Uddhav Thackeray: आमचं अर्धे आयुष्य काँग्रेसविरोधात लढण्यात गेलं. बाहेसाहेबांनी भाजपसाठी अनेक वार सोसले. तडीपारला सुद्धा वाचवला, पण, काँग्रेसने कधी मातोश्रीकडे डोळे वटारले नाहीत. शब्दाला जागली, पण हीच भाजप आज शिवसेना संपवायला निघाल्याचा सडकून प्रहार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलं. 

Continues below advertisement

तरी छातीची ढाल करून आमच्यासमोर उभा राहिला होता?

उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्धवजींचं ठीक आहे, पण आदित्याने फिरायला पाहिजे. अरे, पण जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावरती हल्ले झाले, कोणाचे असे शाब्दिक किंवा काही आरोप केल्यानंतर या गधड्यांपैकी एक तरी छातीची ढाल करून आमच्यासमोर उभा राहिला होता? त्यांचा वार झेलला? अशी विचारणा केली. आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या-त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावर, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. उद्धव ठाकरे म्हणाले की, परत फोडाफोडी कशासाठी करताय? काय मिळवायचं तुम्हाला? सत्ता पिपासू किती व्हायचं? दोन, अडीच लाख सीमा सुरक्षा दल घुसवलं. कुठे घुसवलं? बंगालमध्ये, एका महिलेला हरवण्यासाठी, निवडणूक आणि स्वतःचा पक्ष जिंकण्यासाठी देशाचे सुरक्षा दल तुम्ही वापरता, कोणालाच काय वाटत नाही? अशी विचारणा त्यांनी केली.  सव्वा दोन, अडीच लाख फौज जर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी वापरत असाल, स्वतःच्या पक्षासाठी वापरत असाल, तर मणिपूरमध्ये का नाही घुसवत? अजून 12 वर्ष होऊन गेली, पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजून का नाही घुसवली? चला उद्या घुसवा, शिवसेना तुम्हाला जाहीर पाठिंबा देते, असे आव्हान त्यांनी दिले. 

हे हिंदुत्व नाही, हे भोंदुत्व 

आपल्याला विरोध करत आहेत हे तेच आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांना विरोध केला. माझ्या आजोबांना विरोध करणारे हे गोमूत्रधारी जे होते, त्याच प्रवृत्त्या परत बोकाळलेल्या आहेत. मी त्यांना गोमूत्रधारीच म्हणतो. हे हिंदुत्व नाही, हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नाही, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असल्याचे ते म्हणाले. मी मागेच सांगितलंय, मशाल वेगळी ठेवा आणि भगवा वेगळा ठेवा. छत्रपतींचा भगवा, वारकऱ्यांचा भगवा, हिंदूंचा भगवा, महाराष्ट्र धर्माचा भगवा. जो भगव्यामध्ये भेद करतो तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. त्याच्या रक्तामध्ये ही गद्दारांची, बेईमानीची अवलादीचं भेसळच रक्त असल्याची टीका त्यांनी केली. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या