Maharashtra LIVE Updates: 'हैद्राबाद गॅझेटीयर'वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता; बंजारा समाजाची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील बातम्या आणि ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापलं
पार्श्वभूमी
पुढील दोन दिवस मुंबईत ओबीसी समाजासाठीच्या बैठकांचे सत्र. सरकारच्या जीआर मुळे साशंक असलेल्या ओबीसी नेत्यांची आज मुंबईत बैठक.. तर इतर मागास व बहुजन कल्याण मंत्र्यांनीही 9 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या प्रलंबित...More
मिरा-भाईंदर : मीरा भाईंदर शहरासाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी. शहरात पहिल्यांदाच ५५०० स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर आधुनिक सुविधा असलेले भव्य हॉस्पिटल उभारले जाणार आहे. मीरा रोड येथील आरक्षण क्रमांक ३०२ मध्ये या प्रकल्पाची उभारणी होणार असून, शहरातील आरोग्यसेवेचा दर्जा लक्षणीयरीत्या उंचावणार आहे.
हॉस्पिटलची वैशिष्ट्ये :
३७७ बेड – सर्व सुविधांसह रुग्णांसाठी निवासाची उत्कृष्ट व्यवस्था
५५ ऑपरेशन थेटर – अत्याधुनिक उपकरणांसह शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र सुविधा
डॉक्टर व नर्सेससाठी निवास व्यवस्था
१४ मजली भव्य इमारत
मेडिकल कॉलेज देखील सुरू होणार – शिक्षण आणि आरोग्य सेवा यांचा संगम
TDR (Transferable Development Rights) योजनेच्या माध्यमातून निधी उभारणी
महानगरपालिकेच्या एका रुपयाचा खर्च नाही – संपूर्ण प्रकल्प खासगी आणि सार्वजनिक सहभागातून
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली त्यांनी सांगितले की, “हे हॉस्पिटल संपूर्ण तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल आणि नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे मोठे पाऊल ठरेल.”ही योजना शहराच्या आरोग्य क्षेत्रासाठी नव्या युगाची सुरुवात ठरणार असून, मीरा भाईंदरच्या नागरिकांसाठी हा एक मोठा दिलासा ठरेल.
बाईट : प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री)
शासननिर्णयामुळे ओबीसींचे नुकसान !
"हैद्राबाद गॅजेट" लागु करण्याचा शासन निर्णय काढल्याने कुणबी दाखले देवून त्यांना ओबीसीमधुन आरक्षण देण्यासाठी छगन भुजबळ साहेब यांनी विरोध केला आहे. भुजबळ साहेब यांचा आरक्षणासंदर्भात अभ्यास आहे. ओबीसी समाजाच्या हितासाठी ते गेल्या अनेक वर्षापासुन कार्य करीत आहेत. यामुळे राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातील शासन निर्णयास छगन भुजबळ साहेब जो विरोध करीत आहे तो योग्यच आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आमचा विरोध नाही. ओबीसी समाजाला मुळातच आरक्षण 27 टक्के आहे. त्यात 13 टक्के भटके विमुक्त व इतर साठी राखीव आहे. उरलेल्या 19 टक्यात जर मराठा समाजाला सरकारने शासननिर्णय काढल्याप्रमाणे आरक्षण दिले तर ओबीसी च्या आरक्षणामध्ये वाटेकरी वाढणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे प्रचंड नुकसान होणार आहे.
मराठा समाजातील "पात्र" व्यक्तींनाच कुणबी दाखले दिले जातील असा उल्लेख शासन निर्णयात आधी होता. पण या "पात्र" शब्दला मनोज जरांगे यांनी विरोध केला आणि तो शब्द काढुन टाकण्यात आला. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणे सोपे होणार आहे. हैदराबाद गॅझेटचा दाखला देऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न हा ओबीसी समाजाच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. इतिहासातील काही कागदपत्रांवरुन नवा समाज ओबीसीमध्ये आणण्याचा निर्णय हा अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयाला आमचा विरोध आहे.
Anchor :- शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबे धर्मदाय विश्वस्त नवरात्र उत्सव मंडळ म्हणजेच ठाण्यातील टेंभी नाका नवरात्र उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. येत्या २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात देवीची जंगी मिरवणूक निघणार आहे.दरवर्षी या नवरात्र उत्सवात जगभरातील विविध मंदिरांचे व राजवाड्यांचे देखावे उभारले जातात. मात्र, यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून यंदा ५१ फूट उंच चारधाम मंदिराचा देखावा उभारला जात आहे. त्याचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी घेतला.
बीड: हैदराबाद गॅझेट नुसार एसटी प्रवर्गात येण्यासाठी बंजारा समाज आक्रमक, 15 सप्टेंबरला बीडमध्ये भव्य महामोर्चाचे आयोजन
सध्या बंजारा समाज VJNT प्रवर्गात असून एसटी प्रवर्गात येण्याची मागणी जोर धरत आहे
Anc: बातमी आहे बीडमधून... बंजारा समाजाने आता आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हैदराबाद गॅझेटप्रमाणेच एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या ठाम मागणीसाठी बीडमध्ये आज बंजारा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाभरातील पदाधिकारी, समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
सध्या बंजारा समाज VJNT प्रवर्गात असून एसटी प्रवर्गात येण्याची मागणी जोर धरत आहे. सरकारने तत्काळ बंजारा आरक्षणाबाबत अधिसूचना जारी करून आरक्षण जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर येत्या 15 सप्टेंबर रोजी बीडमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने हा मोर्चा बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार आहे.
बाईट: पि.टी चव्हाण - बंजारा नेते
ओबीसींच्या स्वतंत्र मंत्री मंडळ उपसमितीची बुधवारी बैठक
उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक
१० सप्टेंबरला सकाळी ११ वाजता मंत्रालयात पार पडणार बैठक
ओबीसी व मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या संघर्षामुळे बैठकीला विशेष महत्त्व
बैठकीत एकूण ८ मंत्री राहणार उपस्थि
ब्रेकिंग
विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंटसंदर्भात आज दुसऱ्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर सादरीकरण संपन्न
सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रेझेन्टेशन
पाणी, वीज, शिक्षण, सामाजिक कल्याण, उद्योग आणि सेवा, तंत्रज्ञान आणि अर्थकारण ह्या ७ विषयांवर सादरीकरण
विकसित महाराष्ट्र २०४७ चं व्हिजन डाॅक्युमेंट २ ऑक्टोबरला प्रकाशित होणार
शिक्षण संस्था, विद्यापीठांची गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष द्या, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
सोबतच, डिजिटल क्षेत्रात मोठे काम करण्याची गरज असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांचा भर
फ्लॅश:- नवी मुंबई कामोठे मध्ये सोन्याच्या दुकानात चोरी करून परराज्यात पडून जाणारा आरोपीला बोरिवली कस्तुरबा मार्ग पोलिसांनी 4 तासात केली अटक
नवी मुंबई कामोठे परिसरात एका सोन्याच्या दुकानात या आरोपींनी 70 ते 72 लाखाचं सोना हिरे चोरी केली होती
चोरी करून या आरोपींनी 78 तोळे सोन्याचे आणि 18 छोटे हिरे घेऊन बोरिवलीतून राजस्थान साठी ट्रेनमधून निघून जाण्याचे प्रयत्न करत होता
कस्तुरबा मार्ग पोलिसांची पेट्रोलिंग करणारी टीमला आरोपीचा हालचाली बाबत संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली आणि त्या चौकशी मधून या आरोपींनी दुकानांमध्ये चोरी केली असल्याचं उघड झाली
यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे,अटक आरोपीकडून 70 ते 72 लाखाचा चोरीला गेलेल्या मालमत्ता जप्त केले आहे.
अटक आरोपीचे नाव करण सिंग नाथू सिंग खारवर असून हा आरोपी राजस्थान मधला राहणारा आहे.
या आरोपीने यापूर्वी आणखी किती चोरी केली आहे त्यासोबत या आरोपीचे आणखी कोण साथीदार आहेत का या संदर्भात अधिक तपास कस्तुरबा मार्ग पोलीस करत आहे....
ब्रेकिंग
नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी
नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA आणि हुडको, NBCC यांच्यात करार
नवीन नागपूरसाठी एनबीसीसी प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणार
1710 एकरमध्ये विकसित होणार नवीन नागपूर
148 किमीचा नागपूर आऊटर रिंगरोड उभारला जाणार
11,300 कोटी रुपये हुडको देणार, यातील 6500 कोटी नवीन नागपूरसाठी, तर 4800 कोटी आऊटर रिंगरोडसाठी
एनबीसीसी विकास करणार
वसई-विरार : ईडीच्या कारवाईनंतर वसई-विरार महानगरपालिकेने अखेर एका ३ मजली इंडस्ट्रियल इमारतीची बांधकाम परवानगी रद्द केली आहे. वसई-विरारमध्ये ईडी छापेमारीनंतर परवानगी रद्द होणारी ही पहिलीच इमारत ठरली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत वसई फाट्याजवळील पेल्हार गावातील सर्वे नंबर 158/1/C व 159/4 या जागेवर ही इमारत उभारण्यात आली होती. २५ नोव्हेंबर २०२० रोजी तत्कालीन नगरसंचालक वाय. एस. रेड्डी यांनी बांधकाम व्यावसायिक रोहित प्रेमजी छेडा, राजेश नंदा आणि दिलीप मोटवानी यांच्या अर्जावर परवानगी मंजूर केली होती. रेड्डी आता ईडी च्या तुरुंगात आहेत.
मात्र या इमारतीसाठी सादर केलेला TLR (जमिनीच्या मोजणीचा दाखला) हा बोगस असल्याचे उघड झाले. मूळ TLR मध्ये छेडछाड करून बनावट दाखला पालिकेत सादर करण्यात आला होता. या दस्तऐवजांच्या आधारे २१२५ चौ. मीटर क्षेत्रफळावर ३० गाळ्यांची G+3 मजली इमारत उभारण्यात आली. विशेष म्हणजे, भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही काही व्यापाऱ्यांनी या इमारतीत आपला व्यवसाय सुरू केला आहे.
१९ जून २०२३ रोजी याबाबत पालिकेकडे तक्रार दाखल झाली होती. मात्र तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार आणि रेड्डी यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यानंतर १५ मे २०२५ रोजी ईडीने रेड्डी यांच्या घरावर छापा मारला. यानंतर विरारमधील नागरिक चंदू पाटील यांनी १८ जून २०२५ रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर अखेर ३ सप्टेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने इमारतीची परवानगी रद्द केली.
परवानगी रद्द होऊन पाच दिवस उलटले असतानाही संबंधित बिल्डरांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे आता पालिका या इमारतीविरोधात पुढील कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरपूर तालुक्यातील शेमल्या गावाचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील जवान स्वर्गीय दिनेश तुफान पावरा यांना लडाख येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आल्याची घटना घडली असून यामुळे संपूर्ण शेमल्या गावावर शोककळा पसरली आहे वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी दिनेश पावरा यांना वीरमरण आले असून त्यांच्यावर उद्या सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या गावी शेमल्या येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची चिपळूण मध्ये महत्त्वपूर्ण बैठक.
जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुखांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिपळूण मध्ये बैठक.
आगामी नगरपंचायती,जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षाची बैठक असल्याची माहिती.
जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण मधील धवल प्लाझा येथे बैठक.
मातोश्री वर काँग्रेस नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक
विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा सांगणार, सतेज पाटील यांच्या नावाची विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदासाठी चर्चा
अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पद 29 ऑगस्टला कार्यकाळ पूर्ण झाला त्यानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही
सध्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे आठ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत
त्यामुळे महाविकास आघाडीत विधानस परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेस ने दावा केला असल्याचे सूत्रांची माहिती आहे
या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती
आरक्षणासाठी यापुढे उपोषण नाही..मुंबईतही आंदोलन करणार नाही
वेळ पडलीतर रस्यावरली आंदोलन करु...
राज्यभरात नेत्यांना गावात येऊ देणार नाही
17 सप्टेंबरपर्यंत नव्या जीआरनुसार एक तरी सर्टीफिकेट द्या.
सरकारला 17 सप्टेंबर पर्यंत अल्टीमेंटम
छगन भुजबळ यांनी मराठवाडा गॅझिटिअरला कोर्टात आव्हान दिलं तर ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देणार आणि त्यांचे आरक्षण संपुष्टात आणणार( मिशावर ताव देऊन असं म्हणाले)
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात एकनाथ शिंदे चांगल्या मार्काने मिरीटन पास
फडणवीसांचा परीक्षेचा अजून निकाल लागायचा आहे.
बीडमध्ये पोलिसांना आडनाव न लावण्यावर प्रकाश महाजन यांनीही व्यक्त केली खंत
बीड मधील सर्व परिस्थितीला राज्यकर्ते जबाबदार असल्याचा महाजनांचा टोला
हे सुसंस्कृत समाजाचं लक्षण आहे का ?, एखाद्याची ओळख लपउन काय साध्य होणार आहे
आम्ही किती पशु झालोत, नाव लावलं तर पोलिसांवर हल्ला होईल या भीतीतून हा निर्णय घेतला असावा
असा निर्णय घेणे लोकशाहीसाठी दुर्देवी असल्याचं महाजन म्हणाले
बीड जिल्हा असा नव्हता सांगत महाजन यांनी याला राज्यकर्ते जबाबदार आसल्याचा आरोप केलाय
प्रकाश महाजन यांच्या टीकेचा रोख कोणाकडे? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे मराठा समाजातील तरुण नितीन माणिकराव चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.आज आमदार धनंजय मुंडे यांनी चव्हाण यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांच्या कुटुंबीयांना नाथ प्रतिष्ठान मार्फत एक लाख रुपयांची तातडीची मदत केली.
नितीन चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी देखील धनंजय मुंडे यांनी स्वीकारल्याचे कुटुंबीयांना सांगितले. तसेच मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या मराठा सेवकांना राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
नाशिकच्या साक्री - शिर्डी महामार्गावरील वनोली गावाजवळ एस.टी.बस व दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला..ताहाराबाद कडून येणाऱ्या नंदुरबार - वसई या बसला वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसली ते तिघेही बसच्या पुढील चाकाजवळ जोरदार आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला..प्रचंडवेगात असलेली दुचाकी एस टी बसच्या मशीनमध्ये अडकली होती..या अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती..घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा अध्यादेश काढला आहे. याला इंदापूर मधून विरोध केला जातोय. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी इंदापूरमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पद नं मिळाल्या मूळे शिवसैनिकांमध्ये नाराजी..
आज चारकोप, मालाड, कांदिवली या तीन विधानसभा क्षेत्रातील शाखाप्रमुख व माजी पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची घेतली भेट..
भेट घेऊन स्थानिक स्थरावरील परिस्थिती समजावून सांगितली..
मुख्य नेते एकशिंदे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना पद देण्याबद्दल केले आश्वाशीत..
तर विविध पक्षातून आलेल्या नेते व पदाधिकारी यांनी पद न मिळाल्यास पक्षातून राजीनामा देण्याचा दिला इशारा
हैदराबाद गॅझेट बाबत बंजारा समाजाची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक
मंत्री संजय राठोड यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
बैठकीत बंजारा समाजाचे महत्त्वाचे नेते आणि संत महंत देखील उपस्थित
OBC मध्ये असलेला बंजारा समाज हैदराबाद गॅझेटनुसार ST वर्गात जाण्याची शक्यता
या बदलावर समाजात मतांतरे असल्याने समाजाची बाजू समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठक
नंदुरबार : सातपुडा परिसरात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस....
सततच्या पावसामुळे सातपुड्याचा उदय नदीला मोठा पूर..
सातपुड्यातील प्रसिद्ध बारामुखी धबधब्याचे रौद्ररूप...
अक्राणी तालुक्यातील बिलगाव परिसरातील प्रसिद्ध बारामुखी धबधब्याचे विहंगम दृश्य....
उदयनदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..
नंदुरबार : सातपुडा परिसरात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस....
सततच्या पावसामुळे सातपुड्याचा उदय नदीला मोठा पूर..
सातपुड्यातील प्रसिद्ध बारामुखी धबधब्याचे रौद्ररूप...
अक्राणी तालुक्यातील बिलगाव परिसरातील प्रसिद्ध बारामुखी धबधब्याचे विहंगम दृश्य....
उदयनदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..
ठाकरेंची शिवसेना अजूनही शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत
दसरा तोंडावर आला असतानाही अद्याप बीएमसीकडून परवानगी नाही
ठाकरेंच्या शिवसेनेकडून जानेवारी २०२५ मध्ये दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे...
लवकरच परवानगी दिली जाईल मुंबई महापालिकेकडून माहिती
2 ऑक्टोबर रोजी दसरा असून दरवर्षी या दिवशी शिवसेनचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार...
ठाकरेंच्या शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी अर्ज करण्यात आला असून अजूनही त्यांना परवानगी देण्यात आली नसल्याची सूत्रांची माहिती...
जानेवारी महिन्यात अर्ज केल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाकडून जवळपास तीन वेळा परवानगीबाबत स्मरण पत्र देखील पालिकेला देण्यात आलं आहे
मात्र यावर पालिकेकडून काहीच उत्तर आलं नसल्याची माहिती...
छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी यंदाही शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज करण्यात आला नसल्याची सूत्रांची माहिती
रत्नागिरी - मिरकवाडा येते मच्छिमारी करणारी बोट मध्यरात्री बुडाली
मिरकरवाडा येथे ब्रेक वॉटरच्या आतमध्ये बोटीला अपघात
बोटीतील सहा जण बुडाले; 4 जणांना वाचवले तर 2 जण अद्याप बेपत्ता
मोठ्या लाटेचा तडाका बसल्यामुळे बोटीला अपघात
अमीना आयशा असं बोटीचं नाव
प्रॉपर्टीच्या वादातून कांदिवली पश्चिम परिसरात बॅट, हॉकी काठ्याने तुफान हाणामारी
या लढाईत काठ्यांव्यतिरिक्त विट, हॉकी आणि दगडांचाही वापर करण्यात आला.
कांदिवली पश्चिमेत लालजीपाडा परिसरात यादव आणि चव्हाण कुटुंबीयांमध्ये जागाचा ताबा मिळवण्यासाठी तुफान फ्री स्टाईल मध्ये हाणामारी झाली
याच हाणामारी मध्ये दोन्ही बाजूने 8 जण जखमी झाले
जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आला
उपचारादरम्यान राम लखन यादव वय 65 वर्ष यांच्या दुर्दैवी मृत्यू झाली आहे
याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोन्ही गटा विरोधात गुन्हा दाखल करून 3 आरोपींना अटक केली आहे.
तर इतर फरार आरोपीच्या शोध कांदिवली पोलीस घेत आहे....
Akola News : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना समोर आलीये.. जुन्या शहरातील डाबकी रोड परिसरात ही घटना घडलीय.. या घटनेनंतर अकोल्यात मोठी खळबळ उडाली.. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी पोलीस स्टेशन गाठत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली... तौहिद समीर बैद या तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत हा प्रकार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, घटनेनंतर पोलिस ठाण्यात बजरंग दलचे कार्यकर्ते आक्रमक झाले होतेय. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्कोसह विविध कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्यापपर्यंत मोकाट असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहेत. आरोपीवर कठोर करावी, अशी मागणी आता काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केलीय.
कोकणातली विभागीय प्रशिक्षण केंद्र चिपळूण मध्ये सुरू करणार - राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची घोषणा.
कोकणातली मुलांना प्रशिक्षण देऊन मार्केटिंग चैन तयार करणार : प्रवीण दरेकर
कोकणात आंबा, काजू आणि मासे आहेत त्यांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.असेअसताना आपण याचा स्वतंत्र कोकणाचा ब्रँड तयार करू शकतो..त्यासाठी फक्त मानसिकता हवी या सगळ्याचे नीट नियोजन केलं संपूर्ण राज्य चालवण्याची अर्थ क्षमता कोकणात आहे....प्रवीण दरेकर.
चिपळूण नागरी पतसंस्था बरखास्त करा म्हणून अनेक तक्रारी झाल्या.....आम्ही हा प्रयत्न हाणून पाडाला
भाजपावसीय झालेल्या प्रशांत यादव यांच्या संस्थेवरील कारवाई थांबवल्याची प्रवीण दरेकर यांची माहिती.
चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मागे आम्ही सरकार म्हणून उभे. प्रवीण दरेकर.
सहकार चळवळ डबघाईला आली असताना अशा पद्धतीने तक्रारी करणे चुकीचे.....दरेकर.
भंडारा : आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून भंडारा जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजरी लावली आहे. सध्या भंडारा जिल्ह्यातील हलका भातपीक गर्भावस्थेत आहे. तर, जड भातपिकाला पावसाची गरज आहे. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांसह कोरडवाहू शेतकऱ्यांनाही हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. सकाळपासून भंडारा जिल्ह्यातील सर्व सातही तालुक्यात मेघगर्जनेसह हा पाऊस पडत असून तो भात पिकासाठी जणू नवसंजीवनी ठरला आहे. पावसाच्या सरी बरसात असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळतं आहे.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना समोर आलीये.. जुन्या शहरातील डाबकी रोड परिसरात ही घटना घडलीय.. या घटनेनंतर अकोल्यात मोठी खळबळ उडाली.. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी पोलीस स्टेशन गाठत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली... तौहिद समीर बैद या तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत हा प्रकार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, घटनेनंतर पोलिस ठाण्यात बजरंग दलचे कार्यकर्ते आक्रमक झाले होतेय. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्कोसह विविध कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्यापपर्यंत मोकाट असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहेत. आरोपीवर कठोर करावी, अशी मागणी आता काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केलीय.
मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआरबाबत आता मंत्री छगन भुजबळ कोर्टात
सर्व ओबीसी नेत्यांच्या वतीने उच्च न्यायालयात छगन भुजबळ याचिका दाखल करणार
मागील ४ दिवसांत विविध वकिलांसोबत चर्चा केल्यानंतर तसेच कागदपत्रांची जुळवणी केल्यानंतर आता याचिका दाखल करण्यात येणार
कोर्टाची बाजू माजी खासदार समीर भुजबळ सांभाळणार
येत्या २ दिवसांत याचिका दाखल होणार
मराठा समाजाने देखील ओबीसी समाज कोर्टात जाण्याची बाब लक्षत घेत आधीच कॅव्हेट दाखल केलं
मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांच्या वतीने कॅव्हेट दाखल
समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांची पिकांना खते लावण्याची लगबग
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी युरिया मिळत नसल्याने खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची फिरफिर
काही दुकानांवर युरियासाठी खरेदी करावी लागत आहेत दुसरी खते लिंकिंग मुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
काही ठिकाणी जादा दराने युरियाची विक्री
जिल्ह्यातील युरियाची विक्री सुरळीत सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
जिल्ह्यात योग्य तो युरियाचा साठा शासनाने उपलब्ध करून द्यावा शेतकऱ्यांची मागणी
सातवा मजल्यावर मंत्रिमंडळ बैठकीतील संबंधितांशिवाय इतरांना कोणालाही आता प्रवेश नाही, मुख्य सचिव कार्यालयाच्या सूचना
मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान बैठकीशी संबंधित नसलेल्या आणि भेटायला आलेल्या लोकांची गर्दी सातव्या मजल्यावर वाढत असल्याने निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान सातव्या मजल्यावर कॅबिनेट बैठकीशी संबंधित नसेलल्या व्यक्ती आणि मंत्र्यांना आणि सचिवांना भेटणाऱ्यांची गर्दी यामुळे कॅबिनेट बैठकीस विलंब होत असल्याचे निदर्शनास आला आहे
मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विविध विभागांचे मंत्री त्यांचे सचिव आणि अधिकारी हेच या बैठकीला सातव्या मजल्यावर असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यानुसार नियोजन करण्याचे सूचना सुद्धा देण्यात आले आहे, इतरांना सातव्या मजल्यावर प्रवेश हा प्रतिबंधित असणार आहे. तशा प्रकारच्या सूचना मुख्य सचिव कार्यालयाने मंत्रालय सुरक्षा पोलीस व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे परभणीच्या धारणगाव येथील गजानन डुकरे हा तरुण काल दुधना नदीपात्रामध्ये वाहून गेला होता त्याचा मृतदेह घेवून धारणगाव वासिय जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला आहे धरणगाव परिसरामध्ये समसापूर चा बंधारा बांधण्यात आला या बंधाऱ्यामुळे धारणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅक वॉटर राहत असून आणि या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही जे शेतकरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत ते अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू होत असल्याची घटना सातत्याने होत असल्यामुळे गावकरी संतापले असून तो बंधारा फोडण्यात यावा अथवा तिथले पाणी सोडण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवला आहे
आयुष कोमकर याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
टोळीयुध्दातून आयुष कोमकर (वय १८, रा. भवानी पेठ) याचा नाना पेठेत शुक्रवारी सायंकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. या प्रकरणी कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार समर्थ पोलिस ठाण्यात सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६८), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), अमन युसूफ पठाण ऊर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे (वय १९), सुजल राहुल मेरगू (वय २३, सर्वजण रा. नाना पेठ) या १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा आरोपींना पोलिस कोठडी
या प्रकरणी अटक केलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ‘वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचला. अमन पठाण आणि यश पाटील याने आयुषवर गोळीबार केला. त्यावेळी अमित पाटोळे व सुजल मेरगू घटनास्थळी हजर होते. गोळीबारानंतर ‘इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच’ असे म्हणत आरोपींनी दहशत माजविली. घटनास्थळी १२ काडतुसे आणि एक अर्धवट काडतूस सापडले असून, मृतदेहात नऊ काडतुसे आढळली आहेत. तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी द्यावी,’ असा युक्तिवाद सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी केला.
अॅड. प्रशांत पवार व अॅड. मिथुन चव्हाण यांनी आरोपींची बाजू मांडली. आंदेकर व कोमकर कुटुंबात दिवाणी स्वरूपाचे वाद असून, वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. अटक आरोपींचा गुन्ह्याशी संबंध नाही, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांच्या न्यायालयाने आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मुंबईच्या रेल्वेतून मौल्यवान दागिने किंवा वस्तू घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाईच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या रेल्वे पोलिसांवर निलंबनाची कारवाई. रेल्वे पोलिस दलातील १३ जणांवर ५ महिन्यांत निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची सूत्रांची महिती. या कारवाईत काही वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांचाही समावेश आहे
विशेषता लांब पल्याच्या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोलिसांकडून लक्ष केले जात असल्याचे समोर. या प्रवाशांकडे असलेले मौल्यवान दागिने किंवा वस्तू मोठ्या प्रमाणात पैसे आढळल्यास पोलिस या प्रवाशांना कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेतात. त्यानंतर पोलिस सीसीटिव्ही नसलेल्या फलाटावर किंवा एका खोलीत बोलवून कारवाईची आणि अटकेची भिती घालून त्यांच्याकडून पैसे उकळतात
रेल्वेत घडलेल्या या प्रकरणची माहिती उघडकीस आल्यानंतर रेल्वे पोलिस आयुक्तांनी अशा भ्रष्ट पोलिसांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. तसेच प्रवाशांनीही पोलिसांच्या वेशात असलेल्या अधिकार्यांवरच विश्वास ठेवून आपल्या सामानाची झडती ही फलाटवरील सीसीटिव्ही असलेल्या ठिकाणी घेण्यास आग्रह करावा असे आवाहन केले आहे
मुंबई आमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग आला असून महाराष्ट्रातील पालघर मध्ये पहिल्यांदाच डहाणू तालुक्यातील साखरे येथे 40 मीटर लांबीचा बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे.हा गर्डर तब्बल 970 मेट्रिक टन वजनाचा असून, भारताच्या बांधकाम क्षेत्रातील सर्वात जड गर्डर मानला जातो. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्र विभाग 156 किलोमीटर लांबीचा आहे. यात भुयारी स्थानक, बोगदे, उंचावरील मार्गिका आणि तीन स्थानकांचा समावेश आहे.फुल-स्पॅन बॉक्स गर्डर तंत्रज्ञानामुळे बांधकामाचा वेग 10 पट वाढतो. गुजरातमध्ये याच तंत्रज्ञानामुळे 307 किमी व्हायाडक्ट पूर्ण झाला आहे. या यशस्वी टप्प्यामुळे महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला नवी गती मिळणार आहे.
आयुष कोमकर (वय १८) खून प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केला आहे. सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हा दाखल केला...
एमएमआरडीएकडून आता वडाळ्यातील 156 हेक्टर जागेचा लिलाव केला जाणार, वडाळा सेंट्रल बिजनेस डिस्ट्रिक्टसाठी पुढील दोन ते तीन महिन्यात जमिनीचा लिलाव होणार. नीती आयोग आणि एमएमआरडीएने संयुक्तपणे तयार केलेल्या इकॉनॉमिक मास्टर प्लॅन नुसार वडाळा येथील जमिनीच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे
एम एम आर डी ए च्या अंतर्गत येणाऱ्या बीकेसी मधील जवळपास सर्व प्लॉटचा लिलाव झाल्यानंतर आता वडाळा येथील जमिनीचा लिलाव करण्याचे नियोजन एम एम आर डी ए कडून करण्यात येत आहे. या जागेवर सध्या ट्रक टर्मिनल त्याशिवाय ट्रान्सपोर्ट कार्यालय आहेत... ते इतरत्र हलवण्या संदर्भात सुद्धा नियोजन केले जाणार आहे
कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा वडाळ्याची ही जागा महत्त्वाची आहे... एकीकडे अटल सेतू, दुसरीकडे पूर्व द्रुतगती मार्ग, हार्बर लाइन कनेक्ट असलेली ही जागा आहे... सध्या, एमएमआरडीएचा सर्वात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणजे १ लाख कोटी रुपयांचा मेट्रो लाईन नेटवर्क.
विविध पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे एमएमआरडी कडून आता या वडाळ्याच्या जमिनी संदर्भात निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती आहे
मराठा आरक्षण प्रश्न सरकारने नुकताच जीआर काढला आहे. या जीआर च्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये सरकारने जर एखाद्याची कुणबी जात ठरत नसेल तर शेजारील व्यक्तीच्या प्रतिज्ञा पत्रावर सुद्धा त्या व्यक्तीची जात कुणबी ठरवण्याचा घाट घातला आहे. मात्र एखाद्याच्या प्रतिज्ञा पत्रावर जर एखाद्याची जात ठरत असेल तर सरकारचं हे कृत्य घटनाबाह्य आहे. असं म्हणत राज्य ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाने यावर आक्षेप घेतला आहे.
घराला असलेलं कुलूप तोडून चोरानं आत प्रवेश करीत लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना भंडारा शहरातील तुळजाभवानी मंदिर परिसरात उघडकीस आली. अमित गिऱ्हेपुंजे हे कुटुंबासह गणपती दर्शन आणि महाप्रसाद घेण्यासाठी शेजाऱ्यांकडं गेले असताना ही घटना घडली. यात 7 लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले. घटनेचा अधिक तपास भंडारा पोलीस करत आहेत.
बेळगावातील गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल 31 तासांनी सांगता झाली. शनिवारी सायंकाळी पाच वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला होता. रविवारी रात्री बारा वाजता विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.
राज्यात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर टप्प्यावर आला असताना या वादामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण होत असून सामाजिक सलोखा धोक्यात येत आहे. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जातीनिहाय जनगणना केल्यास प्रत्येक समाजाची खरी लोकसंख्या व त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्थिती स्पष्ट होईल तसेच आरक्षणाचे वितरण न्याय व पारदर्शक पद्धतीने करता येईल व यामुळे समाजातील होणारा गैरसमज मत्सर व संघर्ष कमी होईल, असं म्हणत राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाने सरकारने जातीय निहाय जनगणना लवकरात लवकर करावी अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे व येत्या 14 सप्टेंबर रोजी शेगाव येथे ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे अधिवेशन बोलवलं आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत राज्य ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे सरचिटणीस रामवाडी भस्मे यांनी दिली. त्यामुळे आता मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत जातनिहाय जनगणनेच्या मागणी करत राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
लालबागच्या राजाचे तब्बल 33 तासानंतर विसर्जन, विसर्जनला एवढा उशीर का झाला? काय आहेत कारणं? सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
पुढील दोन दिवस मुंबईत ओबीसी समाजासाठीच्या बैठकांचे सत्र. सरकारच्या जीआर मुळे साशंक असलेल्या ओबीसी नेत्यांची आज मुंबईत बैठक.. तर इतर मागास व बहुजन कल्याण मंत्र्यांनीही 9 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी बोलावली बैठक..ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी "इतर मागास व बहुजन कल्याण" मंत्री अतुल सावे यांच्या विभागातर्फे 9 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडेचार वाजता मुंबईत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे... 4 सप्टेंबर रोजी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी लवकरच शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर या बैठकीचे मुंबईत आयोजन करण्यात येत आहे.
दुसऱ्या बाजूला 8 सप्टेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम मध्ये ही काही ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे.. मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जीआर संदर्भात साशंक असलेल्या विदर्भातील ओबीसी नेत्यांची काल नागपुरात रविभवन येथे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बैठक झाली होती.. त्यात 8 सप्टेंबर रोजी मुंबईत राज्यभरातील ओबीसी नेत्यांची यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक घेण्याचे ठरले होते.
त्यामुळे आता मुंबईत 8 सप्टेंबर रोजी सरकारच्या जीआर संदर्भात साशंक असलेल्या ओबीसी नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम मध्ये होईल.. तर दुसऱ्या बाजूला शासन स्तरावर ओबीसींच्या प्रलंबित मागण्यासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने 9 सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठेच धक्का बसत नसल्याचे आधीच म्हटले आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra LIVE Updates: 'हैद्राबाद गॅझेटीयर'वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता; बंजारा समाजाची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक