Marathi Sahitya Sammelan : ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी त्यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीत आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) तीव्र आंदोलन छेडले आहे. “विश्वास पाटील यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी आणि कादंबरीतील आक्षेपार्ह मजकुरात दुरुस्ती करावी, अन्यथा साहित्य संमेलन उधळून लावले जाईल,” असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

Continues below advertisement

संभाजी ब्रिगेडने विश्वास पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत “ते जेम्स लेनचे मावस भाऊ आहेत का?” असा सवाल उपस्थित केला आहे. “संभाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे लिखाण करून महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली आहे,” असा आरोप करत ब्रिगेडने संतप्त भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी साताऱ्यातील पवई नाका परिसरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विश्वास पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशीही या प्रकरणी चर्चा झाल्याची माहिती ब्रिगेडच्या वतीने देण्यात आली.

Marathi Sahitya Sammelan : विश्वास पाटील माफी मागणार का?

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने मध्यस्थी करत संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत कादंबरीतील वादग्रस्त मुद्दे, माफीची मागणी आणि संमेलन शांततेत पार पडावे याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “विश्वास पाटील यांनी जर माफी मागितली नाही, तर आम्ही यापूर्वी दिलेला इशारा मागे घेणार नाही.” त्यामुळे संमेलन अध्यक्षीय भाषणात विश्वास पाटील माफी मागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

Marathi Sahitya Sammelan : शरद पवारांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाही? 

दरम्यान, एकीकडे रयत शिक्षण संस्थेतील दररोज सुमारे 1 हजार विद्यार्थ्याना साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्यासाठी फर्मान काढण्यात आले आहे. दुसरीकडे रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख शरद पवार असून देखील साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नसल्याची शरद पवारांच्या कार्यालयाची माहिती आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याकडून मात्र शरद पवारांना 2 वेळा निमंत्रण देण्यासाठी गेलो असता त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर भेट झाली नसली तरी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक वि. जा. पिंगळे यांनी बारामती हॉस्टल येथे जाऊन सचिवांकडे निमंत्रण दिल्याचा दावा केला आहे.   

आणखी वाचा 

BJP Municipal Corporation Result 2026: महानगरपालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपचा विजयाचा सपाटा, आठ नगरसेवक जिंकले, कल्याण डोंबिवली -3, धुळे -3, पनवेल-1, भिवंडीत एका उमेदवाराचा विजय