ओबीसी समाजाचं बारामतीत ठिय्या आंदोलन, मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी, ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
बारामतीत ओबीसी बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केलीय.
Pune : बारामतीत (Baramati) काल ओबीसी (OBC) बांधवांचा एल्गार मोर्चा पार पडला. यानंतर आता त्याच ठिकाणी ओबीसी बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. जर प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरंदमध्ये घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचे व्हिडीओ प्रशासनाला दिले तरीही कारवाई नाही
पुरंदर (Purandar) येथे उमाजी नाईक जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्यावेळी घेराव घालून निषेध करण्याचा इशारा देखील ओबीसी बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजालाबद्दल अपशब्द वापरला होता. तसेच त्यांचे कार्यकर्ते देखील आमच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट करत असल्याचे मत ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचे व्हिडीओ देखील आम्ही प्रशासनाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. 1 तारखेपासून मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. 5 तारखेला आम्ही भव्य मार्चो देखील काढला आहे. मोर्चानंतर आम्ही इथं आंदोलनाला बसलो आहो. आणखी सरकार गुन्हा दाखल करत नाही. सरकार कशाच्या दबावाला बळी पडत आहे समजत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आमचं सरकार असतानाही आमच्यावर अन्याय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुरंदर येथे उमाजी नाईक जयंतीच्या निमित्ताने येणार आहेत. यावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आहोत. तुम्ही आमच्या राजाजवळ नतमस्तक होतात. पण दुसरीकडे ओबीसींवर आन्याय होत आहे. आमचं सरकार असताना त्याचा लाभ होत नाही, मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होत नसल्याचे मत ओबीसी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. मुखयमंत्र्यांना आम्ही जाब विचारणार आहोत, वेळप्रसंगी आंदोलन देखील करणार असल्याची भूमिका ओबीसी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























