Maharashtra Live blog updates: रायगडच्या म्हसळामध्ये राष्ट्रवादीला धक्का; नगरपंचायत मधील अपात्र ठरलेलेल्या 7 नगरसेवकांना पत्र
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. महिला अत्याचार प्रकरणातील सातव्या गुन्ह्यात एसआयटीने घेतला आहे अशोक खरातचा ताबा. धार्मिक पुजविधी च्या बहाण्याने...More
पुण्यात ड्रग्सविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; १९ आरोपी जेरबंद, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक करत महत्त्वाची कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान समोर आले की, आरोपी एमडी (मेफेड्रॉन) सारख्या अमली पदार्थांच्या विक्रीसाठी विविध मोबाईल ॲप्सचा वापर करत होते. विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यामार्फत ड्रग्सची देवाणघेवाण केली जात होती. फक्त व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातूनच ग्राहकांशी संपर्क साधून ड्रग्स पुरवठा केला जात होता, ज्यामुळे पोलिसांना तपासात अडथळे येत होते.
पुण्यातील आयटी क्षेत्रालाही या रॅकेटने लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही इंजिनिअर्सपर्यंत हे ड्रग्स पोहोचवले जात होते. वय २० ते ४५ या गटातील व्यक्तींमध्ये एमडीचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहितीही समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून चौकशी करताना या ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे थेट राजस्थानपर्यंत पोहोचत असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही आरोपी राजस्थानमधून एमडी अमली पदार्थ आणून पुण्यात विक्री करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
पुणे पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाया केल्या जात असल्या, तरीही शहरात हे पदार्थ नेमके कुठून येतात, हा प्रश्न कायमच उपस्थित राहतो. त्यामुळे या पुरवठ्यावर आळा घालण्यात पोलिसांना आतापर्यंत पूर्णपणे यश मिळालेले दिसत नाही.
निदा खान प्रकरणाची सुनावणी उशीराने सुरू होणार
सरकारी पक्षा तर्फ़े विशेष सरकारी वकील अजय मिसर बाजू मंडणार
सरकारकडुन अजय मिसर यांची नियुक्ती
Tcs प्रकरण संवेदनशील असल्याने अजय मिसर लढवणार सरकारी पक्षाची बाजू
मिसर यांच्याकडे कागदपत्रे सुपूर्द केले जाणार असल्यानं सुनावणीला उशिरा होण्याची शक्यता
याधी सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर सरकारी पक्षाकडून करत होत्या युक्तिवाद
अजय मिसर यांनी याआधी मुबंई बॉम्ब ब्लस्टसह इतर महत्वाचे खटले चालवले आहेत
कामच्या व्यसत्तेमुळे अशोक खरात केस लढण्यास मिसर यांनी दिला होता नकार
मात्र Tcs प्रकरणात अजय मिसर यांची एंट्री
Raigad News : रायगड जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर येतेय. म्हसळा नगरपंचायत मधील अपात्र ठरलेल्या शिंदे सेनेच्या 7 नगरसेवकांचे अखेर निलंबन थांबले असून सर्वच नगरसेवक पात्र ठरल्याची माहिती नगरविकास खात्याकडून देण्यात आलीय, नगरविकास खात्याच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवक आणि अन्य 2 यासह सहित एकूण 9 जणांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला होता त्यानंतर म्हसळा नगरपंचायत राष्ट्रवादीकडून शिंदे सेनेच्या ताब्यात आली होती मात्र पक्षविरोधी कारवाया केल्यानंतर राष्ट्रवादीने या नगरसेवकां विरोधात अपात्र करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर या सर्व नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले होते.मात्र आज पुन्हा पाच महिन्यानंतर ही सर्व नगरसेवक पात्र ठरलेत.यासंदर्भातील ऑनलाइन द्वारे सुनावणी देण्यात आली ,त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदार संघातील बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. यामुळे पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे शिवसेना वर्चस्व लढाई सुरू होण्याची शक्यता आहे.
पात्र ठरलेलं नगरसेवक खालीलप्रमाणे
1) असहल असलम कादीरी
2) सोमय्या आमदानी
3) सईद जंजिरकर
4) जबिन दळवी
5) कमल जाधव
6) सारा कादीरी
7) राखी करंबे
8) सुफियान हळदे
9) नासीर मिठागरे
Raigad News : रायगड जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर येतेय. म्हसळा नगरपंचायत मधील अपात्र ठरलेल्या शिंदे सेनेच्या 7 नगरसेवकांचे अखेर निलंबन थांबले असून सर्वच नगरसेवक पात्र ठरल्याची माहिती नगरविकास खात्याकडून देण्यात आलीय, नगरविकास खात्याच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवक आणि अन्य 2 यासह सहित एकूण 9 जणांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला होता त्यानंतर म्हसळा नगरपंचायत राष्ट्रवादीकडून शिंदे सेनेच्या ताब्यात आली होती मात्र पक्षविरोधी कारवाया केल्यानंतर राष्ट्रवादीने या नगरसेवकां विरोधात अपात्र करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर या सर्व नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले होते.मात्र आज पुन्हा पाच महिन्यानंतर ही सर्व नगरसेवक पात्र ठरलेत.यासंदर्भातील ऑनलाइन द्वारे सुनावणी देण्यात आली ,त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदार संघातील बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. यामुळे पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे शिवसेना वर्चस्व लढाई सुरू होण्याची शक्यता आहे.
पात्र ठरलेलं नगरसेवक खालीलप्रमाणे
1) असहल असलम कादीरी
2) सोमय्या आमदानी
3) सईद जंजिरकर
4) जबिन दळवी
5) कमल जाधव
6) सारा कादीरी
7) राखी करंबे
8) सुफियान हळदे
9) नासीर मिठागरे
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा परिसरात मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रेलर एकमेकांवर आदळले. या भीषण अपघातात अडकलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्रदरम्यानची आहे. अपघात एवढा जोरदार होता की, दोन्ही ट्रेलरचा समोरील भाग चेंदामेदा झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. एक ट्रेलर नागपूरहून रायपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान कोहमारा शिवारात मागून येणाऱ्या ट्रेलर ने मागून जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती मागच्या ट्रेलरचे केबिन पूर्णपणे चेंदामेंदा झाले. आणि चालक स्टिअरिंगमध्ये अक्षरशः अडकून पडला. अपघाताची माहिती मिळताच कोहमारा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य सुरू केले. 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर चालकाला केबिनमधून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच गुन्हा नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविले. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून प्रकरणाचा पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत आहेत....
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात भीषण अपघात घडला आहे. भडगावकडून मुंबईकडे जाणारे वाहन कन्नड घाटातील खोल दरीत कोसळले. मात्र, सुदैवाने वाहन झाडांमध्ये अडकल्याने मोठी जीवितहानी टळली असून मोठा अनर्थ यामुळे टळला आहे, वाहनातील दोन महिला आणि दोन पुरुष असे चारही जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. कन्नड घाटातील धोकादायक वळणं आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे हा घाट पुन्हा एकदा अपघातप्रवण ठरत असल्याचं समोर आलं आहे.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात भीषण अपघात घडला आहे. भडगावकडून मुंबईकडे जाणारे वाहन कन्नड घाटातील खोल दरीत कोसळले. मात्र, सुदैवाने वाहन झाडांमध्ये अडकल्याने मोठी जीवितहानी टळली असून मोठा अनर्थ यामुळे टळला आहे, वाहनातील दोन महिला आणि दोन पुरुष असे चारही जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. कन्नड घाटातील धोकादायक वळणं आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे हा घाट पुन्हा एकदा अपघातप्रवण ठरत असल्याचं समोर आलं आहे.
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे करण्यात येणाऱ्या स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे उद्या मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से. क्र. २३ येथील तसेच क्षेत्रीय स्तरावरील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे २८ एप्रिलला पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असून २९ एप्रिलला सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.
निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून सहकार्य करावे. देखभाल-दुरुस्तीची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील.
• प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
मुंबई महानगर पालिका मुंबई विमानतळाच्या बाजूच्या पंचतारांकित हॉटेलवर मेहरबान?
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) विमानतळाजवळील (२ किमी परिसरातील) स्टार-श्रेणीतील हॉटेल्ससाठी पार्किंग नियमांमध्ये ५०% सवलत देण्याच्या तयारीत आहे
आता उपलब्ध असलेल्या पार्किंगच्या जागेपैकी ५० टक्के जागा इतर कामासाठी वापरण्याची परवानगी देण्यासाठी प्रस्ताव
हा प्रस्ताव नागरी सुधारणा समितीसमोर मांडण्यात आला असून, अद्याप त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही...
विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ (DCPR 2034) अंतर्गत सध्या हॉटेल्सना प्रत्येक १०० चौ.मी. बांधकाम क्षेत्रामागे एक पार्किंग जागा ठेवणे बंधनकारक आहे...
मात्र, हॉटेल उद्योगाने ही पद्धत कालबाह्य असल्याचे सांगत, त्यामुळे अनावश्यक आणि न वापरल्या जाणाऱ्या पार्किंग जागा निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे...
काही प्रतिनिधींनी BMC ला दिलेल्या निवेदनात सांगितले की, हॉटेलच्या एकूण बांधकाम क्षेत्रामध्ये लॉबी, कॉरिडॉर, बँक्वेट हॉल, किचन, प्लांट रूम, कर्मचारी सुविधा आणि स्टोरेज यांसारख्या जागांचा समावेश असतो...
या जागांमुळे वाहनांची रहदारी निर्माण होत नाही, तरीही त्यांना पार्किंग गणनेत धरले जाते...
त्यामुळे पार्किंगची आवश्यकता कृत्रिमरीत्या वाढते, बांधकाम खर्च वाढतो आणि जमिनीचा अपव्यय होतो.
याशिवाय, विमानतळ परिसर आणि मेट्रो मार्गांजवळील भागात सार्वजनिक वाहतूक सुविधा सुधारल्यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे....
मेट्रो, रेल्वे आणि राईड-हेलिंग सेवा (अॅप-आधारित टॅक्सी) वाढल्याने पार्किंगची गरज कमी होत आहे.
या प्रस्तावाला समितीची मंजुरी मिळाल्यास, तो पुढील सूचना आणि हरकतींसाठी जनतेसमोर ठेवण्यात येईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये आज एक नवा अध्याय लिहिला जात आहे. दोन्ही देशांमध्ये आज नवी दिल्ली येथे 'मुक्त व्यापार करार' (Free Trade Agreement - FTA) स्वाक्षरी केला जाणार आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
१००% शुल्कमुक्त प्रवेश: या करारानुसार, न्यूझीलंडने भारतीय निर्यातदारांना विविध वस्तूंवर १००% शुल्कमुक्त प्रवेश (Duty-free access) देण्याचे मान्य केले आहे. यामुळे भारताच्या कापड, औषधनिर्माण (Pharma), दागिने आणि कृषी उत्पादनांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत मोठी संधी मिळेल.
$२० अब्जची गुंतवणूक: या कराराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे न्यूझीलंड भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात होण्याची शक्यता आहे.
दरांमध्ये कपात: करारांतर्गत अनेक वस्तूंवरील आयात शुल्क (Tariffs) कमी किंवा पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार अधिक स्पर्धात्मक होईल.
हा करार अशा वेळी होत आहे जेव्हा भारत जागतिक स्तरावर आपली व्यापार क्षमता वाढवण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. भारताने अलीकडेच युरोपियन युनियन (EU), ओमान आणि युनायटेड किंगडम (UK) यांसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांसोबत मुक्त व्यापार करारांची घोषणा केली आहे किंवा त्यावर स्वाक्षरी केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, न्यूझीलंडसोबतच्या या करारामुळे केवळ वस्तूंचा व्यापारच वाढणार नाही, तर सेवा क्षेत्रातील (Services sector) तज्ज्ञांना आणि विद्यार्थ्यांनाही नवीन संधी उपलब्ध होतील. भारताच्या 'मेक इन इंडिया' मोहिमेला यामुळे जागतिक स्तरावर अधिक बळ मिळेल.
आज दुपारी दोन्ही देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार अधिकृतपणे पार पडणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ब्रेक फेल झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची कारला जोरदार धडक.... सुदैवाने प्रवासी बचावले.
कोकण दर्शन करून मुंबईत परतणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला भोस्ते घाटात अपघात.
भोस्ते घाट उतरत असताना ब्रेक फेल झाल्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर ची कारला पाठीमागून जोरदार धडक.
मागून जोरदार धडक बसल्यामुळे कार खड्ड्यात जाण्यापासून थोडक्यात बचावली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
रविवारी रात्रीची घटना.....
मुंबईच्या मरीनड्र्ईव्ह मार्गांवर पहाटे भीषण अपघात
अपघातात तीन जणांचा मृत्यू
मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक तर एक तरुण आणि तरुणी असल्याची पोलिसांची माहिती
सकाळी पावणे सहाचा सुमारास हा अपघात झाल्याची माहिती
अपघात इतका भीषण होता की तीनही जणांचा जागीच मृत्यू झाला असून अपघातग्रस्त गाड्यांच्या मोठे नुकसान
सध्या खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून, ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
एकीकडे खतांच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेतकरी अडचणीत आला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य कृषी विक्रेत्यांचा खत वाटपामधील जाचक अटीच्या विरोधात बेमुदत बंद आंदोलन आजपासून पुकारण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी १,१०० रुपयांना मिळणारी खताची गोणी आता चक्क २,००० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे शेती करणे आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले असून, शासनाच्या या उदासीनतेबद्दल ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. केवळ शेतकरी नाही, तर लहान कृषी सेवा केंद्र चालकही अडचणीत आले आहेत. मार्च महिन्यानंतर राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणांनी आणि खत कंपन्यांनी खतांच्या दरात प्रतिबॅग ४०० ते ५०० रुपयांची वाढ केली आहे. ज्या खतांच्या बॅगसाठी शेतकऱ्यांना पूर्वी १,००० ते १,१०० रुपये मोजावे लागत होते, त्याच बॅगसाठी आता १,८०० ते २,००० रुपये द्यावे लागत आहेत. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य कृषी विक्रेत्यांनी अनधिकृत एच टी बी टी वियाणे विक्रीच्या विरोधात, खत कंपन्याकडून केल्या जाणारी लिंकिंग च्या विरोधात, अवैध कीटकनाशके व खते थेट शेतकन्याला अनाधिकृत एजंट द्वरे विक्री करण्याच्या विरोधात, जाचक साधी ऍपच्या माध्यमातून वियाणे विक्री अनिवार्य करण्याच्या विरोधात, किरकोळ खत विक्रेत्यावर लादलेल्या जाचक नियम च्या विरोधात, कीटकनाशक कंपनी कडून एक्सपायरी मटेरियळ वापस नं घेण्याच्या विरोधात, नवीन लागू होणारे जाचक वियाणे व कीटकनाशक कायदा विरोधात हे बेमुदत बंद आंदोलन पुकारले आहे.
काश्मीरमधील दारुल उलूम संस्था ‘प्रतिबंधित’ घोषित; प्रशासनाचा मोठा निर्णय
जमात ए इस्लामीसोबतचे संबंध आले समोर
जम्मू-काश्मीर प्रशासनाने शोपियां जिल्ह्यातील दारुल उलूम जामिया सिराज-उल-उलूम, इमाम साहिब या धार्मिक शैक्षणिक संस्थांना बेकायदेशीर संस्था म्हणून घोषित केले आहे. हा निर्णय अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) अॅक्ट, 1967 (UAPA) अंतर्गत घेण्यात आला आहे.
काश्मीर विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, संबंधित संस्थेविरोधात शोपियांच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सादर केलेल्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान संस्थेमध्ये कायदेशीर, प्रशासकीय आणि आर्थिक अनियमितता आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, या संस्थेचे जमात-ए-इस्लामी या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध असल्याचे पुरावे समोर आले आहेत. संस्थेतील काही पदाधिकारी आणि व्यवस्थापनात या संघटनेशी संबंधित व्यक्तींचा प्रभाव असल्याचेही अहवालात नमूद आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संस्थेच्या निधी व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव, निधीच्या गैरवापराची शक्यता तसेच काही माजी विद्यार्थ्यांचा दहशतवादी कारवायांशी संबंध आढळल्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाने संस्थेला याबाबत स्पष्टीकरण देण्याची संधी दिली होती. मात्र, सादर केलेली उत्तरे अपुरी आणि तथ्यहीन असल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.
या आदेशानुसार, संबंधित संस्थेची मालमत्ता सील करणे, तसेच आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लावण्यासारखी पुढील कारवाईही करण्यात येऊ शकते.
हा निर्णय जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीर आणि देशविरोधी कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाच्या कठोर भूमिकेचे द्योतक मानला जात आहे.
अटल सेतूवरून उडी मारून जीवन संपवणाऱ्या प्रवाशाच्या मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी पत्नीची उच्च न्यायालयात याचिका
लवकरच सुनावणी होण्याची शक्यता
हद्दीच्या वादामुळे तब्बल पावणे दोन वर्ष मृत्यूचा दाखला मिळू शकलेला नाही
नवी मुंबई महापालिकेसह पनवेल महापालिका आणि उरण महापालिकेने मृत्यू आपल्या हद्दीत न झाल्याच सांगत मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिला आहे
23 जुलै 2024 रोजी डोंबिवलीचे श्रीनिवास करुतुरी त्यांनी अटल सेतूवरून उडी मारत आत्महत्या केली होती
त्यांची गाडी अटल सेतूवर बेवारस अवस्थेत सापडली होती तसेच अटल सेतूवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आत्महत्या करताना चित्रित झालं होतं
घटनेला पावणेदोन वर्ष होऊन देखील मृत्यू पत्र मिळत नसल्याने अखेर करीतुरी यांची पत्नी सुनयना यांनी रीट याचिका दाखल केली आहे
याचिकेवर न्या. रवींद्र घुगे आणि न्या. ही हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे
एसटीच्या पुणे विभागाला हव्यात 200 ज्यादा बस
एसटी प्रशासनाकडून मुख्यालयाकडे मागणी
मागणी पूर्ण झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा
सध्या पुणे विभागात एकूण 14 डेपो अंतर्गत धावतात 857 बसेस
दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, विकेटमुळे एसटीच्या बस गाड्यांना मोठी गर्दी होते आणि त्यामुळे पुणे विभागाने बस गाड्यांची मागणी केली आहे.
खरीप हंगाम २०२६ च्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने महाराष्ट्रभरातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. खतांचे दर गगनाला भिडल्यामुळे लागवड खर्च वाढला आहे, तर शेतीमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खतांच्या या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आरोप केला आहे.
पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार
विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
डेक्कन पोलिसांकडून महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल
35 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दिली तक्रार
विद्यार्थी आयएलएस लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे.
तो याच कॉलेजच्या वसतिगृहात राहतो. त्याच वस्तीगृहात राहणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी शिवीगाळ आणि मानसिक त्रास देत रॅगिंग केल्याची तक्रार देण्यात आली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी त्रस्त असलेल्या विद्यार्थ्याने डेक्कन पोलिसात अर्ज देखील दाखल केला होता. या अर्जाची पोलिसांनी माहिती घेतली होती आणि त्यानंतर आता गुन्हा देखील दाखल केलाय.
33 टक्के महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत टीका केलीय. देशातील अनेक मतदार संघ मोठे असल्याने त्यांचे विभाजन होणे गरजेचे होते मात्र नॉर्थ च्या जागा वाढतील आणि साऊथ वर अन्याय होणार म्हणून विरोधकांनी प्रचार केला.मात्र काँग्रेसच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही देशातील महिला काँग्रेसला धडा शिकवतील अस आठवले म्हणालेत.
सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का? केईएम रुग्णालयाचा नाव बदलण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
किंग एडवर्ड स्मारक म्हणजेच केईएम रुग्णालयाचे नाव बदलून 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' करण्यास मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
मात्र 'मार्ड'ने या नामांतराला जोरदार विरोध केला आहे, शिवाय ठाकरेंच्या शिवसेने कडून सुद्धा याला विरोध होताना पाहायला मिळतोय... आज ठाकरेंचे शिवसेनेकडून या विरोधात आंदोलन सुद्धा केले जाणार आहे
या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक्स पोस्ट करत केईएम रुग्णालयाचे नाव तुम्ही बदलत असाल तर इतर ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का? असा सवाल करत या सगळ्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे
'केईएम' ही प्रतिष्ठित, नामांकित आणि वैद्यकीय सेवा देणारे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय असून येथील निवासी डॉक्टरांना, वैद्यकीय तज्ज्ञांना विश्वासात न घेता नामकरणाचा परस्पर निर्णय घेऊ नये, अशी मागणी 'मार्ड' या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील आचोळे तलाव परिसरात आज पहाटे एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षांच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका नागरिकाला तलावात मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आचोळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच वसई विरार अग्निशमन दल यांच्या मदतीने मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.
मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. संबंधित इसमाच्या अंगावर शर्ट नसल्याची माहिती समोर आली असून, हा प्रकार आत्महत्या, हत्या की अपघात आहे, याचा तपास आचोळे पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर आचोळे तलाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एवढ्या मोठ्या तला
रिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. तलावाचे गेट अनेकदा उघडे असतात, रात्रीच्या वेळी येथे मद्यपी, व्यसनी आणि इतर संशयास्पद व्यक्तींचा वावर वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच कपल्सचीही येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने परिसराची सुरक्षितता आणि शिस्त राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आचोळे तलाव परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावेत, गेट्सवर नियंत्रण ठेवावे आणि रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आ
सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का? केईएम रुग्णालयाचा नाव बदलण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
किंग एडवर्ड स्मारक म्हणजेच केईएम रुग्णालयाचे नाव बदलून 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' करण्यास मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
मात्र 'मार्ड'ने या नामांतराला जोरदार विरोध केला आहे, शिवाय ठाकरेंच्या शिवसेने कडून सुद्धा याला विरोध होताना पाहायला मिळतोय... आज ठाकरेंचे शिवसेनेकडून या विरोधात आंदोलन सुद्धा केले जाणार आहे
या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक्स पोस्ट करत केईएम रुग्णालयाचे नाव तुम्ही बदलत असाल तर इतर ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का? असा सवाल करत या सगळ्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे
'केईएम' ही प्रतिष्ठित, नामांकित आणि वैद्यकीय सेवा देणारे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय असून येथील निवासी डॉक्टरांना, वैद्यकीय तज्ज्ञांना विश्वासात न घेता नामकरणाचा परस्पर निर्णय घेऊ नये, अशी मागणी 'मार्ड' या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.
बसने प्रवास करणाऱ्या 75 वर्षीय लक्ष्मण पाटील या प्रवाशाचा काटोल बसस्थानक आवारात मृत्यू झाला ...
लक्ष्मण पाटील हे लग्नसमारंभासाठी कालमेश्वरच्या तेलगाव येथून काटोल करीत बस मध्ये बसले होते.
काटोल बसस्थानकार आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
ते बसस्थानक आवारात बेशुद्ध पडले, त्यांनतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असतांना त्यांचा मृत्यू झाला.
उष्माधातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे.
शिवाजी कोण होता? पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अजूनही धमक्यांचे फोन सुरूच
रात्री-अपरात्री अनोळखी व्यक्तींकडून फोन करून आंबी यांना अश्लील शिवीगाळ
फोन करणाऱ्या नंबरची यादी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे दिली जाणार
आज कोल्हापूरच्या बिंदू चौकात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणार
आंदोलनात पुतळा दहन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार- पोलिसांचा इशारा
लातूर जिल्ह्यात उष्माघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. औसा तालुक्यातील एरंडी गावात तीव्र उन्हामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव महेश लिंबाजी इंगोले असे आहे. तो शेतातील काम आटोपून घरी परतल्यानंतर अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र उष्माघातामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वीही जिल्ह्यात उष्माघाताच्या दोन घटना समोर आल्या होत्या. औसा तालुक्यातील गोंद्री गावात नऊ महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसेच औराद शहाजनी येथे ६० वर्षीय शेतकऱ्याचाही प्रखर उन्हामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या तीन घटनांमुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा तीन वर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून दुपारच्या सुमारास तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. तीव्र उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्ग यांना विशेष धोका निर्माण झाला आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे परिधान करावेत आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
खते आणि बियाणे विक्रेत्यांच्या संदर्भात केंद्र आणि राज्यसरकारच्या जाचक धोरणाच्या विरोधासह विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यातील 85 हजार कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय, कृषी केंद्र चालकांच्या माफदा संघटने तर्फे घेण्यात आला आहे,त्याला देशभरातील अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांनी पाठिंबा दिला आहे. कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्यन झाल्यास पॉस मशीन शासनाकडे जमा करण्याचा इशारा ही संघटने कडून देण्यात आला आहे. माफदा संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांनी जळगाव येथे माहिती दिली आहे.
देशभरामधील काही राज्यासह,महाराष्ट्र राज्यातील सर्व 85 हजार कृषी सेवा केंद्र २७ एप्रिल पासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय माफदा संघटनेने दिला आहे. केंद्र तथा राज्य सरकार कडून घेण्यात आलेले निर्णय हे कृषी केंद्र चालकांच्या विरोधात आहेत,त्या निर्णयात बदल करण्यात यावा,यासह विविध मागण्या साठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांच्या विक्रीविरोधात,खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या ‘लिंकिंग’ पद्धतीला विरोध, तसेच अवैध कीटकनाशके व खते थेट शेतकऱ्यांना एजंटमार्फत विक्री रोखण्याची मागणी यांचा समावेश आहे.तसेच, ‘साथी’ पोर्टलद्वारे बियाणे विक्री सक्तीची करण्याच्या निर्णयाला संघटनेचा तीव्र विरोध असून, किरकोळ खत विक्रेत्यांवर लादण्यात आलेल्या जाचक नियमांमुळे व्यवसाय करणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. कीटकनाशक कंपन्यांकडून एक्सपायरी मटेरियल परत न घेण्याच्या धोरणावरही नाराजी व्यक्त करण्यात आली.
नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्यांमुळे विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, सरकारने तातडीने या सर्व मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा बंद आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या पीव्हीसी पाईप साठवणूक केंद्राला भीषण आग.
आगीत साठवून ठेवलेले कोट्यावधी रुपयाचे पीव्हीसी पाईप जळून खाक.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी बंदिस्त पाईप लाईनद्वारे शेतीसाठी पाणी देण्यासाठी टाकण्यात येणार होती पाईपलाईन.
जलंब ते माटरगाव दरम्यान असलेल्या तात्पुरत्या साठवणूक केंद्रात पीव्हीसी पाईपांना ही आग लागली.
आगीच कारण अस्पष्ट. खामगाव आणि शेगाव अग्निशमन दलाकडून आदीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक परवाना घेणाऱ्या चालकांसाठी प्रस्तावित “फंक्शनल मराठी” चाचणीबाबत सोमवारी ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
या बैठकीला शशांक राव यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. चर्चेत मराठी न बोलणाऱ्या चालकांनी किमान कामचलाऊ मराठी शिकावी, तसेच त्यासाठी सरकारकडून प्रशिक्षणाची सुविधा देण्याबाबत चर्चा होणार आहे.
राज्य सरकारच्या मते, या निर्णयामुळे चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद सुधारेल, सेवा अधिक चांगली होईल आणि प्रशासन सुलभ होईल. तसेच मराठी ही राज्याची अधिकृत भाषा असून ती बहुतांश प्रवाशांकडून वापरली जाते, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
मात्र, काही ऑटो आणि टॅक्सी संघटनांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने २ मेपासून रद्द करण्याच्या बातम्या “अन्यायकारक आणि बेकायदेशीर” असल्याचे त्यांनी म्हटले असून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पुढील भूमिका ठरवण्यासाठी २७ एप्रिल रोजी गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हाॅल येथे संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्ये
भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. महिला अत्याचार प्रकरणातील सातव्या गुन्ह्यात एसआयटीने घेतला आहे अशोक खरातचा ताबा. धार्मिक पुजविधी च्या बहाण्याने विवाहित महिलेवर लैगिक अत्याचार केल्याचा अशोक खरातवर गुन्हा दाखल. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरात च्या पोलीस कोठडीची सरकारी पक्षाकडून केली जाणार मागणी. युक्तिवाद दरम्यान सरकारी पक्षाकडून काय खुलासे केले जाणार यांकडे लक्ष. अशोक खरात वर आतापर्यंत 8 महिला अत्याचार आणि 9 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates: रायगडच्या म्हसळामध्ये राष्ट्रवादीला धक्का; नगरपंचायत मधील अपात्र ठरलेलेल्या 7 नगरसेवकांना पत्र