मनमाड : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या मंगरुळ टोल नाक्यावर ट्रकचे टायर फुटल्याने ट्रकनं पेट घेतला. यात ट्रक यूरिया खताच्या गोणी भरुन जाणारा ट्रक जळून ख़ाक झाला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.


ट्रकला लागलेली आग इतकी भीषण होती की टोलनाक्यालाही आग लागली. आग लागल्यानंतर तातडीनं मनमाड, ओझऱ, मालेगाव, चांदवड, पिंपळगाव या भागातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सोमा टोल कंपनीच्या वतीनं आग विझवण्याचं काम सुरु आहे.

या घटनेनंतर धुरामुळे मुंबई-आग्रा हायवेवर वाहतूक थांबवण्यात आली आहे.

पाहा व्हिडिओ :