Chandrashekhar Bawankule: राज्यातील शेतकऱ्यांसंदर्भात (Farmers)एकमोठीआनंददायीबातमीसमोरआलीआहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट दिलीआहे. शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क आता माफ करण्यातआलंआहे. 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय राज्यसरकारनेघेतलाआहे. दरम्यान, फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने जिल्हा परिषद निवडणुकीआधी हा मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांनादिलासादिलाआहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश महसूल आणि वन विभागाने जारी केलाआहे.
परिणामी, आता कर्ज घेताना शेतकऱ्यांच्या खिशावर पडणारा अतिरिक्त भार कमी होणार आहे. तसेच पीक कर्जासाठी आवश्यक करारनामा, गहाणखत, तारण, हमीपत्र, आणि गहाणाचे सूचनापत्रावर मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही, अशीमाहितीराज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) दिलीआहे.
Chandrashekhar Bawankule: छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाच्या विकासासाठी ऐतिहासिक निर्णय
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील पवित्र समाधीस्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील ०.87 हे. 20 आर जमीन महसूल विभागाच्या पुढाकारातून आता समाधीस्थळाच्या विकासासाठी उपलब्ध होणार आहे. या बदल्यात, पुणे जिल्ह्यातील कोंढापुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 81 आर जमीन के.ई.एम. रुग्णालय, पुणे यांना कब्जेहक्काने प्रदान करण्याचा निर्णय शासनाच्या महसूल विभागाने घेतला आहे.
Chandrashekhar Bawankule: धर्म, इतिहास आणि आरोग्य या तिन्हींचा समतोल साधणारा हा निर्णय
धर्म, इतिहास आणि आरोग्य या तिन्हींचा समतोल साधणारा हा निर्णय म्हणजे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रती आदर व्यक्त करतानाच सार्वजनिक हिताची जपणूक करणारे शासनाचे दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे. या निर्णयामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास वेगाने होईल आणि भक्तांसाठी अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील, याचा आम्हाला विश्वास असल्याचीमाहितीराज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीदिलीआहे.
Amravati : अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे 3 कोटी 69 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे 3 कोटी 69 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीकेलंय. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, माजी खासदार उषाताई चौधरी यांच्या कन्या वर्षाताई वऱ्हाडे, स्मिताताई देशमुख, कांचनताई काकडे, शेख हारून, हेमंत वणवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळेभाजपलाअमरावती जिल्ह्यात बळप्राप्तझालेआहे.
आणखी वाचा
