Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : हिंदुत्व आमच्या डीएनएमध्येच आहे, पण उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंदुत्वाचा त्याग केला आहे. आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले आहेत असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या दारात जाऊन बसले आहेत. त्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे तुमचे आवडते काम दिले आहे. आता हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार उरलेला नाही असे बावनकुळे म्हणाले. 

मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही

भाजपचा “सौगात-ए-मोदी” हा कार्यक्रम नाही, ही विकासाची गॅरंटी आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या सरकारने देशाला 24 तास वीज, पाणी, रस्ते, घरं आणि रोजगार दिला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना ते घरात बसून राहिले आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडून टाकली. अहोरात्र जनसेवेचा ध्यास घेऊन देशसेवा करणाऱ्या मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही असेही बावनकुळे म्हणाले. गुन्हेगार, बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या आणि समाजविघातक तत्त्वांना सरंक्षण देणाऱ्या प्रवृत्तींचा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस कायद्याच्या मार्गाने व्यवस्थित बंदोबस्त करीत आहेत. पण आता हेच लोकं उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत? याची उत्तरं आधी त्यांनी जनतेला द्यावीत असेही बावनकुळे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंनी जनतेला काय दिलं? बावनकुळेंचा सवाल 

हिंदुत्व भाजपचा डीएनए असल्याचे बावनकुळे म्हणाले. तर उद्धव ठाकरेंकडे मात्र औरंगजेब फॅन क्लबचे नेतृत्व असल्याची टीका त्यांनी केली. समाजविघातकांचा देवेंद्र फडणवीस बंदोबस्त करताहेत पण हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय? झाले असा सवाल देखील बावनकुळेंनी उपस्थित केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. “सौगात-ए-मोदी” नाही, तर ही विकासाची गॅरंटी मोदी आहेत. उद्धव ठाकरेंनी जनतेला काय दिलं? असा सवाल देखील बावनकुळेंनी उपस्थित केला आहे. 

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. ईदच्या निमित्ताने भाजपने सौगात ए मोदी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी 32 हजार भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन  सौगात ए मोदी देणार आहेत. हे काय सौगात ए मोदी नाही तर हे सौगात ए सत्ता असल्याचे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, याचं एक हे निर्लज्य उदाहरण असल्याचे ठाकरे म्हणाले. ही सोगात ए सत्ता ही बिहारच्या निवडणुकीपूरती राहणार आहे की नंतर सुद्धा राहणार आहे, भाजपनं जाहीर करावं असे ठाकरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

वर्षभर मुस्लिमांच्या नावाने शिमगा अन् निवडणुका आल्या की पुरणपोळी, 'सौगात ए मोदी' वरुन ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल