Maharashtra Live: अजित पवारांच्या विरोधातील पॅनेलचा सेनापतीच पडला, अजितदादा विरोधकांना 21-0 व्हाईटवॉश देणार?
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी आणि घडामोडींचे ताजे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यातील पावसाची स्थिती काय, राजकीय घडामोडींना वेग

पार्श्वभूमी
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात. सिल्लोड रोडवरील घटना. धाब्यावर जेवणासाठी रात्री संभाजीनगर येथून पाच मित्र फुलंब्री येथे गेले होते. रात्री जेवण करून परतत असताना अपघात . अपघात तीन जण जागीच ठार...More
एक इंचही जमीन शक्तिपीठ साठी देणार नाहीत
एक तर तुम्ही राहताल आणि तर आम्ही
परभणीत शक्तिपीठ बाधीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची होळी करत केले बोंबाबोंब आंदोलन
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला राज्यभरामधून विरोध होतोय त्यातच काल मुख्यमंत्र्यांनी सक्तीने जमीन अधिग्रहण करण्याचा आदेश दिल्याचा आरोप करत या आदेशाची होळी परभणीत शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी केलीये तसेच सरकारच्या या धोरणाचा बोंबाबोंब करत निषेधही केलाय महत्त्वाचं म्हणजे आम्ही सरकारने कितीही सक्ती केली तरीही एक इंच ही जमीन देणार नसल्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय.अधिकारी मोजणी साठी जर शेतात आले तर एक तर अधिकारी राहतील नाही तर शेतकरी राहतील असा इशाराही यावेळी दिलाय परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार बोंबाबोंब करत सरकार विरोधात घोषणाबाजी ही केलीय..
नवी मुंबई -
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाला झालेल्या अपघातानंतर महत्त्वाच्या शहरांमधील विमानतळांच्या सुरक्षेची पाहणी
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षितते संदर्भात आढावा घेण्यासाठी विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य विमानतळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दाखल.
सिडको आणि अडाणी यांच्यामार्फत करण्यात येत असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाचा दर्जा आणि प्रगतीबाबत घेणार आढावा
सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यासह १५ आमदार सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी विमानतळावर दाखल .
या समितीमध्ये राइस शेख, निलेश राणे, निरंजन डावखरे, धर्मराव बाबा आत्राम, मिलिंद नार्वेकर, वरून सरदेसाई, सुलभ खोडके, विलास भुमरे, अभिजित वंजारी यांचा समावेश
अमरावती
बच्चू कडू बाईट
विधवा महिलांना पैसे नाही दिव्यांगाने पगार नाही एमआरजीचे पैसे नाही कर्जमाफी म्हणताना तिजोरी दाखवता.
पण चार हजाराचा ताट आमदार आणि खासदार समोर मांडताना तेव्हा तुम्हाला बजेटचा आकडा दिसत नाही का..
भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळीवर ताव मारणारी माणसं ही प्रवृत्ती रावणाची प्रवृत्ती आहे
एकीकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे. रोज शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात आणि आमचे आमदार खासदार तांब्याच्या आणि चांदीच्या ताटात चार चार हजाराचं जेवण खातात..
सत्ताधाऱ्यांना मतदाराचे भय राहल नाही का.. पाच वर्षे नंगानाच केला तरी वेळेवर धर्मावर मत मिळते ही मानसिकता आहे...
ऑन आणीबाणी
आणीबाणीच आम्ही समर्थन करत नाही पण ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना मला काही सांगायचं आहे.
सौ चुहे खाके बिल्ली हजको जाती है तो गलत आहे.
तुम्ही काय केलं एकही ईडीची कारवाई भाजपच्या माणसावर का झाली नाही ही चुपी आणीबाणीच आहे ही स्पष्ट आहे.
ती फिजिकली तारीख होती तुमची चुपी आणीबाणी आहे.
विरोधात बोललो तर जेल मध्ये टाकणार आंदोलन केलं तर बँकेचे पद काढणार ही आणीबाणीचा आहे.
आणीबाणीवर बोलायचा अधिकार भाजपला नाही तो त्यांनी गमावला आहे.
भाजपमध्ये एकही भ्रष्टाचारी नाही का सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहे.
भाजपची आणीबाणी त्या सारखीच ही छुपी आणीबाणी निषेधार्थ आहे
वेळ आल्यावर शडही काढू आणि यंत्रही काढू.
ऑन कृषिमंत्री
कृषिमंत्र्यावरच तेरा कोटी रुपये कर्ज आहे त्यांच्याच मूळ त्यांची बँक तोट्यात आहे..
कोकाटेने शेतकऱ्यांना कर्ज भरायचा सल्ला देऊ नये. त्यांनी कर्जमाफीसाठी भांडले पाहिजे नाहीतर आम्हाला पुन्हा तुम्हाला घेराव लागेल
कोकाटे कर्जमाफीत बसणार नाही ती अपात्र आहे
अहिल्यानगर
Anc - अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा मांडत अनेक आंदोलनामध्ये सहभागी होत असतात त्यातच त्यांनी अक्कलकोट येथे भाषणामध्ये केलेल्या वादग्रस्त वास्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत... जगताप यांच्या वक्तव्याबद्दल काही जणांनी अजित पवारांकडे तक्रार केली आहे, यावर अजितदादांनी देखील राष्ट्रवादी पक्ष धर्मनिरपेक्ष असून संग्राम जगताप यांच्याशी बोलून त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे म्हटलं... मात्र संग्राम जगताप आपल्या वक्तव्यावर ठाम असून वेगळ्या विचाराचे लोक तक्रार करत असतील तर त्या वक्तव्याबद्दल अजितदादांशी बोलू अस म्हटलं आहे... सोबतच बैठकीला येणार नसल्याबाबत मी कळवलं होतं सध्या दिंड्यां सुरू आहेत... वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आम्ही आहोत त्यामुळे बैठकीला जाता आलं नाही असे स्पष्ट करण संग्राम जगताप यांनी दिलं.
पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचे गणवेश परिधान करून नाशिक शहरासह अनेक ठिकाणी फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला (तोतया पोलिसाला) अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलीय. सागर दिगंबर पवार असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे. तोतया पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक पत्नीचा वर्दीचा वापर करत होता. या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातला आहे पोलीस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता. नऊ महिन्यापासून सागर पवार हा फरार होता अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचून पथकाने संशयित सागरला शिताफीने अटक केलीय.
डोंबिवलीत रिक्षाचालकाची आत्महत्या; कारचालकाच्या मारहाणीने हादरले शहर
कार चालक आकाश एकनाथ म्हात्रे असे नाव
डोंबिवली मोठा गाव परिसरात रिक्षा आणि कारमध्ये धडक
अपघातानंतर कारचालकाने 70 वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेदम मारहाण करत दोन लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची केली मागणी; ...रात्री ३ वाजता रिक्षा चालकाची सुटका झाल्यानंतर रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप
दोन लाख द्यायचे कुठून या मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा नातेवाईकांचा आरोप
या घटनेनंतर डोंबिवलीतील विष्णु नगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा ठिय्या आदोलन सुरू
“जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” — नातेवाईकांचा इशारा
डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस स्थानकावर रिक्षा चालकांच्या नातेवाईकांची गर्दी
आकाश एकनाथ म्हात्रे या कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
विष्णू नगर पोलिसांकडून चौकशी सुरू
शक्तिपीठ महामार्गाला धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचा कडाडून विरोध , जिल्हाधिकारी कार्यालयात घुसत घोषणाबाजी
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांचे प्रचंड घोषणाबाजी
तर तुळजापुरात पोलीस आणि अधिकाऱ्यांमध्ये झटापट, विरोध करणारे शेतकऱ्यांची धरपकड
शेतकऱ्याची उचल बांगडी करत बळजबरीने पोलीस व्हॅनमध्ये कोंबले
शेती शिवाय आम्हाला दुसरं काही येत नाही, आमची शेती का काढून घेत आहात, शेतकऱ्यांचा सरकारला सवाल
आमच्या शेतातून महामार्ग उड्डाणपुलासारखा होत आहे, बाजूला टपरी देखील उभा करता येणार नाही आम्ही जगायचं कसं, शेतकऱ्यांचा सवाल
पैसे घेऊन आम्ही करणार काय, आमच्या उपजीविकेचे साधन शेती आहे
सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहे, सरकार समोर आम्ही हातबल आहोत, शेतकऱ्यांच्या भावना
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल होत असल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत रस्त्यावर एकच जल्लोष केलाय. अजितदादा यांच्या एकच वादा अजितदादा... आला रे आला दादाचा आला. आमचा चेअरमन अजित दादा अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत.
वसई : वसई पश्चिम येथील ६३ वर्षीय निवृत्त प्राध्यापक संतोष अच्युत शेंडे सायबर फसवणुकीचा बळी ठरले आहेत. व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवरून ‘TRAI’ आणि ‘पोलिस खटल्याची’ बनावट भीती दाखवत अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याकडून फसवणूक केली.
फसवेखोरांनी शेंडे यांना सांगितले की, त्यांच्या आधार कार्डाचा वापर करून बँक खाते उघडण्यात आले असून, त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाला आहे. जर त्यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही, तर त्यांना थेट घरी जाऊन अटक केली जाईल, अशी धमकीही देण्यात आली.
या प्रकरणी वसई पोलिस ठाण्यात BNS 2023 मधील कलम 319(2), 318(4), 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(C), 198(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गुन्हा क्रमांक 188/2025). आरोपी अद्याप फरार असून, पोलीस तपास सुरु आहे.
Malegaon Election Result 2025: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत अजित पवार गटाला यश मिळताना दिसत असून आता तावरे पॅनलला मोठा धक्का बसला आहे . अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतन कुमार साहेबराव भोसले विजयी झाले आहेत . तावरे गटाचे बापूराव आप्पा गायकवाड पराभूत झाले आहेत . 1487 मतांनी रतन कुमार भोसलेंनी निळकंठेश्वर पॅनलच्या अनुसूचित जाती मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे .
पुणे: माळेगावमधील उपप्राचार्यास लाच घेताना अटक
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पर्यवेक्षक नेमणुकीच्या बदल्यात ४० हजार रुपयांची लाच
लाच स्वीकारताना उपप्राचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली
बारामती येथील ‘हॉटेल सिटी इन’ येथे मंगळवारी ही कारवाई करण्यात आली
अवधूत भीमाजी जाधवर (वय ५३) असे अटक करण्यात आलेल्या उपप्राचार्याचे नाव आहे
अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव (ता. बारामती) येथे उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत
सध्या त्यांच्याकडे प्राचार्य पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे
तक्रारदार हे खासगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेतील परीक्षेसाठी ४५ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत
या परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्याची मागणी संबंधित शासकीय संस्थेकडे केली होती. त्या बदल्यात अवधूत जाधवर यांनी प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपयांप्रमाणे ९० हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील १० हजार रुपये आधीच तक्रारदाराकडून स्वीकारले. त्यानंतर पर्यवेक्षक नेमण्याचे पत्र दिले गेले आणि परीक्षा सुरू करण्यात आली. मात्र, उर्वरित ८० हजारांची मागणी सुरूच होती. सततच्या तगाद्यामुळे तक्रारदाराने २३ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली.
प्राथमिक पडताळणीत तडजोडीनंतर ४० हजार रुपयांवर व्यवहार ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी २४ जून रोजी बारामती येथील 'हॉटेल सिटी इन' मध्ये सापळा रचण्यात आला
तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना अवधूत जाधवर यांना ताब्यात घेण्यात आले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचा तिसरा विजय..
इतर मागासवर्गीय प्रवर्गातून नितीन शेंडे 8494 मते.. 1153 मतानी नितीन शेंडे विजयी...
सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे पराभूत त्यांना 7341 एवढी मते..
अजित पवारांचा तिसरा उमेदवार विजयी
आमदार संग्राम जगताप यांची कृती अजित पवारांची डोकेदुखी वाढवणार?
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचं अजित पवारांचं विधान तर दुसरीकडे
अजित पवारांनी बैठकीला बोलावून देखील आमदार संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला मंगळवारी दांडी
अजित पवारांनी संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत बैठकीत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली
एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आपण पुढे जात असताना एखाद्या धर्माबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान पक्षातील आमदाराने करणे पक्षाला परवडणारे नाही
संग्राम जगताप यांच्या सारखी कृती खपवून घेणार नसल्याची आमदारांसमोर अजित पवारांची स्पष्टोक्ती
आपण स्वत संग्राम जगताप यांच्याशी बोलणार असून अशा प्रकारची वादग्रस्त विधाने का करत असल्याचा जाब विचारणार असल्याची आमदाराना माहिती
सूत्रांची माहिती
निळकंठेश्वर पॅनल चा दुसरा उमेदवार विजयी.....
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रतन कुमार साहेबराव भोसले विजयी.....
तावरे गटाचे बापूराव आप्पा गायकवाड पराभूत
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे.अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले विजय झाले आहेत.जवळपास चौदाशे मतांनी रतनकुमार भोसले यांचा विजय झाला आहे.तावरे गटाच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचे बापूराव आप्पाजी गायकवाड गायकवाड हे पराभूत झाले आहेत.
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रतनकुमार साहेबराव भोसले यांना 8670 मते मिळाली, तावरे गटाचे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार बापूराव आप्पा गायकवाड यांना 7183 मते मिळाली.यात 1487 मते रतन कुमार भोसले यांना ज्यादा मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार ब वर्ग गटातून झाले होते विजयी.
पुणे जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस
धरण साखळी क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाणी साठ्यात वाढ
पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठा मध्ये वाढ झाली असून समाधानकारक जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनात या महिन्यात जास्तीच पाणी साठवणूक झाली आहे
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती जलसाठा ?
खडकवासला: 63.60 टक्के
पानशेतः 34.07 टक्के
वरसगावः 42.99 टक्के
टेमघर: 23.68 टक्के
चार ही धरणात एकूण धरण साठा: 38.67 टक्के
मागच्या वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा: 12.32 टक्के
खडकवासला धरणातून करण्यात येणार पाण्याचा विसर्ग
३८८३ क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे..
खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संतधार सुरू
-पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वाद वर आता पोस्टर वॉर सुरू
-खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर
-कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा अशा आशयाचे बॅनर शहरात विविध ठिकाणी झळकले
-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी
आता बॅनर काढून टाकण्यात आले आहे
Nashik: नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर कमी झाला असून नाशिकच्या धरणांतून होणारा पाण्याचा विसर्ग हा देखील आता कमी करण्यात आलेला आहे. काल रात्रीपासून गंगापूर धरणातून 4 हजार 400क्युसेक वेगाने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग 1हजार 760 क्युसेकने सुरू आहे. त्यामुळे गोदाकाट परिसरातील परिस्थिती ही पूर्वपदावर येत आहे. धुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत असलेले पाणी आता पायापर्यंत आले आहेत. मात्र आज देखील नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या गावांना अद्यापही सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मार्लेश्वरनंतर आता कोकणातील आणखी एका मंदिरामध्ये वस्त्रसंहिता अर्थात कंपड्यांसंदर्भातील नियम लागू करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील प्रसिद्ध स्वामी स्वरूपानंद मंदिरामध्ये कंपड्यांसंदर्भातील नियमावली लागू करण्यात आली आहे. 1 जुलै 2025 या दिवसापासून हा नियम लागू असणार आहे. त्यामुळे पावस येथील मंदिरामध्ये दर्शन घेताना सर्व भाविकांना कपड्यांचे नियम पाळावे लागणार आहेत. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळीतील कनकादित्य मंदिर, मार्लेश्वर आणि वेळणेश्वर येथे कंपड्यांबाबतची नियमावली लागू करण्यात आलीय.
Dr Shirish Valsangkar : सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर (Dr Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्या प्रकारणातील आरोपी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज (25 जून ) निर्णय होणार आहे. न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे या गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी मनीषा मुसळे यांनी न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. या प्रकरणी 23 जून रोजी सुनावणी झाल्यानंतर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. अशातच आज या जामीन अर्जावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे आता मनीषा मुसळे यांना जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हिवा ग्रुपचे एमडी मेहुल ठाकूर यांच्याविरुद्ध मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ३० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोद्दार ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहिताश्व पोद्दार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आणि मेहुल ठाकूर यांनी संयुक्तपणे 2012 मध्ये विवा पोद्दार हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. ठाकूर यांनी पोद्दार यांना गुंतवणुकीवर तिप्पट परतावा देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे,
त्यानंतर दोन्ही पक्षांनी वसई आणि विरारमधील 75 एकर जमीन स्थानिक शेतकऱ्यांकडून विकासासाठी 56 कोटी किमतीला विकत घेण्याचा करार केला. या कराराच्या आधारे, पोद्दारने नव्याने स्थापन झालेल्या संयुक्त कंपनीला ₹३० कोटी हस्तांतरित केल्याचे वृत्त आहे. तथापि, ठाकूरने स्वतःला स्वाक्षरीचे हक्क देणारा बोर्ड ठराव बनावट बनवला आणि त्यानंतर ₹३० कोटी व्हिवा होल्डिंग्जमध्ये हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर ठाकूरने निधी परत करण्यास अयशस्वी ठरले आणि चौकशी केली असता पोद्दारला धमकावण्यास सुरुवात केली. मेहुल ठाकूरला यापूर्वी २०२१ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका वेगळ्या प्रकरणात अटक केली होती आणि २०२३ मध्ये त्याला जामीन मिळाला होता.
राज्यात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणी नागपूर पोलिसांच्या एसआयटीने आणखी एका शिक्षण स्ंस्थाचालकाला अटक केली आहे. ओंकार भाऊराव अंजीकर असे अटक करण्यात आलेल्या शिक्षणसंस्थाचालकाचे नाव आहे. अंजीकर यांच्या जयहिंद उच्च प्राथमिक शाळा गुलशननगरसह जवळपास 13 शाळा असल्याचे सांगण्यात येते. येथे त्यांनी अपात्र 18 शिक्षकांची नियुक्ती करुन,बोगस शालार्थ आयडी व्दारे वेतन आणि सुमारे 10- 10 वर्षाचे एरिअर्स बिल काढल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
आता पर्यंत पोलिसांनी तीन शिक्षण संस्था चालकांच्या मुसक्या आवरल्या असून बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून ३६ शिक्षण संस्था मध्ये ३८० बोगस पद्धतीने शिक्षकांच्या नेमणूका झाल्याने सर्व ३६ शिक्षण संस्थाचालक पोलिसांच्या रडावर असल्याचे एसआयटी प्रमुख राहुल मदने यांनी सांगितले.
नागपूरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत नियमांचे पालन न करणाऱ्या स्कुल बस, व्हॅन आणि ऑटोचालकाविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे..
* स्कूल बस, व्हॅन्समध्ये अतिरिक्त विद्यार्थी बसवून बेदरकारपणे वाहतूक करणाऱ्या दीडशेहून अधिक चालकाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे..
* २३ तारखेपासून नागपुरात शाळा सुरू झाल्या आहेत.. त्यासाठी स्कूल बस व्हॅन्समध्ये आणि ऑटो ने अनेक विद्यार्थी शाळेत जातात.. त्यासाठी चालकांनी नियमाचे पालन करणे आवश्यक आहे..
* मात्र अनेक चालक नियमाचे पालन करत नसल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर ही कारवाई करण्यात आली..
* काल दिवसभरात पोलिसांनी केलेल्या पाहणीत स्कूलबसकडून सर्वाधिक नियमभंग करण्यात येत असल्याचे दिसून आले.
* त्यामुळे १०६ स्कूल बसवर कारवाई करण्यात आली, तर नियम तोडणाऱ्या २६ स्कूल व्हॅन्स आणि २९ ऑटोचालकावर ही कारवाई करण्यात आली...
वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथून एमडी ड्रग्स तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वाहने जप्त करून दोन गोदामे सील केली असून तब्बल 1 कोटी 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून मिळालेली ‘व्हीआयपी’ वागणूक सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे. २४ जूनच्या रात्री बबनभाईला वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका हॉलमध्ये टेबलावर बसवून, फॅनच्या थंड हवेत, कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था केल्याचं या फोटो मधून दिसते आहे.
रायगड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 389 इमारती या धोकादायक म्हणून निदर्शनात आल्या असून यामध्ये 22 शासकीय तर 367 खाजगी इमारतींचा समावेश आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ किशन जावळे यांनी सर्वेक्षणात आढळून आलेल्या अहवालानुसार ही माहिती दिली आहे.त्यामुळे या इमारतींमधील सर्व रहिवाशांना नोटीसा बजावण्यात आल्या असून सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देखील जिल्हा प्रशासन आणि संबंधित नगरपंचायत नगरपरिषद कडून देण्यात आल्या आहेत.
रुग्णावर उपचार करायला नकार दिल्याने हॉस्पिटलवर दगडफेक
हॉस्पिटलमध्ये तोडफोड करत डॉक्टरांची गाडीही फोडली
गर्भवती महिलेला घेऊन रात्री उशिरा नातेवाईक दवाखान्यात गेले. मात्र डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याने नातेवाईक आक्रमक
दिवसभरातील कामामुळे थकल्याचं कारण देत डॉक्टरांनी उपचारासाठी नकार दिल्याची माहिती
धाराशिवमधील पार्वती रुग्णालयातील प्रकार, रात्री उशिराची घटना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा इथं आभार दौऱ्यासाठी येणार होते. मात्र, हवामान विभागानं भंडारा जिल्ह्यात पावसाचा जोरदार अंदाज वर्तविला असल्यानं उपमुख्यमंत्री शिदेंचा आजचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. आता एकनाथ शिंदे हे २८ जूनला भंडारा इथं येणार असल्याची माहिती शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिलीय.
एबीपी माझाच्या बातमीची पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दखल, शाळांच्या दुरुस्तीचे आदेश
पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा खराब झाल्या त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनही दुरावस्था झालेल्या शाळेचे तात्काळ प्रस्ताव तयार करत त्याला मान्यता देण्याचे शिक्षण विभागाला आदेश
पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
गळक्या शाळा, सडलेली व्यवस्था या विशेष कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातील शाळांची दुरावस्था एबीपी माझाने दाखवली होती
भाजप मंत्री व नेत्यांची वर्षा बंगल्यावरील बैठक संपली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली जबाबदारी
सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीचे वाटप
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई असो जबाबदारीचे वाटप
महाराष्ट्रात भाजप पुन्हा नंबर वन पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्र्यांना सूचना
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल. जगन मोहन रेड्डी यांच्या रॅली दरम्यान झालेल्या अपघाताबाबत गुन्हा दाखल. गाडीखाली चिरडून एका समर्थकाचा झाला होता मृत्यू.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे. मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीचे मतदान पूर्ण झाले असून आज दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला यश मिळताना दिसत असून त्यांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या 16 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या चार उमेदवार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात. सिल्लोड रोडवरील घटना. धाब्यावर जेवणासाठी रात्री संभाजीनगर येथून पाच मित्र फुलंब्री येथे गेले होते. रात्री जेवण करून परतत असताना अपघात . अपघात तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमी तरुणांना नाना घाटी मध्ये दाखल .सर्व तरुण 15 ते 18 वर्षांचे होते. हा अपघात नेमका कशामुळे घडला हे अद्याप कळालेले नाही.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live: अजित पवारांच्या विरोधातील पॅनेलचा सेनापतीच पडला, अजितदादा विरोधकांना 21-0 व्हाईटवॉश देणार?