- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- निवडणूक
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
अहिल्यानगर मातंग समाजातील तरुणावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आंदोलन
सोलापुरातील डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला
रत्यावर टायर जाळल्याने पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येणारू वाहतूक पूर्ण खोलंबली
मागील अर्धा तासापासून रास्ता रोको सुरु असल्याने गाड्यांच्या लांबचं लांब रांगा पाहायला मिळतायत
ज्या गावगुंडानी हा हल्ला केलाय त्यांच्यावर कठोर शासन व्हावं अशी मागणी DPI संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलीय
राज ठाकरे एक्शन मोडवर; थेट शाखद्यक्षांकडून मागविला अहवाल
१ मार्च च्या मोर्चाआधी मनसेची मतदार याद्यांची तपासणी सूरु
मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादींचा अभ्यास करून त्यातील घोळ समोर आणण्याचे आदेश
येत्या तीन दिवसात या याद्यांमधील घोळ विभागध्यक्षांमार्फत राज ठाकरेंना सांगण्यात येणार
जळगाव विमानतळावरून अलायन्स एअर ची जळगाव मुंबई विमानसेवा याआधी आठवड्यातून चार दिवस होती मात्र आज पासून जळगाव ते मुंबई दरम्यानची विमानसेवा ही दररोज सुरू होणार असून रात्री अवघ्या दीड तासात प्रवासी मुंबई पोहचणार आहेत याचबरोबर जळगाव मार्गे अहमदाबाद सेवा देखील पूर्ण केली जात आहे या दोन्ही सेवांमुळे व्यापारी वर्ग उद्योजक विद्यार्थी नोकरदार यांचा इतरांचा मोठा फायदा व सोय होणार आहे जळगाव मुंबई विमान विमान सेवेला जळगावकरांचा वार्ता प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेता ही विमान सेवा दररोज करण्यात आली आहे जळगाव विमान योजनेच्या अंतर्गत सध्या स्थितीत गोवा पुणे हैदराबाद मुंबई अहमदाबाद या शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे.
हत्या प्रकरणात बजरंग दलाच्या अध्यक्षला अटक
लोंखडी पाईप गज, लाकडी दांडे, लाथा बुक्क्याने मारहाण करत हत्या
छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावातील हत्या प्रकरणात मोठी अपडेट
ऋषीकेश उर्फ चिमन जाधव असे हत्या करणाऱ्या बजरंग दलाच्या अध्यक्षाचे नाव
बिडकीन पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल
चिमन जाधवसह 30 ते 35 अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल
बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात तन्मय चोरमारे नावाच्या तरुणाची हत्या
हत्या प्रकरणात बजरंग दलाच्या अध्यक्षला अटक
लोंखडी पाईप गज, लाकडी दांडे, लाथा बुक्क्याने मारहाण करत हत्या
छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावातील हत्या प्रकरणात मोठी अपडेट
ऋषीकेश उर्फ चिमन जाधव असे हत्या करणाऱ्या बजरंग दलाच्या अध्यक्षाचे नाव
बिडकीन पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल
चिमन जाधवसह 30 ते 35 अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल
बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात तन्मय चोरमारे नावाच्या तरुणाची हत्या
जैन बोर्डिंग प्रकरणाचे पडसाद आता पुण्याबाहेरही
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेसाठी संभाजीनगरमध्ये निघणार मोर्चा
संभाजीनगरच्या जैन समाजाकडून काढला जाणार मोर्चा
पुण्यातील बोर्डिंग जागा प्रकरणी जैन समाज रस्त्यावर उतरणार
उद्या सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार मोर्चा
मोर्चात संभाजीनगर जिल्ह्यातील जैन समाज होणार सहभागी
संजय राऊत काही वेळातच घेणार शरद पवारांची भेट
सिल्वर ओकवर घेणार भेट
1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधातील मविआ आणि मनसेच्या मोर्चासंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती
Beed News : बडतर्फ पीएसआय रणजीत कासले याच्या साथीदाराला बीड पोलिसांच्या मदतीने गुजरात पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे. रणजीत कासले याला काही दिवसांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासात गुजरात पोलीस बीडमध्ये आले होते. त्यांनी कासलेचा साथीदार रोहित काकडे यालाही अटक केलीय. रणजीत कासले हा बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. गुजरात मध्ये जाऊन धमकावत पैसे उकळण्याच्या आरोपामुळे त्याला निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद झाले. यादरम्यान कासलेने अनेक खळबळ जनक दावे केले. आणि याच अनुषंगाने त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. मात्र त्याचे कारणामे अद्याप कायम आहे. अशातच गुजरात मधील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या साथीदाराला बीडमधून अटक करण्यात आली आहे.
नाशिकचा चांदवड परिसरात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. या भागातील नवीन कांदा लागवड केलेले क्षेत्र पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे..त्याचप्रमाणे मका, कांदे यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.. काढणीस आलेल्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात संत्र्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जातं.. मात्र संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे.. दरवर्षी संत्र्यावर वाढता खर्च.. खताचे भाव, औषध महागाई आणि लावलेला खर्च सुद्धा निघत नाही.. त्यामुळे विक्रीच्या वेळी फळगळती होत असल्याने संत्रा परवडत नाही अशी भावना शेतकऱ्यात निर्माण झाली आहे.. काही शेतकरी तर अख्खी संत्रा बागा तोडून टाकताय..
मागील 8 ते 10 वर्षांपासून संत्रा गळती होत आहे मात्र नागपूर मध्ये नवीदिल्लीचं संशोधन केंद्र असूनही आजपर्यंत यावर उपाय शोधण्यात संशोधकांना यश मिळालं नसल्याचं शेतकरी सांगताय.. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान दरवर्षी होत आहे.. त्यामुळे सरकारने फळ गळतीवर कायमचं उपाय करून द्यावा अशी मागणी शेतकरी करताय..
पुण्यात बेकायदेशीर जाहिरातींवर धडक; ४६३४ फ्लेक्स-बोर्ड हटवले
शहराचे सौंदर्य आणि सुरक्षितता राखण्यासाठी पुणे महापालिकेने बेकायदेशीर जाहिरातींवर मोठी कारवाई केली.
आयुक्तांच्या आदेशानुसार परवाना व आकाशचिन्ह विभागाने शहरभर मोहिम राबवली आणि तब्बल ४६३४ बेकायदेशीर फ्लेक्स, बोर्ड, बॅनर तसेच १३४ झेंडे हटवले.
अनधिकृत जाहिरातींमुळे वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिले आहे
इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक उभ्या राहिलेल्या एसटीला आग लागली आणि काही समजायच्या आत या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झालीय. या एसटीमध्ये जवळपास 50 प्रवासी होते सुदैवानं कोणालाही इजा झाली नसली तर या प्रवाशांचं साहित्य मात्र जळून राख झालंय.धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर आली. याच वेळी इंधन गळतीमुळे या बसला अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बस मध्ये जवळपास 50 प्रवासी होते त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. तात्काळ अग्निशामक बोलावून ही आग आटोक्यात आणली मात्र या आगीत बसचा पूर्ण नुकसान झालंय.
नाशिक जिल्ह्यात विविध भागात पावसाने काल हलक्या स्वरूपात हजेरी लावल्यानंतर आता पुढील दोन दिवसही पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.नाशिकमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून, घाटमाथ्यावर विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध भागात रात्री पावसाने चांगलीच हजेरी लावली. आता पुन्हा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सध्या कधी कडक उन तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. नाशिकच्या बागलाण, मालेगाव, चांदवड, नाशिक, दिंडोरी,इगतपुरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात विविध भागात पावसाने काल हलक्या स्वरूपात हजेरी लावल्यानंतर आता पुढील दोन दिवसही पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.नाशिकमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून, घाटमाथ्यावर विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध भागात रात्री पावसाने चांगलीच हजेरी लावली. आता पुन्हा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सध्या कधी कडक उन तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. नाशिकच्या बागलाण, मालेगाव, चांदवड, नाशिक, दिंडोरी,इगतपुरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात विविध भागात पावसाने काल हलक्या स्वरूपात हजेरी लावल्यानंतर आता पुढील दोन दिवसही पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.नाशिकमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून, घाटमाथ्यावर विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध भागात रात्री पावसाने चांगलीच हजेरी लावली. आता पुन्हा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सध्या कधी कडक उन तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. नाशिकच्या बागलाण, मालेगाव, चांदवड, नाशिक, दिंडोरी,इगतपुरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धाराशिव: तुळजापुर तिर्थक्षेञ विकास आराखड्याला गती,भुसंपादनाची प्रक्रीया लवकरच सुरू होणार
पहीला टप्पा म्हणून सरकारकडून भुसंपादनासाठी 18 कोटी निधी उपलब्ध
तुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहीती
तुळजापुर तिर्थक्षेञाच्या 1865 कोटींच्या विकास आराखड्याला राज्यसरकारने दिली आहे मंजुरी
350 कोटी रुपयांच भुसंपादन अपेक्षीत
भुसंपादनाची प्रक्रिया लवकर पुर्ण होईल
नियोजन बध्द काम करता येणार आहे,पुढच्या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू होईल,दोन महीन्यात प्रक्रीया पुर्ण होईल
जानेवारी पासुन कामाला सुरुवात होईल, कामासाठी 18 महीन्याचा कालावधी देण्यात येणार आहे - हे काम भक्त सुविधा केंद्राची असणार
नागपूरात 12 वर्षांच्या सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे..
- अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला नागपूर जवळच्या भिलगाव परिसरातील लॅाजवर नेऊन दोन आरोपींनी केला अत्याचार
- आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडीओ काढले. कुणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल आणि जीवे मारण्याची दिली धमकी
- नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना
- पोलिसांनी करण आणि रोहीत या दोन आरोपींना केली अटक.. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीची असून दोघांवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद..
- गुरुवारी घडली अत्याचाराची धक्कादायक घटना, शुक्रवारी सायंकाळी पिडीतेच्या आई वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली.
- पोलीसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पोस्कोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय
Beed News : भाजप आमदार सुरेश धस आणि प्रणिती शिंदे आज मयत महिला डॉक्टर कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत. साधारण साडे आठ वाजता सुरेश धस भेट घेतील तर प्रणिती शिंदे नऊ वाजता भेट देतील.
Maharashtra News : मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट धावून आले असून मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी 11 लाख रुपयांची मदत केली आहे. महानुभाव परिषदेच्या 38 व्या अधिवेशनाच्या उद्घाटनसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी ओझर विमानतळावर मुख्यमंत्रीची भेट घेऊन एक कोटी 11 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. देवस्थान ट्रस्टच्या मदतीचा स्वीकार करून मुख्यमंत्रीनी त्यांचे आभार मानले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, देवस्थान ट्रस्टचे अधिकारी उपस्थित होते.
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महायुतीतील संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा दिला असून हिंगोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा इशारा दिल्यानंतर आज भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'ईट का जवाब पत्थर से दिया जायेगा' असा इशाराच बांगर यांना आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिला आहे.
Nashik News Updates : नाशिक पोलिसांकडून राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई सुरु असताना राजकीय पुढार्यांवर देखील कठोर कारवाई केली जात आहे. विनापरवानगी फलक लावल्याप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे विक्रम नागरे यांच्यावर नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी विक्रम नागरे यांनी त्यांच्या समर्थकाने लावलेल्या अनधिकृत फलकावर त्यांचा फोटो लावत शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे महानगरपालिका आणि नाशिक पोलिसांची माफी मागत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे म्हणत विक्रम नागरे यांनी माफी मागत व्हिडिओ व्हायरल केला आहे.
Satara News : साताऱ्यातील कास तलावात नगर पालिकेच्या वतीने नव्याने नौकाविहार सुरु करण्यात आला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नौकाविहारचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते. कास पठार आणि कास तलाव या भागात पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, कास तलाव भागात नौकाविहार सुरु नव्हते मात्र आता ते सुरू झाल्याने पर्यटकांना साताऱ्याच्या जवळच नौकाविहारचा आनंद घेता येणार आहे. नौकाविहार सोबत झिप लाईन, पॅरासिंग असे वेगवेगळे साहसी खेळ देखील कास भागात सुरु केले जाणार आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यात पर्यटनाला अजून वाव मिळणार आहे.
Maharashtra News : सतत बदलत्या वातावरणाचा परिमाण कोकणातील भात शेतीवर होतोय. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन कोसळत असलेल्या पावसामुळे भात शेती उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कापलेली भातशेती पाण्यात भिजून कोंब फुटले आहेत, तर काही ठिकाणी भातशेतीत पाणी साचले आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी पचनाम्याचे आदेश दिले असल्याचं सांगितलं. मात्र परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates : सतत बदलत्या वातावरणाचा परिमाण कोकणातील भात शेतीवर होतोय. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन कोसळत असलेल्या पावसामुळे भात शेती उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तसेच, फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांना शरण आला आहे. मृत डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये 'पोलीस निरीक्षक बदने ज्याने माझा पाच वेळा बलात्कार केला' असा गंभीर आरोप केला होता. याच संदर्भात अधिक अपडेट्स जाणून घेऊयात. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...