पुणे: पुण्यातील कचरा प्रश्नाचा आज बावीसावा दिवस आहे. अजूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही.


फुरसुंगी कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही, तर मी राजीनामा देईन, असा इशारा शिवसेना नेते आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.

विजय शिवतारे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी फुरसुंगी कचरा डेपोला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली.



15 दिवसात अॅक्शन झाली नाही तर मी इथे येऊन बसणार, असाही इशारा विजय शिवतारे यांनी दिला. पालकमंत्री गिरीष बापट आले नाहीत त्यांचा निषेध, पण इथून पुढे जबाबदारी माझी, असंही यावेळी शिवतारे म्हणाले.

PHOTO: पुण्याचा कचरा - गावकऱ्यांचं मूक आंदोलन

दरम्यान, गावकऱ्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन सुरु केलं आहे.

काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न?

पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे.

इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो.

त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 19 दिवस केल्यास, 22 हजार टनांपेक्षा जास्त कचरा पुणे शहरात पडून आहे.

संबंधित बातम्या


शिवसेनेने पुणे महापालिकेसमोर कचरा फेकला


पुण्यातील कचराकोंडी 20 व्या दिवशीही कायम 

19व्या दिवशीही पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य

आयुक्त कुणाल कुमार पुण्यात, फुरसुंगी कचरा डेपोला भेट

पुण्याचा ‘कचरा’, सांस्कृतिक राजधानीची ‘कोंडी’

ग्रामस्थांकडून फुरसुंगी कचरा डेपोची अंत्ययात्रा, तर मनसेचंही आंदोलन 

पुण्याच्या कचराप्रश्नी आता पंतप्रधान मोदींनी लक्ष द्यावं: सुप्रिया सुळे