तसंच भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने सहकार संस्था आणि शिक्षण संस्था मोडायचा उद्योग लावल्याचा आरोपही पतंगराव कदम यांनी केला आहे. सांगलीत पत्रकारांशी वार्तालाप करताना पतंगरावांनी स्वपक्षीयांसह भाजपवर जोरदार शरसंधान साधलं.
आपली राजकीय कारकीर्द धोक्यात आणण्यासाठी सांगलीपासून दिल्लीपर्यंत कटकारस्थानं झाली. माझ्याविरोधात लॉबिंग झालं. मात्र मी सर्वांना पुरुन उरल्याचं म्हणत पतंगराव कदमांनी स्वपक्षीयांवर नाव न घेता टीका केली.