्याकांडाचा पर्दाफाश केला. आरोपींच्या कबुलीनंतर गवळी देव परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=WP14ieI3XPyGMb3Z&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/066f25b9782fa4e38edf4ba4fc1351de17841100481741075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-should-lead-the-nation-prayer-to-lord-pandurang-on-the-occasion-of-ashadhi-ncp-dattatray-bharne-statement-1431883</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-should-lead-the-nation-prayer-to-lord-pandurang-on-the-occasion-of-ashadhi-ncp-dattatray-bharne-statement-1431883#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 14:33:20 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिषेक मुठाळ ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-should-lead-the-nation-prayer-to-lord-pandurang-on-the-occasion-of-ashadhi-ncp-dattatray-bharne-statement-1431883</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; :&lt;/strong&gt; राज्यात खांदेपालट होणार असून मुख्यमंत्री &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot;&gt;देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)&lt;/a&gt; दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सातत्याने होत असतात. मात्र, आता चक्क महायुतीमधील सत्ताधारी मंत्र्&amp;zwj;यानेच देवभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं यासाठी आपण पांडुरंगाला साकडं घालू, असे म्हटलं आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भाजपच्या किसान मोर्चाच्यावतीने सत्कार आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात बोलताना राज्याचे कृषीमंत्री &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/dattatray-bharne&quot;&gt;दत्तात्रय भरणे (Dattatray bharne)&lt;/a&gt; यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण पांडुरंगाकडे एकच विनंती करु, विठ्ठलाला साकडं घालू की, योग्यवेळी देवाभाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे भरणे यांनी म्हटले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;चांगली माणसं महाराष्ट्रातच राहिली पाहिजे, आपल्या भविष्यासाठी ते महाराष्ट्रातच राहिले पाहिजेत. पण, फक्त आपलाच विचार करुन चालत नाही कुटे साहेब. त्यामुळे, आज मी म्हणत नाही, पण योग्य वेळी &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; दिल्लीचा तक्तापासून लांब आहे, पण योग्यवेळी म्हणतोय मी. आता, 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, आपण पांडुरंगाकडे एकच विनंती करु, विठ्ठलाला साकडं घालू की, योग्यवेळी देवाभाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. भरणे यांच्या या वक्त्वव्याने उपस्थिती शेतकऱ्यांना टाळ्या वाजवून दाद दिली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;किसान मोर्चाचे आपण कार्यकर्ते आहात, महायुतीत आपण एकत्र आहोत. सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी हा सत्कार आपण घेतला आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी आली, पिकं वाहून गेलं, अशात आपल्याला कोणी मदत केली असेल तर ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आज अजित दादा नाहीत मात्र त्यांनी तेव्हा फिल्डवर जात नुकसानीची पाहाणी केली होती. बोलणं सोपं पण करणं अवघड असतं. आपण संसार चालवतो तेव्हा सगळा विचार करावा लागतो, निवडणुका नाहीत मात्र मदत केली पाहिजे, तो शेतकरी उभा राहिला पाहिजे यासाठी &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt;, सुनेत्रा पवार आणि &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; यांनी मदत केल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;शेतकरी हिताचे निर्णय घेतले&lt;/h2&gt;
&lt;p&gt;महायुतीच्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे, कर्जमाफीचा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, रक्कम 40 हजार 585 कोटी रुपये झाली आहे. आपल्यासाठी काम करतात त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी मोठी मदत केली, प्रत्येक वर्षी वीजेसाठी 7.5 हॉर्सपंपासाठी दरवर्षी आपण 25 हजार कोटींची मदत करतोय, मदत करणं सोपं नाही आहे हे बाबांनो, असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक केले. तसेच, 90 टक्के मार्क मिळाले तरी 10 टक्के कमी का मिळाले यासाठी प्रचार केला जातोय. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पाहिजे, एआयच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न आपण करतोय. महिला शेतकरी धोरण आणण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे. नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना दोन्हींचा विचार केला तर आत्तापर्यंत राज्याने 57 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले हे लोकांना सांगितलं पाहिजे, असेही भरणेंनी म्हटले. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;आंतरराष्ट्रीय कृषी बाजार&lt;/h2&gt;
&lt;p&gt;शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणारे हे सगळे नेते आहेत, कालच एक निर्णय मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. जयकुमार रावल साहेब इथे नाहीत मात्र पालघरमधील दापचेरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजार उभारला जाणार आहे, शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय आहे, काय सुविधा शेतकऱ्यांना पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्र्यांचे अनेक ठिकाणी सत्कार होतील, मात्र हा घरातला सत्कार आहे, ज्याचा आनंद वेगळाच असतो, असे म्हणत दत्तात्रय भरणेंनी मुख्यमंत्र्याचं कौतुक करत शेतकऱ्यांचे आभार मानले. &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/india/sonam-wanghchuk-agitation-vilasrao-takes-the-initiative-manmohan-singh-sarkar-2011-anna-movement-as-sonam-wangchuk-s-health-deteriorates-raju-shetti-remind-1431877&quot;&gt;विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/6f9d75e2361652889bec8dbc668a048e17841061871741002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Devendra Fadnavis on Farmers: देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-on-farmer-loan-waiver-and-electricity-bill-for-agriculture-waived-off-marathi-news-1431882</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-on-farmer-loan-waiver-and-electricity-bill-for-agriculture-waived-off-marathi-news-1431882#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 14:23:40 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रोहित धामणस्कर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-on-farmer-loan-waiver-and-electricity-bill-for-agriculture-waived-off-marathi-news-1431882</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Devendra Fadnavis on Farmers:&lt;/strong&gt; राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजासाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीची जुनी बिलं माफ करण्याची घोषणा केली. शेतीला (Farmers) पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरचे जे मोटारपंप वापरले जातात त्यांना सध्या बिल येत नाही. मात्र, यापूर्वीची जुनी बिलं (Electricity bill) अजूनही प्रत्येकाच्या नावाने खात्यात जमा आहेत. त्याची वसूली कधीही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर त्याला ते मिळत नाही. मात्र, आमच्या सरकारने एक निर्णय घेतला की, आम्ही 48 हजार कोटी रुपयांची जुनी बिलं माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि नव्याने त्याला पाटीवर इतिहास लिहता आला पाहिजे, यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते बुधवारी &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तील एका कार्यक्रमात बोलत होते. &amp;nbsp;(Maharashtra Politics news)&lt;/p&gt;
&lt;p&gt;यावेळी देवेंद्र फडणवीस भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि नव्या तंत्रज्ञानाचा विचार करुन शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याची गरज व्यक्त केली. आज राज्यातील 76 टक्के शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देत आहोत. या वर्षाअखेर आपला प्रयत्न आहे की, आपण 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा प्रयत्न करु, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2014 नंतर आपण शेती क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक केली. त्यासाठी जलयुक्त शिवार (Jalyukta Shivar), मागेल त्याला शेततळे या योजना राबवल्या. महाराष्ट्रात लाखो शेततळी निर्माण झाली.अलीकडच्या काळात मी हेलिकॉप्टर वापरत नाही. पण मराठवाड्यात अनेक कोरडे जिल्हे आहेत. हेलिकॉप्टरमधून वरुन बघितल्यावर प्रत्येक शेतात तळं दिसतं. &amp;nbsp;यंदाचे वर्ष हे अल निनोचे आहे. एकदाच पाऊस पडून नंतर काय गायब होतो. अशावेळी पिकांना पाणी देण्यासाठी ही शेततळी कामाला येतात. पूर्वी सिंचनाच्या योजनांसाठी वाट पाहायला लागायची. पण आता आपण ड्रिप इरिगेशन आणि इतर सिंचन योजनांची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. आज आपल्याला शेती क्षेत्रात परिवर्तन करायचे असेल तर जागतिक बाजारपेठेचा विचार करावा लागेल. उत्पादन खर्च कमी झाल्यावरच आपली उत्पादकता वाढेल. त्यासाठी &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ात पुढच्या दोन-तीन वर्षात 50 हजार गट तयार केले तर गुंतवणूक क्षमता वाढेल. त्यामुळे पिकांचे प्रयोग करुन पुरक पिकं घेता येतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;Devendra Fadnavis: &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt;ांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे&lt;/h2&gt;
&lt;p&gt;रासायनिक खतांमुळे शेतीची अवस्था वाईट होते आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;नैसर्गिक शेतीकडे आपला जाण्याचा प्रयत्न आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;देशी गाईंचे संवर्धन झाले पाहिजेत&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शेतीत उत्पादकता वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करावे लागतील&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आपल्या जमिनीची क्षमता वाढवावी लागेल&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;येत्या काळात हे सगळं करण्याचा प्रयत्न आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;गुंतवणूक मॉडेलकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;माझ्या घरी वडलोपार्जित शेती आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;माझ्याकडे धानाची शेती होते&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत ३ महिने गावी असायचो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कारखाने नव्हते ऊस होता, त्यातून घरात गूळ तयार करायचो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;बगीच्यात भाज्या तयार करायचो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शेतात गेलोय, शेती बघितली आहे&lt;/p&gt;
&lt;p&gt;चिखलात रोणे करायचो&lt;/p&gt;
&lt;p&gt;सगळं आम्ही अनुभवलं आहे, केलं आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;एखाद्या रुममध्ये बसून निर्णय घेणारा नाही, आम्ही फक्त ते सांगत फिरत नाही, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा टोला&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;br /&gt;कर्जमाफी अंतिम उपाय नाही&lt;/p&gt;
&lt;p&gt;७-८ वर्षात कर्जमाफी कराव्या लागत असतील तर आपले शेतीप्रश्न कठीण आहेत&lt;/p&gt;
&lt;p&gt;कोणी कर्जमाफीतून श्रीमंत झाला नाही&lt;/p&gt;
&lt;p&gt;आपण नवीन तंत्रज्ञान वापरले नाही तर शेती फायद्याची होऊ शकत नाही&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ज्या अल्प भूधारक शेतकऱ्याने गुंतलणूक करायची कशी?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;जेमतेम पीक कर्ज काढत असेल आणि ते पण परत करु शकत नसेल तर अडचण आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आपणच मग शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;२०१४ नंतर जलयुक्त शिवार, ठिबक सिंचन वगैरे सारख्या गोष्टी सुरु केल्या&lt;/p&gt;
&lt;p&gt;मी आपले आभार मानतो&lt;/p&gt;
&lt;p&gt;मी जीवनात कमी सत्कार स्विकारतो, सहसा दूर राहातो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आज मला संधी दिसली, शेतकऱ्यांसोबत संवाद साधला येईल आणि दोन गोष्टी पोहोचवतां येईल&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;माझ्या कारकिर्दीत मला मदत केली, ते दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्र्यांच्या वतीनं हा सत्कार स्विकारतो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कर्जमाफीचा निर्णय कोणतीही निवडणुका डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कर्जमाफीचे आश्वासन आपण दिलं होतं&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;राज्यात अभूतपूर्व यश आपल्याला मिळालं&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;पालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या भाजपला भरभरून जनतेनं दिले&lt;/p&gt;
&lt;p&gt;राजकीय विचार केला असता तर समोर निवडणूक नाही अशात २०२९ ला करु असा विचार करता आला असता मात्र शेतकरी हिताचे विषय राजकारण्यांसंबंधी नाही&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शेतकरी हितासाठी विचार घेतला पाहिजे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;सरकार निर्णय करणार नाही&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आंदोलन करु, दुकानं सुरु राहिलं&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;महायुतीचे हे सरकार आहे, देवाभाऊंचे हे सरकार आहे आणि आपण निर्णय घेतला&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना ५० हजार देण्याचा निर्णय घेतला&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कर्जमाफी योजनेत ज्यांना फायदा मिळाला त्यांना मिळणार नाही&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;२००८ मध्ये कर्जमाफी झाली, २००९ मधून वगळले&lt;/p&gt;
&lt;p&gt;२०१७ ला झाली, २०१९ मधून त्यांना वगळलं&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;समितीनं आपल्याला अहवाल देताना सांगितलं कर्ज भरण्याची सवय सुटली, किंवा वाटलं कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार, अशात मग कर्ज भरत नाही&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;लगतच्या कर्जमाफीचा फायदा देऊ नये असा निर्णय होता&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;यात १२ लाख शेतकरी आहेत, मग ५० हजारांचा फायदा दिला तर ६ लाख लोकांना फायदा होत होता&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;त्या रिपोर्टच्या पलिकडे जात विचार केला, ५० हजार आपण द्यावे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;१२ लाखातले ९ लाख शेतकरी १०-१२ हजार भरुन पात्र होत होते&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;चालू कर्ज शेतकऱ्यांनी भरावे याची अट आपण लावली होती&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;रणधीर सावरकरांसोबत २५-३० आमदार आलेत&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मी सत्य सांगतो, आर्थिक शिस्त लागली पाहिजे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;३६ हजार दिले आहेत तर ४० हजार कोटी द्यावे लागतील मोठी रक्कम नव्हती&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/dmXzEZwO5R0?si=1GSD3jRvJjKh0i0p&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/801a25feabd1041387fcaea2951dd0241784105387345954_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण]]></title><link>https://marathi.abplive.com/news/india/sonam-wanghchuk-agitation-vilasrao-takes-the-initiative-manmohan-singh-sarkar-2011-anna-movement-as-sonam-wangchuk-s-health-deteriorates-raju-shetti-remind-1431877</link><comments>https://marathi.abplive.com/news/india/sonam-wanghchuk-agitation-vilasrao-takes-the-initiative-manmohan-singh-sarkar-2011-anna-movement-as-sonam-wangchuk-s-health-deteriorates-raju-shetti-remind-1431877#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 13:47:52 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ महेश गलांडे ]]></dc:creator><category><![CDATA[ भारत ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/india/sonam-wanghchuk-agitation-vilasrao-takes-the-initiative-manmohan-singh-sarkar-2011-anna-movement-as-sonam-wangchuk-s-health-deteriorates-raju-shetti-remind-1431877</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;&lt;/strong&gt; : राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/sonam-wangchuk&quot;&gt;सोनम वांगचूक (Sonam wangchuk)&lt;/a&gt; गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. देशातील नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजानामा द्यावी ही मूळ मागणी करत कॉकरोच जनता पार्टीसह सोनम वांगचूक यांचं आदोलन सुरू असून ते उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे, तर सोशल मीडियातूनही उपोषणावर भाष्य केलं जात आहे. मात्र, सरकारने अद्याप आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही. त्याच, पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा शेतकरी नेते &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/raju-shetti&quot;&gt;राजू शेट्टी (Raju Shetti)&lt;/a&gt; यांनी 2011 सालच्या अण्णा आंदोलनाची आठवण करुन दिली. तसेच, तत्कालीन सरकारने विरोधी पक्षाला घेऊन उपोषण कसे सोडवली याची सत्यकथा सांगत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;राजू शेट्टी आपल्या पोस्टमध्ये सांगतात, 2011 साली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि एका मजबूत भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या निर्मितीसाठी म्हणजेच 'जन लोकपाल विधेयक' (Jan Lokpal Bill) संमत करावे या प्रमुख मागणीसाठी रामलीला मैदानावर आमरण उपोषण केले होते. मी त्यावेळेस लोकसभेचा सदस्य होतो. अण्णा हजारे यांनी केलेली मागणी मान्य करावी म्हणून विरोधी पक्षातील सुषमा स्वराज , अरूण जेटली , गोपीनाथ मुंडे , नितीन गडकरी,राजनाथसिंग, कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) प्रकाश कारत, ए. बी. बर्धन, तेलुगु देशम पक्षाचे (TDP) चंद्राबाबू नायडू, आणि जनता दल युनायटेडचे (JD-U) शरद यादव या नेत्यांनीही संसदेत अण्णांच्या आंदोलनाचा जोरदार आवाज उठवला होता.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;br /&gt;गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी मी आणि मुंडे साहेब बसलो असताना विलासराव देशमुख यांचा मुंडे साहेबांना फोन आला व आपण कुठे आहात मी आपणास भेटायला येणार आहे असे सांगून आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा निरोप घेऊन तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी आले होते. जवळपास दीड ते दोन तास या आंदोलनाबाबत विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांची चर्चा होवून तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करून दोन वेळा विलासराव देशमुखांनी त्याठिकाणाहून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन जोडून दिला. त्यानंतर पुढील आठ दिवस विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे या दोघांनी समन्वयकाची भूमिका बजावली व सरकारने संसदेत जन लोकपालच्या प्रमुख मागण्यांवर 'संसद संकल्प' (Sense of the House) एकमताने मंजूर केल्यानंतर 28 ऑगस्ट 2011 रोजी आंदोलन संपले. त्यावेळेस अण्णा हजारे यांनी विलासराव देशमुख यांना &amp;ldquo;सृजन प्रशासक&amp;rdquo; एक सुसंस्कृत, शब्दाचा पक्का आणि जनभावना समजणारा नेता&quot; म्हणून माध्यमांसमोर आदर व्यक्त केला.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;br /&gt;रॅमेन मॅगेसेस पुरस्कार घेतलेले सोनम वांगचुक आज 17 दिवस दिल्लीत उपोषण करत आहेत. मनमोहन सिंग यांच्यासारख्या संवेदनशील व विलासराव देशमुख यांच्यासारखे गुण असणारा एकही नेता भाजप पक्षात नाही व एकाही मंत्र्याने या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही हे लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल, असे म्हणत केंद्रातील सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्याने राजू शेट्टींनी जुनी आठवण सांगत रोष व्यक्त केला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;सोनम वांगचुक यांनी देशातील नीट परिक्षेत सातत्याने होत असलेल्या पेपर फुटीमुळे &amp;nbsp;जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उपोषण करत आहेत. 21 विद्यार्थी आत्महत्या करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाझर फुटत नाही . मोदी यांचा माणुसकीला काळिमा फासणारा ढोंगी व लबाड चेहरा हळूहळू जनतेसमोर येवू लागला आहे. भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या निर्मितीसाठी मोदींनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनादरम्यान देशभर टाहो फोडला आणि सत्ता हस्तगत केली .याच मोदींनी देशातील सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांना भाजपमध्ये घेऊन त्या सर्वांचा बाप होण्याचा विश्वविक्रम केला. सत्तेच्या सारीपाटावर &amp;ldquo;मन की बात &amp;ldquo; करून सोज्वळपणा दाखवणारे पंतप्रधानांची सामान्य जनतेसाठी &amp;ldquo;अंदर की बात&amp;ldquo; अत्यंत क्लेषदायक आहे, अशी टीका राजू शेट्टींनी केली.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;तर देश तुम्हाला माफ करणार नाही&lt;/h2&gt;
&lt;p&gt;अजूनही वेळ गेलेली नाही केंद्रातील एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला पाठवून सोनम वांगचूक यांचे उपोषण थांबवावे. जर सोनम वांगचूक यांच्या जीवाला बरेवाईट झाल्यास रॅमेन मॅगेसेस पुरस्कार विजेता व्यक्तीचा हत्यारा म्हणून तुम्ही जगभर ओळखले जाल व देशाची जगभरात बेअब्रू होईल. दुर्दैवाने तसे झालेच तर मोदीजी देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असेही राजू शेट्टींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/supriya-sule-clears-stand-on-ncp-sharad-pawar-camp-supporting-nda-government-delimitation-bill-maharashtra-politics-marathi-news-1431859&quot;&gt;राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/8a4a64ca9ddfdda235e5e4c54357a21817841034503311002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Car Fire In Coastal Road Mumbai: मुंबईतील कोस्टल रोडवरील बोगद्यात कारला आग, सर्व गाड्या सोडून पळाले, भुयारात धुराचे मोठे लोट, नेमकं काय घडलं?]]></title><link>https://marathi.abplive.com/photo-gallery/news/mumbai-car-fire-in-coastal-road-mumbai-a-car-caught-fire-inside-the-tunnel-on-the-coastal-road-photo-coastal-road-marathi-news-1431861</link><comments>https://marathi.abplive.com/photo-gallery/news/mumbai-car-fire-in-coastal-road-mumbai-a-car-caught-fire-inside-the-tunnel-on-the-coastal-road-photo-coastal-road-marathi-news-1431861#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 12:49:05 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अक्षय भाटकर, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ मुंबई ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/photo-gallery/news/mumbai-car-fire-in-coastal-road-mumbai-a-car-caught-fire-inside-the-tunnel-on-the-coastal-road-photo-coastal-road-marathi-news-1431861</guid><description><![CDATA[Car Fire In Coastal Road Mumbai: मुंबईतील कोस्टल रोडवरील बोगद्यात कारला आग, सर्व गाड्या सोडून पळाले, भुयारात धुराचे मोठे लोट, नेमकं काय घडलं?]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/5a0d8ab8d20045c70fe12f608ce97d0a1784100804154987_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Supriya Sule on NCP:  राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ  पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/supriya-sule-clears-stand-on-ncp-sharad-pawar-camp-supporting-nda-government-delimitation-bill-maharashtra-politics-marathi-news-1431859</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/supriya-sule-clears-stand-on-ncp-sharad-pawar-camp-supporting-nda-government-delimitation-bill-maharashtra-politics-marathi-news-1431859#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 12:35:10 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रोहित धामणस्कर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/supriya-sule-clears-stand-on-ncp-sharad-pawar-camp-supporting-nda-government-delimitation-bill-maharashtra-politics-marathi-news-1431859</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Supriya Sule on NCP:&lt;/strong&gt; आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून संसदेत मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ &amp;nbsp;पुनर्रचना विधेयकाला (Delimitation bill) &amp;nbsp;शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पाठिंबा देणार असल्याच्या सर्व चर्चा निराधार आहेत. आमच्याकडे या विधेयकासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर अभ्यास करुन 24 तासांमध्ये भूमिका मांडू, अशी स्पष्टोक्ती खासदार सुप्रिया सुळे (&lt;a title=&quot;Supriya Sule&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/supriya-sule&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;Supriya Sule&lt;/a&gt;) यांनी दिली. त्या बुधवारी &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Maharashtra Politics)&lt;/p&gt;
&lt;p&gt;आज सकाळपासून शरद पवारांची राष्ट्रवादी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारची साथ देत मतदारसंघ &amp;nbsp;पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राज्यात महायुतीसोबत सत्तेत सामील होण्याच्यादृष्टीने आणखी एक पाऊल टाकल्याचे बोलले जात होते. मतदारसंघ &amp;nbsp;पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार गट पाठिंबा देणार असल्याचे वृत्त सुप्रिया सुळे यांच्या हवाल्याने प्रसिद्ध झाले होते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी या सगळ्यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. आज सकाळपासून एक जबाबदार वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांमध्ये काही गोष्टी आल्या आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मतदारसंघ &amp;nbsp;पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही. &amp;nbsp;आमच्या पक्षाबद्दल आणि पक्षाच्या धोरणाबद्दल जी भूमिका वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांत आली आहे, ती सूत्रांकडून आली आहे. अधिकृतपणे कुठलंही स्टेटमेंट आमच्या पक्षाने केलेले नाही. मात्र, याबाबतच्या वृत्तामुळे गैरसमज निर्माण झाले. त्यामुळे आता मी शरद पवार साहेब, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमच्या पक्षांच्या आमदार आणि खासदारांशी बोलून तुमच्यासमोर स्पष्टीकरण देण्यासाठी बसले आहे. जेणेकरून महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मी याबाबत आज सकाळीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील आणि संजय राऊत या तिघांशीही बोलले आहे. एकतर मतदारसंघ पुनर्रचना विधेकयकाबाबत आमच्याकडे कोणतंही नवीन डिल आलेले नाही. त्यामुळे आम्ही त्याबाबत बोलू शकत नाही. पण तसा प्रस्ताव आला तर आम्ही 24 तासांत भूमिका मांडू, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/CcR0JMbzICA?si=zVh9-uroKLPzv9XJ&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;Jayant Patil On Devendra Fadnavis Meet: तुम्हाला राज्याचं अर्थमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा; पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटील पहिले हसले आणि म्हणाले...&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/jayant-patil-on-devendra-fadnavis-meet-sunil-tatkare-praful-patel-ncp-politics-jayant-patil-react-on-maharashtra-finance-minister-post-marathi-news-1431856&quot; target=&quot;_self&quot;&gt;Jayant Patil On Devendra Fadnavis Meet: तुम्हाला राज्याचं अर्थमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा; पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटील पहिले हसले आणि म्हणाले...&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/446027d7bf49df837d8accd43e89c0201784099092180954_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Jayant Patil On Devendra Fadnavis Meet: तुम्हाला राज्याचं अर्थमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा; पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटील पहिले हसले आणि म्हणाले...]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/jayant-patil-on-devendra-fadnavis-meet-sunil-tatkare-praful-patel-ncp-politics-jayant-patil-react-on-maharashtra-finance-minister-post-marathi-news-1431856</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/jayant-patil-on-devendra-fadnavis-meet-sunil-tatkare-praful-patel-ncp-politics-jayant-patil-react-on-maharashtra-finance-minister-post-marathi-news-1431856#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 11:58:02 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ वेदांत नेब ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/jayant-patil-on-devendra-fadnavis-meet-sunil-tatkare-praful-patel-ncp-politics-jayant-patil-react-on-maharashtra-finance-minister-post-marathi-news-1431856</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Jayant Patil On Devendra Fadnavis Meet: &lt;/strong&gt;शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil), राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी काल (14 जुलै) रात्री अचानक 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं. (Jayant Patil Meet Devendra Fadnavis)&lt;/p&gt;
&lt;p&gt;जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तिन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांची वेगळी बैठक झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे. सुरुवातीला सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटील देखील वर्षावर पोहोचले. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नाही. या भेटीवर आज जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली, भेटीत काय घडलं?, जयंत पाटील यांनी सगळं सांगितलं- (Jayant Patil On Devendra Fadnavis Meet)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;माझ्या मतदारसंघातील एका कामासाठी मी त्यांची भेट घेतली. 2002-03 सालापासून त्यांच्याकडे अतिक्रमणाची कुठलीही नोटीस नाही. तरीही त्यांच्याविरोधात तक्रार केली गेली. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. तशी त्यांनी वेळ दिली मात्र भेटीला उशीरच झाला. मी विषय सांगितल्यानंतर मला मुख्यमंत्री म्हणाले की, मी त्याकडे लक्ष घालतो. आम्ही 5-10 मिनिटं भेटलो. मी हॉलमध्ये बसलो होतो. तेव्हा मुख्यमंत्री तिथे बऱ्याच वेळाने आले. बाहेर आल्यानंतर मी आज खूप बैठकीत व्यस्त आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं आणि मी याकडे लक्ष घालतो, असं सांगितल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत माझी कधीच भेट झाली नाही- जयंत पाटील (Jayant Patil On Sharad Pawar)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत माझी कधीच भेट झाली नाही. माझी सुनील तटकरे आणि प्रफुल पटले यांची भेट झाली असती, तर मी नक्कीच सांगितलं असतं, असं जयंत पाटील म्हणाले. कुठली चर्चा झाली नाही. विलीनीकरण वगैरे याची चर्चा होण्याचा संबंधच नाही. त्यांच्यासोबत कोणताही विलीनीकरण याची चर्चाच झाली नाही.&amp;nbsp;अजितदादांच्या निधनानंतर अशी कुठली चर्चा नाही, ही चर्चा थांबली, असं जयंत पाटील म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;जयंत पाटील अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर काय म्हणाले? (Jayant Patil On Maharashtra Finance Minister post)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;सध्या अर्थमंत्रीपदी जयंत पाटील यांची वर्णी लागेल, अशी चर्चा आहे, यावर तुमचं मत काय?, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावर हसत हसत जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. मी कशाचाच विचार केला नाही. मग तुम्ही पुढचा विचार का करताय?, असा प्रतिसवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. खातेवाटपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार असतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांचा अधिकार देखील घेत आहात. तुम्ही खूपच पुढचं विचारातंय. हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहेत. अर्थमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवत असतात, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच आम्ही सगळे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मागे एकसंध आहोत. वारंवार अशाप्रकारच्या चर्चा समोर का येतात, यामुळे मला दुःख होतं, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;विनोद तावडेंसोबतच्या भेटीवर जयंत पाटील काय म्हणाले? (Jayant Patil On Vinod Tawde)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;संसदीय समितीची बैठक होती, त्या दरम्यान सुप्रिया सुळे तिथे होत्या त्यासोबत विनोद तावडे तिथे होते. विनोद तावडे यांच्या सोबत भेट झाली झाली. एका कार्यक्रमात गेल्यावर ते तिथे होते. त्यावेळी विनोद तावडेंसोबत कॉफी घेतली, असं जयंत पाटील यांनी सांगितले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 class=&quot;style-scope ytd-watch-metadata&quot;&gt;देवेंद्र फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? जयंत पाटील यांनी सविस्तर सगळं सांगितलं, VIDEO:&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/F895YjrSMQA?si=2S9mDF_1BlOLrSmi&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;संबंधित बातमी:&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/jayant-patil-meet-devendra-fadnavis-sunil-tatkare-praful-patel-sharad-pawar-sunetra-pawar-ncp-politics-marathi-news-1431826&quot;&gt;Jayant Patil Meet Devendra Fadnavis: जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/522d7d07db42e4e4db1cb4df3398117c1784096867322987_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Sanjay Raut: रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/sanjay-raut-on-jayant-patil-meeting-with-devendra-fadnavis-and-ncp-sharad-pawar-camp-supports-delimitation-bill-in-parliament-marathi-news-1431850</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/sanjay-raut-on-jayant-patil-meeting-with-devendra-fadnavis-and-ncp-sharad-pawar-camp-supports-delimitation-bill-in-parliament-marathi-news-1431850#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 10:56:06 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रोहित धामणस्कर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/sanjay-raut-on-jayant-patil-meeting-with-devendra-fadnavis-and-ncp-sharad-pawar-camp-supports-delimitation-bill-in-parliament-marathi-news-1431850</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Sanjay Raut:&lt;/strong&gt; आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक मांडले जाणार असून त्या विधेयकाला ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून पाठिंबा दिला जाईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या अनुषंगाने शरद पवार गट भाजपसोबत हातमिळवणी करुन महायुतीसोबत (Mahayuti) सत्तेत बसू शकतो, असेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. त्यांनी या सगळ्या आरोपांमध्येही काहीही तथ्य नसल्याचे म्हटले. शिंदे गट आणि भाजपकडून महाविकास आघाडीतील (MVA Alliance) पक्षांच्या आमदारांविषयी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तील पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maharashtra Politics news)&lt;/p&gt;
&lt;p&gt;काल जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर जाऊन भेटले. त्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही तिकडे होते. ही माहिती अर्धवट असून काही अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्या माहितीनुसार, फुटबॉल वर्ल्डकप सुरु आहे, प्रफुल पटेल तिकडे आहेत , फुटबॉल वर्ल्डकप असताना ते नेहमी परदेशात जातात. त्यामुळे कालच्या बैठकीला ते नसावेत. जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांना वेगळ्या कारणासाठी भेटले. जयंत पाटील त्यांच्या मतदारसंघातील एका नगराध्यक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीारपणे अपात्र ठरवले. इस्लामपूरचा हा नगराध्यक्ष लोकांतून निवडून आलेला होता.&lt;/p&gt;
&lt;p&gt;या विषयासंबंधी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून तक्रार केली. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे आणि मविआचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाणार, यामध्ये तथ्य नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांविषयी या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या या बातम्या ऐकून सुप्रिया सुळे यांनाही आश्चर्य वाटत आहे. मी त्यांच्याशी आजच सविस्तर बोललो. त्या आज यासंबंधी बोलणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक पावसाळी अधिवेशनात आल्यावर त्यावरील भूमिका आम्ही ठरवू. पण विविध राजकीय पक्षाचे खासदार फोडून केंद्र सरकार बहुमत जमवेल, या आरोपात काही तथ्य नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Delimitation bill: पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला ठाकरे आणि शरद पवार गट पाठिंबा देण्याची चर्चा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकात देशात लोकसभेच्या &amp;nbsp;50 टक्के जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास शरद पवार यांची राष्ट्रवादी विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शाह यांच्याकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा झाली होती. या चर्चेत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेच नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, काँग्रेस आणि डीएमके यांनी देखील होकार दिल्याचे सुप्रिया सुळेंकडून सांगितले जात असल्याची चर्चा आहे. सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. सुप्रिया सुळे बुधवारी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर बोलणार आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/kf_uGQHqx2I?si=EKjuSZ__kpMruyDq&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/jayant-patil-meet-devendra-fadnavis-sunil-tatkare-praful-patel-sharad-pawar-sunetra-pawar-ncp-politics-marathi-news-1431826&quot;&gt;जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/2a1128eec6b82b44842cec00293896e91784093147904954_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!]]></title><link>https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-sachin-ahir-uncut-speech-worli-shiv-sena-aaditya-thackeray-marathi-news-abp-majha-1431839</link><comments>https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-sachin-ahir-uncut-speech-worli-shiv-sena-aaditya-thackeray-marathi-news-abp-majha-1431839#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 09:17:07 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ मुंबई ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-sachin-ahir-uncut-speech-worli-shiv-sena-aaditya-thackeray-marathi-news-abp-majha-1431839</guid><description><![CDATA[&lt;p&gt;Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;तुमच्याकडे होता तो पर्यंत चांगला आणि तुम्हाला सोडल्यावर वाईट &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी कालही सेक्युलर होतो, आजही सेक्युलर आहे, आणि उद्याही सेक्युलर रहाणार आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;वरळीची जागा आम्ही काय तुम्हाला देणार नाही, आप दिल्ली देखो हम गल्ली देखते है, &lt;br /&gt;&lt;br /&gt;पक्षाकडुन जो कोणी उमेदवार दिला जाईल &lt;br /&gt;&lt;br /&gt;वरळीकर चमत्कार करतील, &lt;br /&gt;&lt;br /&gt;वरळीकर डोक्यावर घेणारा पण आहे आणि डोक्यावरून खाली अपटणारा पण आहे &lt;br /&gt;&lt;br /&gt;कारण ह्या मतदारांना ग्राह्य धरले जात आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काही लोकांनी वरळीकरांचा सातबारा आपल्या नावावर केला आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी माझ्या पदाचा गैरवापर होउ देणार नाही&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;न्याय देणारा जर काम कारणा-या कार्यकर्त्याला साथ देत आसेल तर साथा द्यावी असा मी विचार केला&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;br /&gt;ज्यांना मी विधानसभेला पुढे आणले, ज्यांच्या खांद्याला खांदा लावुन काम केले त्यांना साध्या शुभेच्छा देता आल्या नाहीत&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्यांच्या आयुष्यात कधी दगडाशी नाते नाहीत ते आता आम्हाला दगडाची भाषा सांगत आहेत&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;काही लोक रूम बदली करून इथे आले आहेत&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्षमा मागतो काही राजकीय निर्णय अपरिहार्य असतात सगळ्यांच मात जाणून घ्यायचे असतात &lt;br /&gt;&lt;br /&gt;२०१९ मध्ये एक भूमिका घेतली &lt;br /&gt;&lt;br /&gt;दूरदृष्टीने निर्णय घेतला आहे &lt;br /&gt;&lt;br /&gt;यात माझा स्वार्थ आहे माझ्यावरील अवलंबून असलेल्यांसाठी हा माझा स्वार्थ आहे &lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसऱ्याकडून आले तर चांगले आणि आपल्याकडून गेले तर वाईट होतात अस त्याचं आहे &lt;br /&gt;&lt;br /&gt;सामाजिक क्षेत्रात काम करताना काही भूमिका घ्यायच्या असतात&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी कालपर्यंत एका शहराचा अध्यक्ष होतो अनेक विभागांची काम करत होतो &lt;br /&gt;&lt;br /&gt;वरळीकरांच्या हितासाठी काही पावलं मागे जाव लागलं तरी &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी जर वरळीच्या कामासाठी भाग पाडलं नसत तर कदाचित प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता &lt;br /&gt;&lt;br /&gt;जिजामाता नगरचा प्रकल्प असेल गोपाळ नगरच प्रकल्प आहेस &lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑन आदित्य ठाकरे आरोप&lt;br /&gt;&lt;br /&gt;भरूपुर दिलं आजुन काय पाहिजे अशी टीका होते जी जी जबाबदारी दिली ती मी पार पाडली&lt;br /&gt;&lt;br /&gt;पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडली &lt;br /&gt;&lt;br /&gt;इतरांनी जसा बाल हट्ट धरला तसा हट्ट आम्ही धरला नाही &lt;br /&gt;&lt;br /&gt;नवीन झेप घेण्याचा प्रयत्न करतोय&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी कालही, आजही आणि उद्याही सेक्युलर असेन &lt;br /&gt;&lt;br /&gt;जांभोरी मैदानात चिखल खूप होता म्हणून इथे सभा घेतली &lt;br /&gt;&lt;br /&gt;पोलिसांच्या घराचा प्रश्न आम्ही सोडून दाखवला अर्थात त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून साथ दिली &lt;br /&gt;&lt;br /&gt;आज भूमिका घेताना वरळीकरांची साथ पाहिजे &lt;br /&gt;&lt;br /&gt;वरळीकरांना ग्राह्य धरण्यात आलं आहे काही लोकांनी सात बारा नावावर केला आहे वरळीकर जसे डोक्यावर घेतात तसे आपटतात ही &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गिरणीकामगारांसाठी मोर्चा काढला मध्यरात्री एकनाथ शिंदे आले आणि गिरणी कामगारांना घर मिळाली&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;br /&gt;बेस्टचा संप सुरू असताना मी मध्यस्ती केली आणि मागण्या मान्य करून घेतल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मानधनात वाढ केली &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी उपेक्षिसंसाठी भूमिका घेतली आहे&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/edc6b00ee4269dc08db8922798dafcb117840871749411000_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला]]></title><link>https://marathi.abplive.com/photo-gallery/news/mumbai-mumbai-goa-highway-major-accident-car-and-truck-3-died-near-ratnagiri-lanja-marathi-news-1431832</link><comments>https://marathi.abplive.com/photo-gallery/news/mumbai-mumbai-goa-highway-major-accident-car-and-truck-3-died-near-ratnagiri-lanja-marathi-news-1431832#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 08:16:19 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अमोल मोरे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ मुंबई ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/photo-gallery/news/mumbai-mumbai-goa-highway-major-accident-car-and-truck-3-died-near-ratnagiri-lanja-marathi-news-1431832</guid><description><![CDATA[Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/81d1028bcd67455eca3af973eb8a8fb11784083172902954_original.jpg" width="220"/></item></channel></rss>