एक्स्प्लोर
Prithviraj Chavan: तत्कालिन सरकारने मालेगाव खटला ATS कडे दिला, केंद्राने खटला NIA ला दिला, 2014 पासून शाहांनी NIA चालवलं, कोर्टानं सांगितलं पुरावा नाही; पृथ्वीराज बाबांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाणांनी मालेगाव प्रकरणी निकाल आल्यानंतर भाजपची प्रतिक्रिया पाहून गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? अशी विचारणा केली होती.

Prithviraj Chavan on Amit Shah over Malegaon Blast
Source : facebook
Prithviraj Chavan: मालेगाब बाॅम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी हा खटला तत्कालिन सरकारने एटीएसकडे दिला होता. त्यांनी काही लोकांना अटक केली. त्यानंतर केंद्र सरकारने हा खटला एनआयएकडे दिला होता. 2014 पासून अमित शाह एनआयए चालवतं आहे, कोर्टाने खटल्यानंतर सांगितले पुरावा नाही, कोर्टाने ब्लास्ट झाला हे सांगितले, पण कोणी केला हे सांगितले नाही. हे काम भारत सरकारने करायला हवे, मुद्दाम कमी पडले असे म्हणावे, तर माझ्याकडे पुरावा नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी मालेगाव प्रकरणी निकाल आल्यानंतर भाजपची प्रतिक्रिया पाहून गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? अशी विचारणा केली होती. तसेच त्यांनी भगवा दहशतवाद उल्लेख चुकीचा म्हणत 'सनातन टेरर' शब्द वापरला होता. तेव्हापासून भाजपकडून त्यांच्याविरोधात जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण यांच्याविरोधात शिंदे गटाकडून आंदोलनही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी शाहांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
तपास यंत्रणांवर दबाव आहे का? पाहायला हवं
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दहशतवाद हा दहशतवाद आहे त्याला धर्माचे लेबल लावू नका. एकाचवेळी निकाल आले हा विषय वेगळा आहे. मुंबई ट्रेन साखळी बाॅम्बस्फोट आणि मालेगाव या दोन्ही खटल्यामध्ये वरच्या न्यायालयात दाद मागायला हवी, असे ते म्हणाले. तपास यंत्रणांवर दबाव आहे का? पाहायला हवं, असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, मालेगाव ब्लास्टबद्दल मुख्यमंत्री काही बोलणार नाहीत. कारण याबाबत दिल्लीचे नियंत्रण आहे. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना बोलत येणार नाही.
खंडणीला राजाश्रय मिळाला
राज्यात उद्योगांवरूनही चव्हाण यांनी तोफ डागली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात उद्योग का येत नाही? बीडची घटना का घडली तर दोन कोटीची खंडणी दिली नाही. पुण्याच्या औद्योगिक प्रकल्पात खंडणी सुरू आहे. अजित पवारांच्या गय केली जाणार नाही या वक्तव्याचे स्वागत करतो. खंडणीला राजाश्रय मिळाला असून मुख्यमंत्र्यांच्या लेव्हलला कारवाई होऊ शकते. कुठलाही गुंड राजाश्रय असल्याशिवाय रोखठोक काम करू शकत नाही. खंडणीखोरांचा बंदोबस्त फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करू शकतात, असे ते म्हणाले. नेहरूंना मुंबई गुजरातला द्यायची होती हे मूर्खपणाचे वक्तव्य आहे. नेहरुंनी एकभाषिक राज्यासाठी गळ घातल्याचे ते म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 105 जणांनी बलिदान दिलं असून हे वक्तव्य चुकीचं असल्याचे ते म्हणाले.
थातुरमातुर कारवाई करत खाते बदलले
कोकाटेंवरील कारवाईवरूनही चव्हाण यांनी टीका केली. त्यांनी सांगितले की, माणिकराव कोकाटे रमी खेळताना लोकांना दिसले. त्यानंतर लाजेखातर त्यांचे खाते काढले. निवडणुकीपूर्वीचे वायदे विसरले असून मुख्यमंत्र्यांनी थातुरमातुर कारवाई करत खाते बदलले आहे. अनेक प्रकरणे दडपली जात आहेत. काही दिवसांनी मंत्रिमंडळातून काढून टाकणार सांगितले जात आहे. रमी सवय लागणार गोष्ट आहे म्हणतात, आदत लग सकती हे म्हणतात. ऑनलाईन जुगार हा मोदींनी सुरू केला. 'चंदा लो' मुळे हे सुरू झाले आहे. इतर राज्यांनी जुगार बंद केला आहे. तुमच्या राज्यातही धाडसी निर्णय घ्या, अशी मागणी त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
























