एक्स्प्लोर

Maharashtra Weather: पुण्यासह विदर्भ तापला! अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये पारा 40 अंशाच्या पार, अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमान, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट

Maharashtra Weather: राज्यातील इतर भागांतही तापमानात वाढ होताना दिसत आहे. पुणे (लोहगाव) येथे ३८.५ अंश तापमान नोंदवले गेले, तर जळगावमध्येही ३८.५ अंश तापमानाची नोंद झाली.

पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असून विदर्भात तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेची (Maharashtra Weather Update) तीव्रता जाणवू लागली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.(Maharashtra Weather Update)

विदर्भातील अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ अमरावती येथे ४०.६ अंश तर वर्धा जिल्ह्यात ४० अंश तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीलाच विदर्भात उन्हाचा तडाखा वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे.(Maharashtra Weather Update)

राज्यातील इतर भागांतही तापमानात वाढ होताना दिसत आहे. पुणे (लोहगाव) येथे ३८.५ अंश तापमान नोंदवले गेले, तर जळगावमध्येही ३८.५ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूरमध्ये ३९.६ अंश तापमान नोंदवून उष्णतेची तीव्रता जाणवली. सांगलीमध्ये ३८.३, छत्रपती संभाजीनगर येथे ३८.२, परभणी व मालेगाव येथे ३८.१ अंश तापमान नोंदवले गेले. नाशिकमध्ये ३७ अंश तर धाराशिवमध्ये ३७ अंश तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये ३७.८, वाशिममध्ये ३९.२, यवतमाळमध्ये ३८.४ आणि बुलढाण्यात ३७.२ अंश तापमान नोंदवले गेले. दरम्यान, गोंदिया येथे ३६.६ अंश तापमानाची नोंद झाली. कोल्हापूरमध्ये ३०.७ अंश तर महाबळेश्वरमध्ये सुमारे ३० अंशांच्या आसपास तापमान नोंदले गेले.(Maharashtra Weather Update)

दरम्यान, हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि वेगाने वाढणारे शहरीकरण यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून त्याचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनीही यंदाचा उन्हाळा आतापर्यंतच्या तुलनेत अधिक उष्ण ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.(Maharashtra Weather Update)

जागतिक हवामान बदल निर्देशांकात भारताचा क्रमांक २३वा असून हवामान धोक्याच्या बाबतीत भारत जगात नवव्या स्थानावर आहे. तसेच २०२५ ते २०२९ हा कालावधी जागतिक तापमानाचे नवे विक्रम प्रस्थापित करणारा ठरू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. जानेवारी अखेर आणि मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेने उच्चांक गाठण्यास सुरुवात केल्याने यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (कमाल तापमान)

पुणे (लोहगाव): ३८.५

जळगाव: ३८.५

कोल्हापूर: ३०.७

महाबळेश्वर: ३००.७

मालेगाव: ३८.१

नाशिक: ३७

सांगली: ३८.३

सोलापूर: ३९.६

छत्रपती संभाजीनगर: ३८.२

परभणी: ३८.१

धाराशिव: ३७

अकोला: ४०.८

अमरावती: ४०.६

बुलढाणा: ३७.२

गोंदिया: ३६.६

नागपूर: ३७.८

वाशिम: ३९.२

वर्धा: ४०

यवतमाळ: ३८.४

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget