Manoj Jarange Patil धाराशिव : अंतरवाली सराटीत झालेली चूक पुन्हा करू नका, तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

Continues below advertisement

मराठा आंदोलक आणि मराठा (Maratha) आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील  (Manoj jarange)  हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मराठा समाजाच्या वतीने 29 तारखेला मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज (5 ऑगस्ट) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज धाराशिव शहरामध्ये जरंगे पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेऊन 29 ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

ही धमकी नाही, तुम्हाला मी हे समजून सांगतो, कारण....

एकदा आमचे डोके फुटले, अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत. आंतरवलीतील आया बहिणी दुःख सहन करावं लागलं, गुढघ्याचे ऑपरेशन झाले, मांड्यांला टाके घेतलेत. त्यामुळे फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची, आणि त्या भानगडीत पडायचं नाही. मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, गोडी गुलाबीने तुम्हाला जे करायचं ते करायचं, त्यावेळेस घडलं ते घडलं. आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. ही धमकी नाही तुम्हाला मी हे समजून सांगतो, कारण तुम्हाला ती खोड आहे. असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

Continues below advertisement

...तर मराठे कोणत्याही टोकाला जातील

आई-बहिण, पोरांवर हात पडला तर मराठे कोणत्याही टोकाला जातील, तुमच्यामुळे देशातल्या पंत्रप्रधान मोदी साहेबसहित सरकारला सुद्धा हादरा बसेल. मराठे वेळोवेळी मार खायला मोकळे नाहीत. असे म्हणत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने स्थानबद्ध केलं तर या प्रश्नावर जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय.

मुंबईच्या आंदोलनात जो नेता सहभागी होणार नाही, त्याला पाडा- मनोज जरांगे पाटील

जो नेता 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना हा इशारा दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या