- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- निवडणूक
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Live blog: उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न?
Maharashtra Live blog: उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न?
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात आज सकाळी देशी दारूच्या दुकानात एक हत्या झालीय. शादुल शेख नावाच्या युवकावर शेख निसार या युवकाने चाकूने वार केले, हे वार इतके गंभीर होते की शादुल शेखचा जागीच मृत्यू झाला. यातील आरोपीला देगलूर पोलिसांनी अटक केली असून हत्येच्या कारणांचा अद्याप उलगडा झाला नाही.या घटनेने शहरात प्रचंड दहशत पसरली असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. यातील आरोपी हा नशेच्या अंमलाखाली असून त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर शहराजवळ कोकणाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. महामार्गावरील इंदापूर जवळ असलेल्या कशेने गावाजवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे हा विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे.या खड्ड्यात एका कार चालकाने खड्ड्यांचा अंदाज घेता अचानक ब्रेक मारला, मात्र मागून वेगवान येणारी दोन वाहने या कार वर आदळली आणि हा अपघात घडला. या अपघातात तिन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून एअर बॅग उघडल्यामुळे या वाहनातील प्रवाशी बालंबाल थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे.मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर शिंदेच्या सेनेकडून संताप व्यक्त करण्यात आला असून लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा कार्यालय फोडू असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला आहे.
निवडणुकांच्या तोंडावर मनसे ॲक्शन मोडवर
मुंबईतील मतदार यांद्यांच्या निरीक्षणासाठी १-२ जणांची निवड
मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणार्यांवर मनसे ठेवणार नजर
मतदारयाद्यांमध्ये दुबार नावांपुढे निवडणूक आयोग स्टार करणार
निवडणुकीच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणार्यांना मिळणार मनसेचा स्टार
सातारा:जगातील सर्वात लहान उंची असणारी जिवंत पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील मलवडीच्या 'राधा' ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या 'राधा'ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून प्रत्येक प्रदर्शनात ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.मलवडीतील शेतकरी आणि पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हैशीच्या पोटी 19 जून 2022 रोजी 'राधा'चा जन्म झाला. 'राधा' दोन-अडीच वर्षाची झाल्यावर तिच्या उंचीतील बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने 'राधा'ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. 21 डिसेंबर 2024 सोलापूर येथील सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा 'राधा'ने सहभाग घेतला. अन् 'राधा'चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी कृषी प्रदर्शन व कर्नाटकातील निपाणी येथील कृषी प्रदर्शनासह एकूण १३ कृषी प्रदर्शनात खास आकर्षण म्हणून 'राधा'ला निमंत्रित करण्यात आले.24 जानेवारी 2025 रोजी 'राधा'ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने 'राधा'च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. आणि १२ सप्टेंबर २०२५ ला 'राधा'ची पाहणी करुन अहवाल पाठवला. २० सप्टेंबरला कागदपत्रे सादर केली. आणि 'राधा'ची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. यामुळे यानंतर राधाचे म्हशीचे मालक यांच्यावर कौतुकांचा वर्ष होताना पाहायला मिळत आहे
लातूर शहराजवळील गरुड चौक परिसरात आज सकाळी सीएनजीच्या टँकरमधून अचानक गॅस गळती झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना लातूर-नांदेड या मुख्य महामार्गावर घडल्याने तात्काळ वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गॅस गळतीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून, घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिस दल आणि अग्निशमन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी परिसर बंदोबस्त वाढवला आहे. सध्या प्रशासनाने परिसर रिकामा करून सुरक्षिततेची उपाययोजना केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी भिडण्यास सज्ज झालेल्या भाजपने लोणावळा नगरपरिषदेसाठी पहिल्या अकरा उमेदवारांच्या नावाची घोषणा केलीये. तेरा प्रभागांतील 27 जागांसाठी ही निवडणूक होतेय. उद्यापासून 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरले जाणारेत. त्यासाठीची पहिल्या यादीत अकरा उमेदवार जाहीर करत भाजपच्या बाळा भेगडेंनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केलाय. आता आमदार सुनील शेळके राष्ट्रवादीचे कोणते शिलेदार रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज रोडवर गोलवाडी फाटा परिसरात चालत्या LPG रिक्षाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेत दोन महिला प्रवासी गंभीररित्या भाजल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
आग कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, रिक्षा पेट घेताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी धाव घेत महिलांना बाहेर काढत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
राज्यात महायुतीत सहभागी असलेले भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची सेना यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर निवडणुकीबाबत एकवाक्यता झालेली नाही. अशात भंडाऱ्यातही भाजप आता स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार नगरपालिकेची निवडणूक होत आहे. प्रभागनिहाय उमेदवारांची सर्वेनुसार चाचपणी पूर्ण झालेली असून स्थानिक महायुतीच्या घटक पक्षातील नेते असो, कार्यकर्ते असो किंवा अन्य कुणासोबतही निवडणुकीच्या युतीबाबत चर्चा झाली नसून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही निवडणूक लढविण्यात येईल आणि यासाठी भाजपची स्वबळावरची तयारी पूर्ण झाली आहे. युती करण्याची गरज वाटत नसल्याचा दावा भाजपाचे भंडारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आमदार परीणय फुके यांनी केला आहे.
पुण्यात बिबट्यांचा टोळीनं वावर, वाढत्या संख्येनं ग्रामस्थ भयभीत
पुण्यात बिबटे टोळीनं वावरतायेत, यामुळं बिबट्यांची संख्या किती वाढलीये हे यातून अधोरेखित होतंय. दहा चौरस किलोमीटरच्या परिघात एक बिबट्या अशी संख्या वनविभागाने गृहीत धरलेली आहे. मात्र जुन्नरमध्ये एकाचवेळी तीन-तीन बिबटे आढळलेत. त्यामुळं बिबट्यांची संख्या उत्तर पुणे जिल्ह्यात वाढलीये, हे स्पष्ट झालंय. हेचं बिबटे गुजरातच्या वनतारासह विविध राज्यातील वनक्षेत्रात कधी स्थलांतरित केले जाणार? याकडे भयभीत झालेल्या ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
Nagpur News : ऑक्टोबर महिन्यात विदर्भातील संत्रा उत्पादक पट्ट्यात आलेल्या परतीच्या पावसामुळे (स्थानिक भाषेत वाफशाचा पाऊस) आंबिया बहाराच्या संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले आहे... यंदा नेहमीच्या तुलनेत कमी उत्पादन असताना परतीच्या पावसामुळे असलेल्या उत्पादनापैकी 35 ते 40 टक्के संत्रे झाडावरून खाली गळून पडले.. तर झाडावर टिकून राहिलेल्या संत्र्याला *सतत पावसामुळे सालीवर डाग लागले.. त्यामुळे बाजारात संत्र्याचे दर खाली कोसळले आहे.. परिणामी कमी उत्पादन असल्याने यंदा चांगले दर मिळतील अशा अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे अपेक्षाभंग झाले आहे.. तर ऑगस्ट महिन्यात आंबिया बहाराचा संत्रा तोडण्यासाठी शेतकऱ्यांशी तेव्हाच्या स्थितीनुसार करार करणारे व्यापारी ही ऑक्टोबर महिन्याच्या या गळतीमुळे प्रचंड तोट्यात गेले आहे.. कारण ऑगस्ट महिन्यात शेतकरी आणि व्यापारी यांच्यात करार होत असताना यंदा बाजारात तेजी राहील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष ऑक्टोबर येता येता गळती आणि सालीवरील डाग या कारणामुळे उत्पादनही घटले आणि बाजारातील दर ही कोसळले आहे.. आता पुढील आंबिया बहारातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अपेक्षा आहेत..
कौटुंबिक कारणातून वडिलांसोबत मुलाचा वाद झाला. तो इतका विकोपाला गेला की, मुलांनं वडिलांना जबर मारहाण केली, यात वडिलांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील आथली गावात घडली. पुरुषोत्तम कुंभलवार (57) असं मृत व्यक्तीचं नावं आहे. तर, प्रदीप कुंभलवार (33) असं आरोपी मुलाचं नावं आहे. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मालाड जवळ मोठा अपघात
मध्यरात्री 1:30 च्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेली डंपर खाली बाईक गेल्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी जागेवरच मृत्यू तर एक व्यक्ती गंभीर जखमी
बोरिवली कडून अंधेरीच्या दिशेने येणारा मार्गावर मालाड जवळ हा अपघात झाला
भरधाव वेगाने जात असलेली डंपर ला मागून बाईक चालक चाकाखाली गेला आणि यावेळी डंपरने बाईक चालकाला चिराडल्यामुळे जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाली
घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉडी ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयामध्ये पाठवले आहेत
त्यासोबत कुरार पोलिसांनी ADR दाखल करून यामध्ये चूक कोणाचा आहे कशामुळे हा अपघात झाला या संदर्भात अधिक तपास करत आहेत....
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कोअर कमिटीची आज बैठक
आजच्या बैठकीत राज्यभरातील जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर स्थानिक पातळीवरील युती आघाडीबाबत निर्णय होणार
काही ठिकाणी कार्यकर्त्यांकडून स्थानिक पातळीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याबाबत सुर तर काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच लढायला हव अशी भूमिका
अजित पवारांच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकांमध्ये देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जायला हव अशी कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली होती
सकाळी ११ वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे पक्षाची बैठक
वाळूचं अवैध उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रॅक्टरनं मजुरीसाठी जाणाऱ्या सायकलस्वार मजुराला चिरडलं. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मीटेवानी इथं आज सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. अनिल बांगडे (28) असं मृत सायकलस्वाराचं नावं आहे. मृतक अनिल हा साखळी या गावातील असून तो सकाळी आपल्या सायकलने मजुरीसाठी तुमसर शहराकडे निघाला असताना पाठीमागून आलेल्या वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने त्याला चिरडलं. यानंतर सदर अपघातग्रस्त ट्रॅक्टरसह चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
कूपर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल रात्री सर्व डॉक्टर, इन्टर्न आणि विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी रुग्णालयाच्या परिसरात आंदोलन केलं. काही दिवसांपूर्वी एका रुग्णाच्या नातेवाईकाने तिघा डॉक्टरांना मारहाण केली होती. या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
आंदोलनादरम्यान डॉक्टरांनी ठणकावून सांगितलं की, “आम्ही रुग्णांची सेवा करतो, पण आमचं रक्षण कोण करणार? सुरक्षा नसेल तर आम्ही काम सुरू ठेवणार नाही.”
डॉक्टरांनी मुंबई महानगरपालिकेला सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत सुरक्षा व्यवस्थेबाबत ठोस पावले उचलली नाहीत, तर सोमवारी इमर्जन्सी सेवा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासन आणि महापालिका दोघांवरही दबाव वाढला आहे, तर संपूर्ण मुंबईतील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे मात्र थंडीचा कडाका देखील जाणवण्यास सुरुवात झाली आहे या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका अजून वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने यंदा थंडीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका वाढणार असून धुळे जिल्ह्यात देखील थंडीचा कडाका यंदा कायम राहणार आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज झाली असून 8.6 अंश सेल्सिअस एवढे तापमान आज नोंदवण्यात आले आहे..
नगरपरिषद आणि नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असून महायुती स्वबळावर लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे मात्र, काँग्रेसने महाविकास आघाडीचे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे सर्व मित्र पक्ष एकत्रित लढण्याची तयारी दर्शवली आहे. माजी आमदार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले की महाविकास आघाडी एकत्र लढण्यासाठी चर्चा सुरू आहे आणि जर युती झाली नाही तर स्वबळावर सुद्धा लढण्याची तयारी यावेळी त्यांनी दर्शवली आहे.... माहिती सोडणार ही स्पष्ट झाली असली तरी महाविकास आघाडीचे निर्णय मात्र अद्यापपर्यंत झालेला नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशनाचे आयोजित केलेय. या स्पर्धेत २ फॉर्च्यूनर , २थार, ७ ट्रॅक्टर आणि १५० दुचाकी इत्यादी स्पर्धेसाठी बक्षिसे ठेवण्यात आलीत. या बैलगाडी शर्यती साठी आणि अधिवेशनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 वाजता उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मंत्री शंभूराज देसाई , मंत्री संजय शिरसाठ, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आज श्री-नाथ केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा” तसेच श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन फेऱ्यांची जनरल बैलगाडा शर्यत आणि पट्टा पद्धतीची बैलगाडी शर्यत घेण्यात येणार असून चार ते पाच लाख शेतकरी बांधव या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तीन फेऱ्यांच्या बैलगाडी शर्यतीत विजेत्यांसाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. टोयोटा फॉर्च्युनर- २, महिंद्रा थार-२, ट्रॅक्टर ६ ते ७, मोटार सायकल – १५० अशी बक्षिसे विजेत्याना दिली जाणार आहेत. प्रथम पारितोषिक – टोयोटा फॉर्च्युनर, द्वितीय पारितोषिक – महिंद्रा थार, तृतीय, चतुर्थ व पाचवे पारितोषिक – ट्रॅक्टर, तर सहावे ते दहा र्यंत पारितोषिक – मोटारसायकल असेल. ओपन जनरल मैदान बैलगाडा शर्यतीसाठी देखील आकर्षक बक्षिसांची योजना ठेवण्यात आली असून, प्रथम पारितोषिक - फॉर्च्युनर, द्वितीय - थार, तृतीय ते पाचवे ट्रॅक्टर, सहा ते सात क्रमांकापर्यंत मोटारसायकल देण्यात येणार आहेत.
कौटुंबिक कारणातून वडिलांसोबत मुलाचा वाद झाला. तो इतका विकोपाला गेला की, मुलांनं वडिलांना जबर मारहाण केली, यात वडिलांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील आथली गावात घडली. पुरुषोत्तम कुंभलवार (57) असं मृत व्यक्तीचं नावं आहे. तर, प्रदीप कुंभलवार (33) असं आरोपी मुलाचं नावं आहे. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
धाराशिव मध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी मित्रपक्षांसह विरोधकही एकवटले आहेत. भूम परंडा नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत लढण्याची चिन्ह आहेत. अजित पवार गटाचीही त्याला साथ आहे. तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची रणनीतीसाठी बैठक झाली. त्यानंतर सावंतांनी ही एकला चलो रे चा नारा दिला. भाजप शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं यातच आमचा विजय आहे.आम्हाला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया यानंतर सावंत यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावात एका घराला अचानक लागलेल्या आगीत इरले कुटुंबीयांचे राहते घर जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती समोर आली असून आग इतकी भीषण होती की काही क्षणातच घरातील जीवनपयोगी साहित्य संपूर्ण जळून खाक झाले... सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही... मात्र इरले कुटुंबीयांचे प्रचंड नुकसान झाले असून मदतीची मागणी केली जात आहे.
नागपुरात कुख्यात गुंड अशफाक अन्वर खानने तुरुंगातून सुटका होताच, कायदा पायदळी तुडवत पुन्हा गुंडगिरी केल्याचे समोर आले आहे.. MPDA सारख्या कठोर कायद्यात शिक्षा भोगून नुकतच सुटका झालेल्या अश्फाक खान ने 5 नोव्हेंबरच्या रात्री नागपूरच्या मरियम नगर परिसरात अनेक कुटुंबीयांशी वाद घातले, एका तरुणाला बेदम मारहाण केली, काही महिलांवर हात उगारले, तर मरियम नगर मधील गल्लीत उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड करत लोकांच्या घरातील साहित्याची ही नासधूस केली... अश्फाक खान ची ही सर्व गुंडगिरी सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर अश्फा खानला अटक केली आहे
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने मानव वन्यजीव संघर्ष टोकाला गेलाय. तर दुसरीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रजननक्षम मादा नसल्याने वाघांची संख्या वाढण्यास अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील नुकत्याच प्रजननक्षम झालेल्या 8 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या स्थलांतराला स्थानिक गाईड आणि जिप्सी चालक यांनी कडाडून विरोध केलाय.
ड्रग्स तस्करी प्रकरणी अलिबाग पोलिसांनी एका 29 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. सूरज मनोज राणे, अस या तरुणाचे नाव असून तो अलिबाग मधील आक्षी साखर येथील रहिवासी आहे, जीममध्ये जाणाऱ्या आणि इतर साहसी खेळ खेळणाऱ्या तरुणांना तो बेकायदेशीररित्या मेफेन्टरमाईन सल्फेट इंजेक्शन विकायचा पोलिसांना ही बातमी कळताच या आरोपीकडून दहा बाटल्या मेफेन्टरमाईन इंजेक्शन आणि काही रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. सुरज राणे हा गावातील फॅब्रिकेशन आणि वेल्डींगच्या दुकानाचा मालक असून तो या धंद्याच्या आड ड्रग्ज विक्री करायचा ,डॉक्टरांच्या परवानगीशिवाय ही औषधे १८ ते ३५ वयोगटातील युवकांना तसेच अल्पवयीन मुलांना देखील पुरवली जात होती. यापूर्वीही सूरज राणेवर हल्ला, गुन्हा दाखल होण्याची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात असल्याचे समोर आले आहे.
धाराशिवच्या दुष्काळी भागात, तीनशे एकर डोंगरातील खडकाळ जमिनीवर तब्बल सव्वा लाख झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये जवळपास 50 हजार दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींचाही समावेश आहे. बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर यांनी या ठिकाणी इकोव्हिलेज साकारत ध्यानकेंद्र , वाचनालय , आयुर्वेदिक रुग्णालय उभा केले. आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना या ध्यान केंद्रातून एक मानसिक आधार दिला जात आहे. गेल्या पाच ते सहा वर्षाच्या कालखंडात डोंगराळ भागात ही देशी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली.
- शरणपूर रोड गोळीबार प्रकरणातील फरार संशयित गुन्हे शोध पथकाने घेतला ताब्यात...
- लंबोदर फसाळे याला धोंडेगाव जंगल परिसरातून सापळा रचून केले जेरबंद...
- लंबोदर फसाळे हा धोंडेगाव नदी परिसरात असल्याची पोलिसांनी मिळाली होती गुप्त माहिती...
- मागील आठवड्यात शरणपूर रोड परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने गाड्यांची तोडफोड करत केला होता गोळीबार...
- गोळीबार प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्हे शोध पोलिसांची मोठी कामगिरी...
- नाशिक पोलिसांकडून शहरातील वाढत्या गुन्हेगारीनंतर शहरात गुन्हेगारांवर सुरू आहे क्लीनअप मोहीम...
मिरारोड पोलीस ठाण्यातच काही नशेत असलेल्या तरुणांनी सिगारेट ओढत व्हिडिओ तयार केला आणि तो समाजमाध्यमांवर पोस्ट केल्याने पोलिस विभागाची मोठी फजिती झाली आहे. या घटनेनंतर तिन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. मारहाणीच्या प्रकरणात काही तरुणांना चौकशीसाठी मीरारोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. चौकशी सुरू होण्यापूर्वी त्यांना तात्पुरते ठाण्यातील स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आले होते. त्याचदरम्यान, नशेच्या अवस्थेत असलेल्या या तरुणांनी सिगारेट ओढत ठाण्याच्या आतच व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर टाकला.
हा व्हिडिओ काही तासांतच व्हायरल झाल्याने शहरभरात खळबळ उडाली. “पोलीस ठाण्याच्या चार भिंतींच्या आत असा प्रकार कसा घडू शकतो?” असा प्रश्न नागरिक आणि स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आला. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही घटना अतिशय गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात मीरारोड पोलिसांनी तिन्ही तरुणांना अटक करून त्यांच्यावर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष केल्याबद्दल संबंधित अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यांतील सुरक्षा व देखरेख प्रणालीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्यातील देखरेख कडक करण्याचे आदेश दिले आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: मिरारोड पोलीस ठाण्यातच काही नशेत असलेल्या तरुणांनी सिगारेट ओढत व्हिडिओ तयार केला आणि तो समाजमाध्यमांवर पोस्ट केल्याने पोलिस विभागाची मोठी फजिती झाली आहे. या घटनेनंतर तिन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. मारहाणीच्या प्रकरणात काही तरुणांना चौकशीसाठी मीरारोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. चौकशी सुरू होण्यापूर्वी त्यांना तात्पुरते ठाण्यातील स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आले होते. त्याचदरम्यान, नशेच्या अवस्थेत असलेल्या या तरुणांनी सिगारेट ओढत ठाण्याच्या आतच व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर टाकला.
हा व्हिडिओ काही तासांतच व्हायरल झाल्याने शहरभरात खळबळ उडाली. “पोलीस ठाण्याच्या चार भिंतींच्या आत असा प्रकार कसा घडू शकतो?” असा प्रश्न नागरिक आणि स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आला. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही घटना अतिशय गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात मीरारोड पोलिसांनी तिन्ही तरुणांना अटक करून त्यांच्यावर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष केल्याबद्दल संबंधित अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यांतील सुरक्षा व देखरेख प्रणालीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्यातील देखरेख कडक करण्याचे आदेश दिले आहेत.