समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी, वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान घडली घटना
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Samruddhi Highway Accident) झाल्याची घटना घडलीय. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Samruddhi Highway Washim Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Samruddhi Highway Accident) झाल्याची घटना घडलीय. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यावरुन नागपूरच्या उमरेडला जाणाऱ्या कारला वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे.
वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 215 नागपूर कॉरिडॉरवर कारचे नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकल्याने वाहनातील वैदीही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला असून चेतन जयस्वाल राधेश्याम जयस्वाल आणि संगीता जयस्वाल गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वाशिम इथं दाखल करण्यात आलं आहे. मृत झालेले आणि जखमी हे सर्वजण पुण्यावरुन नागपूरच्या उमरेड इथं जात होते.
गेल्या आठवड्यातच समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
गेल्या आठवड्यातच समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीसह दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. सुनील हेकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईहून नाशिककडे आलिशान मर्सिडीज गाडीतून प्रवास करत होते. मात्र, समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीने तीन वेळा पलटी मारली आणि सुनील हेकरे हे गाडीतून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या 4 थ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या महामार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हा नवा मार्ग हा अपघाती मार्ग ठरतोय का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. याआधी कसारा-शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होते. ही दुर्घटना वाशिंद आणि आमने दरम्यान घडली होती. अब्दुल पाशा शेख (65) आणि जाहीद सिद्दिकी (40) अशी मयत प्रवाशांचे नाव आहेत. अपघातग्रस्तांमध्ये दोन लहान मुले, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या:


















