ही कार मुंबईतून इचलकरंजीकडे निघाली होती. गाडीचा टायर फुटल्याने ही गाडी रस्त्याच्या कडेला लावून सगळेजण टायर बदलत होते. मात्र त्याचवेळी मागून आलेल्या टेम्पोने कारला जोरदार धडक दिली आणि गाडीबाहेर उभे असलेले तीन जण जागीच मृत्यूमुखी पडले. तर गाडीत बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे.
परशुराम लोहार, मारुती कांबळे, संजय सुतार अशी मृत पावलेल्या तिघांची नावे असून हे सर्वजण इचलकरंजी येथील राहणारे आहेत.