Sushma Andhare In Kolhapur : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गट आणि भाजपवर कडाडून टीकास्त्र सोडले. सुषमा अंधारे यांनी दसरा मेळावा कसा झाला याचा व्हिडिओ लावून भाषणाची सुरुवात केली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपने द्वेषाचं राजकारण सुरु केलं आहे. त्यामुळे एकमेकांकडे सगळे संशयाने पाहत आहेत. आफताबसारखी विकृतच आहेत, मरेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे, पण हेच बिल्कीस बानोत शांत आहेत, धर्म पाहून ठरवतात. फडणवीस आणि टीम भाजप विष पेरत आहे, एकसंध महाराष्ट्रासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी सर्वस्व पणाला लावले.  


राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, 2023 मध्ये मध्यावधी निवडणूक लागतील. सरकारमधील मंत्र्यांकडून महिलांवर होत असलेल्या असभ्य टीकांवरूनही त्यांनी टीका केली. महिलेवर कमरेखालचे वार केले जातात. मिंधे गटाचे कौटुंबिक पातळीवर टीका करायला उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. 


हिंदुत्व सोडलं, पण यांना व्याख्या कळलीच नाही 


सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वावरून टोला लगावला. हिंदुत्व सोडलं म्हणून सांगत असतात, पण यांना त्याची व्याख्या कळलीच नाही. डोळ्यातील पाणी पुसणारं आम्हाला हिंदुत्व हवं आहे. विघटनवादी विचार हिंदुत्व असू शकत नाही. दीपकभाऊ लय चांगला माणूस आहे. हिंदुत्व सोडल्याचे ते सांगतात. मात्र, त्यांची आणि बाळासाहेबांची गाठ कधी पडली? त्यापूर्वी काय करत होता? अशी विचारणा त्यांनी केली. अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, मी राष्ट्रवादीचे पार्सल आहे, तर मग उदयराव, केसरकर कोठून पार्सल आले? मी यादी वाचल्यास पळायला जागा मिळल्या नाही. भाजपने 2019 काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पळवून आणून त्यांना तिकिट दिलं. 


शिवसेनेतून अनेकजण आले गेले, पण शिवसेनाला काही फरक पडला नाही, राज ठाकरे, भुजबळ यांनी शिवसेना संपवायचा कधी प्रयत्न केला नाही. सुषमा अंधारे म्हणाल्या की, मोदी टेलिप्रॉम्प्टरवर बोलतात आणि एकनाथ शिंदे फडणवीसांनी दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अंधारे म्हणाल्या की, माझ्या उंचीवरुनही टीका केली गेली, पण फडणवीस यांची उंची आणि वजनही माहीत आहे, पण फडणवीस यांनी नेमका कशाचा त्याग केला? 


त्या पुढे म्हणाल्या की, मी राष्ट्रवादीची कधीही सदस्य नव्हते, तरीही गुलाबराव पाटील म्हणतात, मी राष्ट्रवादीतून आले. भाजपकडे स्वतःचे असे काय होते? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना मांडीवर घेऊन भाजपने त्यांना मोठे केले. खोके शब्द उचारला, तर कायदेशीर कारवाई करणार असे म्हटले जाते. 


इतर महत्वाच्या बातम्या