Prakash Ambedkar : आपल्या आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav thackeray) मैत्रीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच (NCP) खोडा घालत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. ते आज अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी अनेक रुपकं वापरत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर टीका केली. ठाकरे आणि आमचा साखरपुडा झालाय. मात्र, लग्नाच्या मुहूर्तासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीरुपी दोन भटजीच अडथळे आणत असल्याचं आंबेडकर म्हणालेत. 


वेळप्रसंगी बिना लग्नाचं राहू, परंतू, दुसरं स्थळ पाहणार नाही


राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राजकीय अस्पृष्यता पाळतात. आता मी एकाएकाची पोलखोल करणार आहे. मी आतापर्यंत कुटुंबामुळं शांत होतो. कुटूंबातील मुलं मोठी झालीत, त्यामुळं आता काही लोकांबद्दल बोलणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. वेळप्रसंगी बिना लग्नाचं राहू, परंतू, दुसरं स्थळ पाहणार नसल्याचं सांगत त्यांनी इतर दुसऱ्या पक्षांशी आघाडी करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच दुसरा मार्गच नसल्यानं स्वबळावर लोकसभेच्या 48 जागांची तयारी सुरू केल्याचं आंबेडकर म्हणाले. 


महाविकास आघाडीतील नाराज पक्षांशी स्वत:हून संपर्क साधणार नाही


दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्याही नाराज पक्षांशी स्वत:हून संपर्क साधणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं. महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी यांना कुणाशी लढायचं यावरुन संभ्रम आहे. यांच्यापैकी कुणाशीच आघाडीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. शिवसेनेच्या ठाकरे गटाने लोकसभेसाठी पाच जागांचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चेचे प्रकाश आंबेडकरांनी खंडन केलं आहे. दरम्यान, सुजात आंबेडकर अकोल्यातून लोकसभा आणि विधानसभेची कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 


महत्त्वाच्या बातम्या:


Prakash Ambedkar : नरेंद्र मोदी हे देशाला धोकादायक, त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार करावा : प्रकाश आंबेडकर