Maharashtra Breaking News : चंद्रपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. आज दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल. महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू..
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आज दिल्लीत अधिवेशन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठवे राष्ट्रीय आधिवेशन आज अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हे आधिवेशन दिल्लीमध्ये होणार असून, या आधिवेशनात 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या आधिवेशनात सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे
क्वीन एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही.
JEE Advanced परीक्षेचा आज निकाल
IIT मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा JEE Advanced चा निकाल 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. JEE Advanced चा निकाल jeeadv.ac.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे
आशिया कप फायनलमध्ये श्रीलंका-पाकिस्तान आमने सामने
श्रीलंका आणि पाकिस्तान(India vs Pakistan) या दोन संघामधील एक जण आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेच्या चषकावर नाव कोरणार आहे. दोन्ही संघाची स्पर्धेतील सुरुवात खास झाली नसतानाही त्यांनी अंतिम सामन्यापर्यंत धडक घेतली आहे. दरम्यान आता आशिया कप फायनलचा महामुकाबला दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातच (Dubai International Stadium) होणार आहे. उद्या संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.
मंदिरात दरोडा टाकणाऱ्या 8 दरोडेखोरांना बेड्या, गुन्ह्यात वापरलेल्या गाड्यांसह सोनं केलं हस्तगत
उल्हासनगरच्या डामाराम साहिब मंदिरात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या 4 दरोडेखोरांना विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वी या दरोड्यात सहभागी असलेल्या 4 दरोडेखोरांना ठाणे गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे आता एकूण अटक दरोडेखोरांची संख्या 8 वर गेलीये.
चंद्रपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू
चंद्रपूर : वीज पडून चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. आज दुपारपासून चंद्रपूर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथे शेतात काम करताना शरद मुनघाटे ( वय 50) यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. दुसऱ्या घटनेत ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथे शामल लोळे या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या.
Pune : मागील पाच तासांपसून पुण्यात मुसळधार पाऊस
Pune : मागील पाच तासांपसून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. चंदननगर पोलिस स्टेशन, वेदभवन, कोथरुड, वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड, लमाण तांडा, पाषाण,सोमेश्वर वाडी, पाषाण,वानवडी, शितल पेट्रोल पंप, बी टी ईवडे रोड,काञज उद्यान या परिसरासह अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलं आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर टेम्पोचा बर्निंग थरार; वाहतूक ठप्प
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात कडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हालोली येथे भीषण आग लागली आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असला तरी अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी न पोहोचल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. या आगीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
Pune : मुसळधार पावसामुळे पुण्यात पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळलं
Pune : मुसळधार पावसामुळे पुण्यातील धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळले. यात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र सोसायटीत राहणारे अनिल पावसकर आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या दारातच हे भले मोठे झाठ कोसळल्याने बाहेर येऊ शकत नाहीत. अग्निशमन दलाने झाड हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचं निधन
जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचं निधन झाले आहे. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरु म्हणूनही ओळख. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यात अखेरचा श्वास घेतला.
धक्कादायक! औरंगाबादच्या खामगावातील घरांमध्ये घुसले पावसाचे पाणी, जनजीवन विस्कळीत
Aurangabad Rain: औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे झालेल्या जोरदार पावसानंतर गावात पाणी घुसले आहे. गावामध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असून, आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आगे.
पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात आणि पुढील 3 दिवसांत विदर्भात मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज
पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात आणि पुढील 3 दिवसांत विदर्भात मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज
राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार बोलले नाहीत
राष्ट्रवादीच्या अधिवेशनात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, फौजिया खान, जयंत पाटील सगळे बोलले...पण अजित पवार बोलले नाहीत... राष्ट्रीय अधिवेशन असल्याने राष्ट्रीय प्रोटोकॉल पाळले गेले असल्याचा अंदाज
wardha news: लहान आर्वी येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट, सुदैवानं जीवितहानी टळली
Shivsena : प्रभादेवी राडा: अटक केलेल्या शिवसैनिकांवरील भादंवि 395 नुसार दाखल गुन्हा मागे
Shivsena : अटक केलेल्या पाच शिवसैनिकांची पोलीस स्टेशनमधूनच टेबल जामीन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसैनिकांवर भादंवि कलम ३९५ कलमनुसार दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets