मुंबई : शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मित्र पक्षांबरोबर वाटाघाटी सुरु झाली आहे. शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर मित्रपक्षांची समजूत काढण्यास भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.


जागा वाटपासंदर्भात मुंबईतील रंगशारदा सभागृहात भाजप आणि मित्रपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार, रिपाइंकडून अविनाश महातेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे तर महादेव जानकर यांच्याकडून रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईसाठी मित्रपक्षांनी भाजपकडे केलेली जागांची मागणी
रिपाइं - 65 जागा
रासप - 20 जागा
शिवसंग्राम - 9 जागा

मित्रपक्षांनी भाजपच्याच चिन्हावर लढण्याचा आग्रह भाजप नेत्यांनी केला आहे. तर भाजपच्या चिन्हावर लढणार नसल्याची भूमिका रिपाइंने घेतली आहे. इतर मित्रपक्ष दोन दिवसात भूमिका जाहीर करणार आहेत.

संबंधित बातम्या

शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार


जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच!: मुख्यमंत्री


युतीत सडल्याची टीका आणि सामनाची भाषा अत्यंत चुकीची: गडकरी


25 वर्षांपासून भाजप शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतय : सामना


भाजपचा मुंबईत मेळावा, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लक्षं


राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?


एबीपी माझा सर्व्हेचा निकाल: शिवसेना स्वबळावर मुंबई पालिका जिंकू शकेल?


महापालिका निवडणुकीनिमित्त शिवसेनेचं नवं गाणं लॉन्च


युतीच्या काडीमोडनंतर उमेदवारीसाठी सर्वपक्षीय मातोश्रीवर


शिवसेना मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली : तावडे


युती तुटताच भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी


युती तुटल्यानंतर शिवसेना-भाजप खासदार पहिल्यांदाच समोरासमोर!