बीड जिल्ह्यातील 42 हजार 443 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. या पैकी 39 हजार 324 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले.
बीड जिल्ह्याचा निकाल औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, परभणी, जालना आणि हिंगोली जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. विभागात जालना जिल्हा दुसर्या स्थानावर असून या जिल्ह्याचा निकाल 89.90 टक्के इतका लागला आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याचा 89.56, हिंगोली 80.93 आणि परभणी जिल्ह्याचा निकाल 80.89 टक्के लागला आहे.
बीड जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल :
- बीड – 94.66 टक्के
- पाटोदा – 94.32 टक्के
- आष्टी- 94.11 टक्के
- गेवराई – 91.23 टक्के
- माजलगाव – 89.20 टक्के
- अंबाजोगाई – 90.99 टक्के
- केज -93.12 टक्के
- परळी – 90.75 टक्के
- धारूर- 93.84 टक्के
- वडवणी – 93.98 टक्के
- शिरूर कासार – 92.98 टक्के