Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली. मराठी जागर परिषद भरवण्याचे राज ठाकरेंनी आदेशही दिले आहेत. तर राज्यात...More
गडचिरोली : इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री निर्माण झाल्यानंतर याचा गैरफायदा घेत एका युवकाने युवतीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी एका युवकाला दिल्लीतून अटक केली आहे. शहानवाज मलिक (22) असे आरोपीचे नाव आहे. अहेरीतील एका तरुणीची दिल्लीच्या शहानवाज या युवकाशी मैत्री झाली. हा युवक कामाच्या निमित्ताने थेट अहेरीत पोचला. त्याने युवतीशी अनेकदा शारीरिक संबंध साधले. मुलीचे दुसरीकडे लग्न जुळले असताना तुझे लग्न होऊ देणार नाही, असे म्हणत त्याने अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. मुलीच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांच्या पथकाने दिल्ली येथून शाहनवाज मलिक याला बेड्या ठोकल्या. त्याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने आरोपीस 21 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नागपूर : भांडेवाडी परिसरात महापालिकेच्या कचरा डम्पिंग यार्डमध्ये आग लागली आहे. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगामधून धूर निघताना दिसून आले आणि पाहता पाहता कचऱ्याचा एक मोठा ढीग आगीत धुमसू लागला. महापालिका आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कचऱ्याचे ढिगाऱ्यात आग लागल्यामुळे मोठ्या ज्वाळा ऐवजी धूर जास्त निघत असून संपूर्ण परिसरात धूर पसरला आहे.
मुंबई : शहराच्या विकासात कायम स्वतःच्या अहंकारापायी, हट्टापायी खोडा घालणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिलेल्या गारगाई धरणाला विरोध केला तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
कोपरगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सचिन लोहाडे, अमित लोहाडे यांच्या नामांकित सचिन वाच हे घड्याळाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांचे महागडे घड्याळ रोख रक्कम चोरून नेल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडलीय. दुकानाच्या आजूबाजूला cctv लावण्यात आले आहेत. 5 ते 6चोरट्यांनी बिनधास्तपणे दुकानाच्या शेटरला चादरीचा आडोसा धरून चोरट्यांनी शटर वाकवून दुकानात प्रवेश करत महागडे घड्याळ अन् रोख रक्कम चोरी करत पोबारा केला आहे.
Sangram Thopate पुणे : राज्यातील काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा (Sangram Thopate Resignation to Congress) दिला आहे. शिवाय ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी उद्या (20 एप्रिल ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.
Sangram Thopate पुणे : राज्यातील काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा (Sangram Thopate Resignation to Congress) दिला आहे. शिवाय ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी उद्या (20 एप्रिल ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.
यवतमाळ: घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा जीव जातो ही राज्याच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. राजकीय स्वार्थापोटी सरकारचं जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष नाही. राज्यात हजारो गाव पाणीटंचाईग्रस्त आहेत. सरकार जनतेला पाणी देऊ शकत नाही. मात्र सरकारमधील नेते मानापनाच्या नाट्यात , तर कुठे पालकमंत्री पदाच्या वादात अडकलेली आहेत. ज्याप्रमाणे राज्यातील जलाशय कोरडी झाली आहेत त्याप्रमाणे राज्यकर्त्यांची मनेही जनते प्रती कोरडी झाली असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे.
मुख्यमंत्री यांच्या कल्पनेतून, आदिवासी संस्कृती जिवंत राहिली पाहिजे यासाठी नागपुरातील सुराबर्डी येथे अत्याधुनिक आदिवासी अधुनियक संग्रहालयाची निर्मिती होणार आहे. 15 एकर मध्ये या संग्रहालयाची निर्मिती होणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली.या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी 132 कोटी रुवयांच्या निधी दिला आहे.आदिवासी समाजाचे अनेक वैशिष्ट्य, 45 जातींचे संस्कृतीचे दर्शन या संग्रहालयाच्या माध्यमातून होईल असेही उईके म्हणाले. या संग्रहालयात आदिवासी नृत्य,दागिने, कपडे याचे दर्शन होणार आहे.
राज्यात लवकरच कृत्रिम वाळू मिळणार..नवीन वाळू धोरणानुसार राज्य सरकारचा निर्णय..
वाळू चोरी प्रश्नावर सरकार आक्रमक...
राज्यातील ५७ वाळू डेपोच्या कारभाराचा अहवाल पुढच्या तीन दिवसात विभागीय आयुक्तांना सादर करण्याचे आदेश...
कालच रात्री नागपूर जिल्ह्यातील १० वाळू डेपो राज्यारकरने बंद करण्याचा निर्णय घेतल्याची बावनकुळे यांची माहिती..
Beed News : बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे 45 दिवसांपूर्वी जुन्या वादातून घोडके कुटुंबाला मारहाण झाली होती. या मारहाणीत संजीवनी घोडके आणि कृष्णा घोडके या दोघा आई मुलाचा समावेश होता. या प्रकरणात सहा जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात केवळ एक आरोपी अटक असून इतर पाच आरोपी फरार आहेत. दरम्यान यात न्याय मिळण्याच्या मागणीसाठी घोडके कुटुंबांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. मात्र यात काहीच हालचाली होत नसल्याने ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
Beed News : बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे 45 दिवसांपूर्वी जुन्या वादातून घोडके कुटुंबाला मारहाण झाली होती. या मारहाणीत संजीवनी घोडके आणि कृष्णा घोडके या दोघा आई मुलाचा समावेश होता. या प्रकरणात सहा जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात केवळ एक आरोपी अटक असून इतर पाच आरोपी फरार आहेत. दरम्यान यात न्याय मिळण्याच्या मागणीसाठी घोडके कुटुंबांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. मात्र यात काहीच हालचाली होत नसल्याने ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
Beed News : बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे 45 दिवसांपूर्वी जुन्या वादातून घोडके कुटुंबाला मारहाण झाली होती. या मारहाणीत संजीवनी घोडके आणि कृष्णा घोडके या दोघा आई मुलाचा समावेश होता. या प्रकरणात सहा जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात केवळ एक आरोपी अटक असून इतर पाच आरोपी फरार आहेत. दरम्यान यात न्याय मिळण्याच्या मागणीसाठी घोडके कुटुंबांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. मात्र यात काहीच हालचाली होत नसल्याने ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
Beed News : बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे 45 दिवसांपूर्वी जुन्या वादातून घोडके कुटुंबाला मारहाण झाली होती. या मारहाणीत संजीवनी घोडके आणि कृष्णा घोडके या दोघा आई मुलाचा समावेश होता. या प्रकरणात सहा जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात केवळ एक आरोपी अटक असून इतर पाच आरोपी फरार आहेत. दरम्यान यात न्याय मिळण्याच्या मागणीसाठी घोडके कुटुंबांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. मात्र यात काहीच हालचाली होत नसल्याने ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
Beed News : बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे 45 दिवसांपूर्वी जुन्या वादातून घोडके कुटुंबाला मारहाण झाली होती. या मारहाणीत संजीवनी घोडके आणि कृष्णा घोडके या दोघा आई मुलाचा समावेश होता. या प्रकरणात सहा जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात केवळ एक आरोपी अटक असून इतर पाच आरोपी फरार आहेत. दरम्यान यात न्याय मिळण्याच्या मागणीसाठी घोडके कुटुंबांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. मात्र यात काहीच हालचाली होत नसल्याने ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीत घेऊन शासनाची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा घोटाळा नागपूर शिक्षण विभागात उघडकीस आला होता.. त्यानंतर आता अमरावती विभागातही चौकशी होणार आहे. याबाबत एसआयटीमार्फत चौकशीची मागणी राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या पदवीधर सेलचे अमरावती विभागातील प्रदेश सहसंयोजकांनीच केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्र प्रधान सचिवांकडे चौकशी व योग्य कार्यवाहीसाठी केले आहे. हे पत्र देखील हाती लागले आहे.. त्यामुळे आता अमरावती विभागातील शालार्थ आयडीमध्ये नेमके काय झाले, हे समोर येणार आहे.
दरम्यान अमरावती विभागातील सर्वच ठिकाणाच्या शालर्थ आयडीची चौकशीची मागणी पदवीधर सेलचे प्रदेश संयोजक मनीष गावंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती..
पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडले काँग्रेसचे बॅनर
पुण्यात दोन्ही पक्षांनी केलेल्या आंदोलनानंतर आता भाजपकडून काँग्रेसचे बॅनर फाडण्यात आले आहेत
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो असणारा पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी फाडला
या पोस्टर्सवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर झालेला कारवाईचा निषेध करण्यात आला होता
हे पोस्टर पुण्यातील निलायम थिएटर परिसरात लावण्यात आले होते
भाजपकडून हे पोस्टर्स आता फाडण्यात आले आहेत
मध्यरात्रीच्या सुमारास भंडाऱ्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे काही घरांवरील पत्रे उडालीत. तर, काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याची घटना घडली. यामुळं काही गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना रात्री अंधारात राहावं लागलं. वरळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी आंबे गळून पडल्यानं आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
* पुढच्या दोन ते तीन दिवसात विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता
* नागपूर वेध शाळेकडून इशारा
* विशेष करून पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना या उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता
- विदर्भाच्या तापमानाचा विचार करायचं झाल तर अकोल्याचे तापमान पोहोचलं 44.2 अंशावर, अकोला ठरला विदर्भातील सर्वात हॉट जिल्हा
- तर नागपुरात या मोसमातील उच्चांकी 43 अंश तापमानाची नोंद
- विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे
- ढगाळ वातावरणातही अकोल्याचा तापमान 44.2 अंश नोंदविण्यात आले
- विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे
- अमरावती 43.6, यवतमाळ येथे 43.4, चंद्रपूर 42.6, वर्धा 42.1 तर वाशिम मध्ये 42.6 अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या असलेल्या खडकपूर्णा जलाशयात अचानक हजारो माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल आहे , खडकपूर्णा जलाशयातून देऊळगाव राजा , सिंदखेड राजा , चिखली तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो मात्र जलाशयात हजारो मासे मृत पावल्याने या पाण्याला आता दुर्गंधी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आल आहे . एकाच वेळी हजारो मासे मृत पावल्याच कारण अद्याप कळू शकलं नाही. मृत माशांचे थवे चे थवे जलाशयात मोठ्या प्रमाणावर तरंगताना दिसत आहेत. या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Beed : बीड जिल्ह्यातील 167 प्रकल्पात केवळ 24 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अशातच उन्हाचा पारा वाढत असताना पाणी प्रकल्पातील बाष्पीभवन होत आहे. तलावातील पाणी कमी होत असताना अनाधिकृत पणे पाणी उपसा केला जातोय. उपजिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही याकडे प्रशासनाची कोणतीही कारवाई होत नाही.
167 प्रकल्पांमध्ये 183 दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा असून 145 प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी आहे. तर 45 प्रकल्पातील पाणी जोत्याखाली गेले आहे. शिवाय 12 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तरी देखील तलावातून अनधिकृतपणे पाणी उपसा केला जातोय. दरम्यान जिल्हाभरात अनधिकृतपणे होणारा पाणीसाठा रोखण्याचे प्रशासनासमोर आवाहन असणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून तीन मोठे राष्ट्रीय महामार्ग तर समृद्धी हा द्रुतगती महामार्ग जातो . मात्र या महामार्गांवर दिवसेंदिवस वाढती वाहतूक व बेशीस्त वाहन चालकांमुळे अपघातांच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मात्र सामान्यांचे जीव जात असल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरात बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दोन, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर दोन मोठे अपघात तर अजिंठा - बैतूल राष्ट्रीय महामार्गावर दोन असे सहा मोठे अपघात झाले. सहा दुचाकीचे ही अपघात झाले असून यात जवळपास २२ जणांचे जीव गेलेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस बेशीस्त वाहतूक वाढत असून यावर मात्र प्रशासन कुठल्याही उपाययोजना करताना दिसत नाही.
यवतमाळ-पुणे हुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या डी एन आर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
यवतमाळच्या इचोरी घाटातील नाल्यात ट्रॅव्हल्स उलटून अपघात
अपघातात 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती
पोलीस घटनास्थळी दाखल
चालक दारूच्या नशेत असल्याने मद्यपी चालकाने गाडी भरधाव वेगाने वळविल्याने अपघात
जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात केले दाखल
नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केलीय. या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीची एक दुचाकी आणि मोबाईल जप्त केले आहेत. आरोपीमध्ये यश कांबळे आणि तेजस कांबळे या सख्ख्या भावंडांचा समावेश आहे तर सोमेश शेरकर या त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला अटक करण्यात आलीय. जवळपास सव्वा लाखांचा मुद्देमाल या तिघांकडून जप्त करण्यात आला असून तिन्ही चोरटे अवघे 18 ते 20 या वयोगटातील आहेत.
नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केलीय, या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीची एक दुचाकी आणि मोबाईल जप्त केले आहेत. आरोपीमध्ये यश कांबळे आणि तेजस कांबळे या सख्ख्या भावंडांचा समावेश आहे तर सोमेश शेरकर या त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला अटक करण्यात आलीय. जवळपास सव्वा लाखांचा मुद्देमाल या तिघांकडून जप्त करण्यात आला असून तिन्ही चोरटे अवघे 18 ते 20 या वयोगटातील आहेत.
बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिक्षक सेलने केली
शिक्षक भरती घोटाळ्यात रोज नवनवीन तक्रारी पुढे येत आहे
सध्या नागपूर पोलीस भंडारा जिल्ह्यातील सकोली येथील एकाच बोगस मुख्यध्यापक प्रकरणाची चौकशी करत..
या प्रकरणात शिक्षण उप संचालक उल्हास नरड सह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे
मात्र याची व्याप्ती राज्यभर असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एसआयटी चौकशीची मागणी आहे
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मायक्रो सरफेसिंगची कामे करण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे.यासाठी निविदा काढून ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. शहरातील ५० किलोमीटर रस्त्यांवर म्हणजे साधारण तीन लाख ८० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी मायक्रो सरफेसिंगची कामे पूर्ण करण्याचे नियोजन पथ विभागाने केले आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह विलासराव पाटील- उंडाळकर आज अजित दादांच्या राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या उपस्थितीत कराड येथे जाहीर कार्यक्रमात प्रवेश करणार आहेत..उदयसिंह पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर यांचे चिरंजीव आहेत. विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे काम उदयसिंह पाटील यांनी केले होते. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादी प्रवेशामुळे अजित दादांची सातारा जिल्ह्यात ताकद वाढणार आहे.
-‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यातील शिक्षक महेंद्र म्हैसकर शिक्षण विभागाचा मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचे पोलीस तपासात पुढे...
- महेंद्र म्हैसकर नियमित शाळेत हजेरी न लावताही तो दर महिन्याला शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने वेतन उचलत होता
- म्हैसकरला पुढील चौकशीसाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय
- वेतनासाठी अपात्र असणाऱ्या शिक्षकांचे गैरमार्गाने शालार्थ आयडी तयार करून त्यांच्या नावाने वेतन उचलण्यात आल्याच्या आरोपाखाली वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे यांना अटक झालीय
- या प्रकरणात म्हैसकर याचा बनावट कागदपत्रे तयार करण्यात मोठा वाटा असल्याने त्याची चौकशीतून समोर
- म्हैसकर हा शाळा आणि शिक्षण विभागामधील मध्यस्थ म्हणून काम करत असल्याची माहिती
- बनावट कागदपत्रे तयार करण्यात त्याचा हातखंडा असल्याची माहिती
- तो गोंदिया जिल्ह्यातील शाळेत सेवेत असताना एकही दिवस शाळेत न जाता वेतन उचलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज घाटशीळ पारगाव येथील कार्यक्रम झाल्यानंतर माजलगाव येथील भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या कुटुबियांची दुपारी 3 वा भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.याआधीच भाजपा कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची जवाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेली आहे.
बीडच्या शिरूर तालुक्यात गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाची सांगता होणार आहे. आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात हा नारळी सप्ताह होतोय. त्यामुळे आज पुन्हा मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच अध्यात्मिक व्यासपीठावर पाहायला मिळतील.
आई सोबत अटोतुन खाली उतरत असतांना सात वर्षीय चिमुकल्याचा ट्रकने चिरडले ...
नागपूरच्या हिंगणा टी पॉईंटवर ची घटना ..
आहान नायक असे सात वर्षीय मुलाचे नाव असून शिकवानी वर्ग आटोपवून आई व बहिणीसोबत सोबत घरी परत येत असतांना घटना घडली ..
अपघातानंतर जखमी अस्वस्थेत असलेल्या आहान ला स्थानिक रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
एमआयडीसी पोलिसांनी ट्र्क चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मेहूल चोक्सी भारतीय आहे का?, उच्च न्यायालयाची ईडीला विचारणा...भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, पाहा एका क्लिकवर...