- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यास तीन दिवस उरले आहेत. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का याकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर राज्यात देखील विविध ठिकाणी...More
Anchor:-"कामधंदा नाही, पैसेही नाहीत... मग घर चालवायचं कसं?" या प्रश्नाने त्रस्त झालेल्या एका तरुणाने चोरीचा मार्ग निवडत अनोख्या प्रकारे उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. कल्याण शहरातून रस्त्यावर उभी असलेली एक रिक्षा चोरी करून तीच रिक्षा चालवत तो प्रवासी भाडे घेत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार फार काळ लपून राहिला नाही.
कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास करताना संशयास्पदपणे रिक्षा चालवणाऱ्या या तरुणाला अडवले. चौकशीत चोरीचा प्रकार उघड झाला आणि पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली. आरोपीचे नाव आशिष मोरे असून तो कर्जतजवळील भिवपुरी परिसरात राहतो.
आशिष याच्याकडे कोणताही रोजगार नव्हता. आर्थिक तंगी वाढल्याने त्याने चक्क कल्याण शहरातील एक रिक्षा चोरी केली आणि त्याच रिक्षेतून प्रवासी सेवा देत दिवस काढू लागला. मात्र, संबंधित रिक्षा मालकाने चोरीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध घेत त्याला रिक्षात प्रवासी बसवत असतांना महात्मा फुले पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली.
रवींद्र चव्हाण
ज्या विश्वासाने प्रवेश केलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
लोकप्रतिनिधी कसा असावा हे संजय जगताप यांच्याकडे बघून वाटायचं
संजय जगताप यांना मी नेहमी सांगायचं तुम्ही चुकीच्या पार्टीमध्ये काम करतोय
तेही सांगायचे मला कळतंय पण वळत नाही आज ती वेळ आली आहे
जेजुरी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्ति आहे ते मला कळलं आणि त्या ठिकाणी जाऊन देखील मी दर्शन घेतलं
विमानतळ, गुंजवणी, पाण्याचा प्रश्न इथे जे जे प्रश्न आहेत यांना मार्गस्थ करणे महत्त्वाचा आहे
प्रत्येकाला विचाराच्या प्रवाहामध्ये कसा आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत
पुन्हा एकदा प्रकल्प असतील त्यावरती सरकार काम करेल
सातारा
आरोग्य यंत्रणेने दिलेलीच प्रमाणपत्रे ठरली बोगस
पात्र शिक्षक ठरू लागले अपात्र
दिव्यांग शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस?
दोषी शिक्षकांवर होणार फौजदारी किंवा निलंबनाची कारवाई
अँकर:-
सातारा जिल्ह्यात 581 दिव्यांग शिक्षकांच्या तपासण्या सुरू आहेत आत्तापर्यंत 162 दिव्यांग शिक्षकांच्या तपासण्या झाल्या तपासणीमध्ये आत्तापर्यंत 25 शिक्षक व पात्र तर अकरा शिक्षक गैरहजर राहिल्यामुळे 36 जणांना नोटीसा शिक्षण विभागाने धाडले आहेत.सातारा जिल्ह्यात दिव्यांग शिक्षकांना आरोग्य यंत्रणेने यापूर्वी दिलेली ऑनलाइन प्रमाणपत्र खोटी ठरवून आता अपात्र ठरवत शिक्षकांना नोटिसा दिल्या जात आहेत. या नोटिसांमुळे दिव्यांग शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणेने दिलेलीच प्रमाणपत्रे खोटी ठरवली जात असल्याने प्रमाणपत्र देणारी यंत्रणा बोगस आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. दिव्यांग शिक्षकांना अपात्र कोणत्या कारणाने ठरवले याचे कारण दिले जात नसल्याने त्या विरोधात आता शिक्षक न्यायालयाच्या गेले आहेत.
Wkt वैभव बोडके.
राज्यात दिव्यांग शिक्षक असल्यास त्याचा लाभ पती- पत्नीला तसेच शिक्षक मुलगा दिव्यांग असल्यास आई-वडिलांना होतो. आता या अपात्र दिव्यांग शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असून जे शिक्षक अपात्र ठरतील त्यांच्यावर फौजदारी किंवा निलंबनाची कारवाई होणार आहे. अशी माहिती देखील जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिश नायकवडी यांनी दिली आहे.
बाईट :- अनिश नायकवडी, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी
ग्राफिक्स
शिक्षकांचे म्हणणे काय?
यापूर्वी दिव्यांग तपासणीत हात लावून चेक केले जात होते आणि रिपोर्ट पाहून प्रमाणपत्र ऑनलाइन दिले जात होते
आत्ताच्या तपासणीत शिक्षकांना 10 फुटावर उभे करून केवळ शरीराचा अवयवाची हालचाल करायला सांगून पात्र -अपात्र ठरवले
तपासणी डॉक्टरांच्या टीमने केली तर अपात्र का ठरवली याची कारणे शिक्षकांनी द्यावीत.
आपत्र ठरवण्याचे निकष काय याची शिक्षकांना माहिती दिली जात नाही
शिक्षक किती टक्के अपंग आहे न सांगता केवळ पात्र-अपात्र शेरा मारला गेला
तीन दिवसात म्हणणे मांडा अथवा कारवाईला सामोरे जायचं
केंद्र सरकारच्या यु डी आय कार्ड असलेल्या दिव्यांग शिक्षकांनाही अपात्रतेची नोटीस
यापूर्वी आरोग्य विभागाने पात्र ठरवलेले दिव्यांग शिक्षक आता अपात्र कसे?
यावर जिल्हा शल्य चिकित्सक यांचे म्हणणे काय होते..पूर्वीचे राज्य शासनाने दिलेले निकष बदलल्याने आत्ताच्या निकषानुसार दिव्यांग शिक्षक अपात्र ठरत आहे. आरोग्य यंत्रणा कोणालाही चुकीचे प्रमाणपत्र देत नाही अशी माहिती जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितला आहे..
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक बाईट.. डॉक्टर.युवराज करपे..
बीड: ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती स्थिर पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवले - जिल्हा रुग्णालय प्रशासन
Anc: ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अतिदक्षता विभागात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा.. या मागणीसाठी आक्रमक होत विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला..
जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचार अतिदक्षता विभागात केले जात आहे. सध्या ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती स्थिर असून विष किती मात्रामध्ये घेण्यात आले? विष कोणत्या प्रकाराचे आहे? हे स्पष्ट झालेले नाही. पुढील तपासणीसाठी त्याचे सॅम्पल घेण्यात आले आहे.
बाईट:डॉ.अमोल जोगदंड - जिल्हा रुग्णालय बीड
पुणे हर्षवर्धन सपकाळ बाईट
प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेला हल्ला अत्यंत भ्याड आणि केविलवाणा आहे. जे या देशात वैचारिक मांडणी करतात समतावाद आणि याची भावना व्यक्त करतात त्यांच्यावर हल्ला होत आहे. ही असली परंपरा भारतीय जनता पक्षाच्या काही बगलबच्चाने सुरू केली आहे.
शिव शाहू फुले आंबेडकरांची वैचारिक भूमिका मांडणारा गांधीचा विचार मांडणारा जो तरुण कार्यकर्त्यावर केलेला हा हल्ला आहे.
ज्यांच्यावर मोका लावला पाहिजे जे आज जेलमध्ये राहिला पाहिजे ते लोक जर आज गॉडफादर म्हणून सत्ताधीशाच नाव घेत असेल तर ही महाराष्ट्राच्या साठी शरमेची बाब आहे.
कायदेशीर बाबीची पूर्तता या ठिकाणी केली पाहिजे विधिमंडळात सुद्धा आवश्यक त्या सूचना काँग्रेस पक्षाने हा प्रश्न उठवण्यासाठी दिलेले आहेत तसेच जे आंदोलन होतात निवेदन देतात त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासोबत आहे.
जनसुरक्षा नावाचा कायदा सरकार आणत आहे आणि इथेच सर्वसामान्य नागरिक असुरक्षित आहेत अर्बन नक्षलवाद हा नवा शब्द आणला आहे. एका नागरिकांवर हल्ला होत असताना हे सरकार कारवाई करण्याच्या ऐवजी पळ काढते हे लक्षात आलं आह
देशात आणि महाराष्ट्रात अराजकतावाद निर्माण करण्याचा भारतीय जनता पक्षाचा एकंदरीत विषय आहे. त्यांना संविधान बदलून देशाचा समतावाद संपवायचा आहे आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप ते करत आहेत.
हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या मागे चंद्रशेखर बावनकुळे आहे त्यांच्यामागे दस्तकखुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. यांच्या इज्जतीचे लक्तरे आता वेशीवर टांगल्यानंतरही जर हे बहिऱ्याचे मुख्याचे सोंग घेत असतील तर आगामी काळात आमच्या सर्व जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
मुंबईच्या जुहू परिसरातील घरफोडीचा पर्दाफाश!
१.१५ कोटींच्या चोरीप्रकरणी दोघे अटकेत;
जुहू पोलिसांनी आरोपीकडून ८० लाखांचा ऐवज हस्तगत.
अँकर:- मुंबईच्या जुहू परिसरातील बंद घरातून तब्बल १.१५ कोटींचे सोनं, हिरे आणि मौल्यवान दागिने चोरणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे. घर बंद असताना दोन कपाटे फोडून सुमारे २.६ किलो वजनाचे दागिने व महागड्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार जुहू पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.या गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा असतानाही पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत दोघा आरोपींना अटक केली. एकास झिरकपूर, पंजाबमधून तर दुसऱ्यास कोपरखैरणे, नवी मुंबई येथून अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव सनी चांद पवार वय 25 वर्ष, राहुल सदाशिव मुदाने वय 22 वर्ष आहे.हे आरोपी छाप्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी अंदाजे १.६ किलो वजनाचे आणि ८० लाख किंमतीचे दागिने, एक ५०,००० किंमतीची दुचाकी, तसेच २३,००० रुपयांचा मोबाईल फोन असा मुद्देमाल जुहू पोलिसांनी या आरोपी कडून हस्तगत केली आहे. हे आरोपी सराईत चोर असून यांचा विरुद्ध मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद आहे. सध्या अटक आरोपीकडून मुंबई शहरात आणखी नवीन चोरी केली आहेत का त्यासोबत या टोळीमध्ये आणखी कोण सदस्य आहेत का या संदर्भात अधिक तपास जुहू पोलीस करत आहे...
पन्नास लाखाची रोकड हिसकावली
पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात जबरी चोरीचा प्रकार
पुणे पोलीसांच गुन्हेगारीकडे दुर्लक्ष ?
पुणे शहरात भुरट्या चोऱ्या वाढल्या
Anchor-
थार गाडीतून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीकडील 50 लाखाची रोकड असलेली बॅग हिसकोल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजता च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पैसे हिसकवण्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील अभिजीत पवार हे त्यांचा मित्र मंगेश ढोणे याच्यासोबत 50 लाख रुपये घेऊन पुण्यातील एका व्यक्तीला देण्यासाठी आले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास आंबेगाव पठार येथील बाबजी पेट्रोल पंप येथून रस्त्याने पाय चालत जात असताना काळया रंगाच्या थार गाडीतून आलेल्या दोघांनी ढोणे यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला. चोरटे नवले पुलाच्या दिशेने पळून गेले. घटनेची माहिती मिळत असताना पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते. याबाबत आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मागील काही दिवसापूर्वी शहरात घरफोडीचे आणि जबरी चोरीचे प्रकार चांगलेच वाढीस लागले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुंबईच्या खार परिसरात भोंदूबाबा बनून दागिने लंपास! खार पोलिसांकडून आरोपीला अकोल्यातून अटक; ५९ ग्रॅम सोनं जप्त
फ्लॅश:- वेशांतर करून घरोघरी जाऊन पूजा करण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाची पोलिसांनी अखेर पोलखोल केली आहे. आरोपीने पूजा विधीच्या नावाखाली दागिने घेऊन पोबारा केला होता. संबंधित तक्रार खार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत अकोला जिल्ह्यातून आरोपीला अटक केली.
गुन्ह्यातील इसमाने विविध वेशांतर करून लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत पूजा, दक्षिणा आणि ग्रहबाधा निवारणाचे बहाणे करत दागिने उचलले. पीडित महिलेला भुरळ घालून तिच्याकडील सुमारे ५९ ग्रॅम वजनाचे दागिने पूजा विधीसाठी घेतले होते. मात्र पूजा पूर्ण झाल्यानंतर तो गायब झाला.
महिलेच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी आरोपी भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज त्यासोबत तांत्रिक तपास करत आरोपीला अटक केली आहे.
अटक आरोपीने मुंबई शहरात अजून किती ठिकाणी फसवणूक केली आहे त्यासोबत या आरोपीच्या आणखी कोण साथीदार आहेत का या संदर्भात अधिक तपास खार पोलीस करत आहे....
मुंबई : वेशांतर करून घरोघरी जाऊन पूजा करण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाची पोलिसांनी अखेर पोलखोल केली आहे. आरोपीने पूजा विधीच्या नावाखाली दागिने घेऊन पोबारा केला होता. संबंधित तक्रार खार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत अकोला जिल्ह्यातून आरोपीला अटक केली.
गुन्ह्यातील इसमाने विविध वेशांतर करून लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत पूजा, दक्षिणा आणि ग्रहबाधा निवारणाचे बहाणे करत दागिने उचलले. पीडित महिलेला भुरळ घालून तिच्याकडील सुमारे 59 ग्रॅम वजनाचे दागिने पूजा विधीसाठी घेतले होते. मात्र पूजा पूर्ण झाल्यानंतर तो गायब झाला.
महिलेच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी आरोपी भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज त्यासोबत तांत्रिक तपास करत आरोपीला अटक केली आहे.
अटक आरोपीने मुंबई शहरात अजून किती ठिकाणी फसवणूक केली आहे त्यासोबत या आरोपीच्या आणखी कोण साथीदार आहेत का या संदर्भात अधिक तपास खार पोलीस करत आहे.
सातारा : जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बनपुरी येथे किरकोळ अपघातानंतर नुकसान भरपाई देण्याच्या वादातून चार चाकी वाहन चालकास बेदम मारहाण केली त्यामध्ये त्या वाहनचालकाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील वायरल होत आहे..या घटनेला एक महिना होऊन देखील मारहाण करणाऱ्यातील काही आरोपी मोकाट आहेत. या प्रकरणात रवींद्र दंगेकर आणि लोणार समाज शिष्टमंडळात यांनी पोलिसांना घेराव घातला.. पोलिसांकडून तपासामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप देखील यावेळी संजय कचरे यांचे घरातल्यांनी केला आहे.. सर्व आरोपींना अटक झाली नाही तर लोणार समाज आणि कचरे कुटुंब पोलीस स्टेशन समोर उपोषण करणार असल्याचे कचरे कुटुंब यांनी सांगितला आहे..
राज्यातील पुणे आणि भिवंडी बनले आहे बनावट नोटा छापण्याचे केंद्रबिंदू .
राज्य शासनाने स्वःताच मान्य केली अवैध कारखान्याची बाब.
2020 पासून ते आजपर्यंत राज्यात 273 गुन्हे दाखल झाले असून 566 जणांना पोलिसांकडून अटक.
पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन आणि भिंवडी येथे हे गुन्हे दाखल झाले आहेत.
आतापर्यंत 1 कोटी 40 लक्ष किमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत
संजय राऊत म्हणजे दररोज सुरू असणाऱ्या टीव्ही मलिका सारखा कार्यक्रम आहे. केवळ मनोरंजनाच साधन म्हणून त्यांच्याकडे पाहिला पाहिजे. दररोज टीआरपी मिळाला की विषय संपला
आधी राहुल कुल यांच्यावर आरोप केले हाती शून्य त्यानंतर आमदार सुनील शेळके पुन्हा हाती काहीच लागलं नाही आता माझ्यावर आरोप केले. ज्यांच्या ऐकण्यावरून त्यांनी आरोप केले त्याची आमच्या लेखी शून्य किंमत आहे.
ज्या काळाबाबत संजय राऊत आरोप करत आहेत त्या काळात म्हणजेच २०१६ च्या काळात महापालिकेसोबत माझा काहीच संबंध नव्हता ते हे विसरत आहेत की त्यावेळी त्यांच्याच पक्षाचा महापौर त्याठिकाणी होता
यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी यांनी तक्रारी केल्या परंतु चौकशी काहीच हाती लागलं नाही. अजित पवारांवर देखील आरोप केले परंतु अशा व्यक्तींवर आरोप करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही.
Beed News : महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही का? या कुटुंबाने स्वतःला संपून घेतल्यावर सरकारला जाग येणार आहे का? महादेव मुंडे यांचं काय झालं याचे उत्तर गृहमंत्र्यांनी अधिवेशनात दिलं पाहिजे. पालकमंत्री महादेव मुंडे यांना आधी तिला असं वाटलं होतं मात्र तसंही दिसत नाही. असे म्हणत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
18 महिन्यांपासून महादेव मुंडे यांना न्याय मिळत नाही हे निर्घुण हत्याकांड करणारे आरोपी कोण,हे का मोकाट आहेत. न्याय मिळावा यासाठी कुटुंबांनी उपोषण केलं आंदोलन केलं संविधानिक मार्गाने लढा दिला.अखेर हतबल होऊन माझ्या नवऱ्याला आणि लेकाला न्यायच मिळत नाही म्हणून पत्नीने आणि आईने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचेही केदार म्हणाले आहेत.
कोयना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे आज पुन्हा कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे, त्यामुळे सांगली शहरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी. काल कोयना धरणातून 5500 पाण्याचा विसर्ग सुरू होता, त्यामध्ये आज वाढ करण्यात करून 11 हजार 400 क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांवरून थेट 3 फुट 6 इंच उघडून 9 हजार 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग विसर्ग सुरू असून पायथा विद्युत गृहातून 2100 सोडले जात असल्यामुळे कोयना नदीत एकूण 11 हजार 400 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं असल्याची माहिती समोर आली असून गृह विभागाने विधान परिषदेत या बाबत कबुली दिली आहे. गृह खात्याकडून लेखी उत्तरात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर शहरात जानेवारी 2024 ते मे 2025 अखेर पर्यंत एकूण 5897 जण बेपत्ता झाले आहेत. महिला व पुरुष 4923 बेपत्ता झाले आहेत तर 776 मुली व मुळे बेपत्ता झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस सर्विस फॉर सिटीझेन पोर्टल या संकेतस्थळावर 2024 ते 2025 या कालावधीत अठरा वर्षाखालील बेपत्ता मुलींची संख्या 4096, तसेच 18 वर्षावरील बेपत्ता पत्ता महिलांची संख्या 33599 अशी दर्शवण्यात आली आहे. 2021 ते 2025 या चार वर्षाच्या कालावधीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि छेडछाडीचे एकूण 16160 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात हरवलेल्या महिला व बालकांसाठी ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम प्रत्येक स्तरावर राबविण्यात आली आहे.
उदयपूर फाईल्स चित्रपट प्रदर्शन रखडले
सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारच्या निर्णयापर्यंत वेट अँड वॉचची भूमिका
सेन्सर बोर्डात आज दुपारी २:३० वाजता होणार सुनावणी
सेन्सर बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्रावर पुनर्विचार याचिका दाखल झाल्या आहेत त्यावर आज सुनावणी
सेंसर बोर्डाच्या निर्णयापर्यंत सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
उदयपूरच्या कन्हैय्या लाल हत्याकांडावर आधारित उदयपूर फाईल्स चित्रपट
दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शनावर दिली आहे स्थगिती
Beed News : बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण खुनाला तब्बल 18 महिने उलटले… पण आरोपी अजूनही मोकाटच आहेत. पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या कित्येक दिवसांपासून न्यायासाठी एसपी ऑफिसच्या उंबरठ्यावर चकरा मारत आहेत… परंतु न केवळ आरोपी मोकाट आहेत, तर चौकशीचाही वेग नाही. शेवटी हतबल होऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता…
आज तो अल्टिमेटम संपतोय!
त्यामुळे एसपी कार्यालयासमोर आज त्या आत्मदहन करणार असल्याचं स्पष्ट झालं असून, परिस्थितीचा अंदाज घेत बीड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
कोल्हापूर : प्राडाच्या 4 सदस्यांनी आज सकाळी कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल दुकानांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधला. तसच कोल्हापुरी चपलांचे विविध प्रकार बघून प्राडाचे सदस्य अक्षरशः थक्क झाले. कोल्हापुरी चपलेचे एवढे प्रकार असतात हे प्राडाच्या सदस्यांनी पहिल्यांदाच समजलं. तसंच प्राडाच्या फॅशन शोमध्ये वापरली गेलेली चप्पल ही कोल्हापुरीच असल्यास देखील आता स्पष्ट झाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या समवेत कोल्हापुरी चपलांची चपलांच्या दुकानांची पाहणी करत सदस्यांनी ही माहिती घेतली आहे.
ठाण्यात घोडबंदर रोड वर प्रचंड वाहतूक कोंडी
वाहतूक दोन्ही मार्गांवर गाड्यांच्या रांगा लागल्या
गायमुख घाटाजवळ ठाण्याच्या दिशेने रस्त्यावर एक वाहन डिव्हायडरला धडकल्याने गायमुख परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाले आहे
ब्रह्मांड सिग्नल जवळ दोन अवजड वाहनांमध्ये अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली
मेट्रोचा काम सुरूअसताना सिमेंट मिक्सर वाहनाचा ऑपरेटरला दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
वाहतूक विभागाकडून रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत...
कोल्हापुरच्या हद्द वाढीचा मुद्दा आज विधानसभेत
आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत लक्षवेधी
कोल्हापुरच्या हद्द वाढीच्या मुद्यावर गेली अनेक वर्षांपासून स्थानिकांच आंदोलन सुरु आहे
कोल्हापुर महापालिका स्थापनेपासून अद्याप पर्यंत हद्द वाढ न झाल्याने शहराचा विकास होत नसल्याची अनेकांची भावना
जर हद्द वाढ केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची विरोध करणा-या स्थानिकांची भुमिका
त्यामुळे सरकार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हद्द वाढ करणार की जैसे थे परिस्थिती ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष
पाऊस नसतांना देखील नागपूरच्या मनीषनगरच्या अंडरपास मध्ये तुडुंब पाणी भरले आहे..
साफसफाईला घेवून नागपूर महानगर पालिकेच्या दोन झोनमधील वादामुळे अंडरपासची ड्रेनेज सिस्टीम ब्लॉक झाल्याने हे पाणी तुंबले आहे ...
या परिस्थितीत गुडघाभर पाण्यातून वाहकांना वाहने काढावी लागत आहे ...
मनीषनगरचा हा अंडरपास ६०० मिटर लांब आहे. अंडरपासचा ३०० मीटर भाग लक्ष्मीनगर झोन मध्ये येतो तर उर्वरीत ३०० मीटर भाग धंतोली झोन मध्ये येतो.
त्यानुसार अंडरपास साफसफाईची जबाबदारी पण दोन विभागात वाटली आहे. मात्र सफाईकर्मचारी सीमारेषेचा फायदा घेत सफाई करतांना चालढकलपणा करत असल्याने नेहमीच हे दृश्य राहत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर: शिरेगाव येथील शेतकरी सुरेश जगन्नाथ काहाळे यांनी लासुर स्टेशन येथील वैजापूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेतून अडीच लाख रुपये काढले. काढलेली रक्कम सेंट्रल बँकेत भरण्यासाठी गेले. बँकेतील कर्मचारी जेवणासाठी गेले असल्याने जगन्नाथ कहाळे यांनी पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. दुचाकी पंचर झाली असल्याने नागपूर मुंबई महामार्गावरील सावंगी चौक येथील पंचरच्या दुकानासमोर लावली.यावेळी अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीला सरकार ने दिली स्थगिती.
आज पासून राज्यातील एक लाख होमिओपॅथिक डॉक्टर करणार आझाद मैदानात आंदोलन.
महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलचे प्रशासक डॉक्टर बाहुबली शहा यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात अकरा वाजेपासून होणार उपोषणाला सुरुवात.
राज्यभरातून हजारो होमिओपॅथिक डॉक्टर आंदोलनात सामील होण्यासाठी मुंबईच्या दिशेने.
CCMP ब्रिज कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या नोंदणी बुकात नोंद करण्याच्या मागणीसाठी आजपासून आझाद मैदानात एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांच आंदोलन.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये 80% पेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध
मागील काही दिवसांपासून जलाशय क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे
आज सकाळी सहा वाजेपर्यंत 80.32% पाणीसाठा या सात जलाशयांमध्ये उपलब्ध झाला आहे
Bhandara : 13 वर्षांपूर्वी भेल प्रकल्पासाठी भंडाऱ्याच्या मुंडीपार सडक येथील सुमारे 600 एकर शेती अधिग्रहित करण्यात आली. गावात उद्योग व्यवसाय येत असल्यानं नोकरीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी शेती दिली. मात्र, 13 वर्षांचा कालावधी लोटलेला असतानाही उद्योग आला नाही. परिणामी, एकीकाळी साधन शेतकरी असलेले आता भूमिहीन आणि बेरोजगार झाले आहे. त्यामुळं जोपर्यंत भेल प्रकल्प सुरू होत नाही, तोपर्यंत ती शेती आम्ही कसणार आणि त्यातून पिकाचं उत्पादन घेणार असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात मागील महिन्यात शेकडो शेतकऱ्यांनी भेलच्या ताब्यातील शेतीवर ट्रॅक्टरनं नांगरटी केली. आणि त्यात बियाणं पेरलं. आता याच प्रकरणात भेल कंपनीकडून बळजबरीनं शेती कसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 16 शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. यासोबतचं २०० शेतकऱ्यांना अतिक्रमणाची कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.
कोल्हापुरच्या हद्द वाढीचा मुद्दा आज विधानसभेत
आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत लक्षवेधी
कोल्हापुरच्या हद्द वाढीच्या मुद्यावर गेली अनेक वर्षांपासून स्थानिकांच आंदोलन सुरु आहे
कोल्हापुर महापालिका स्थापनेपासून अद्याप पर्यंत हद्द वाढ न झाल्याने शहराचा विकास होत नसल्याची अनेकांची भावना
जर हद्द वाढ केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची विरोध करणा-या स्थानिकांची भुमिका
त्यामुळे सरकार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हद्द वाढ करणार की जैसे थे परिस्थिती ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष
कोल्हापुरच्या हद्द वाढीचा मुद्दा आज विधानसभेत
आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत लक्षवेधी
कोल्हापुरच्या हद्द वाढीच्या मुद्यावर गेली अनेक वर्षांपासून स्थानिकांच आंदोलन सुरु आहे
कोल्हापुर महापालिका स्थापनेपासून अद्याप पर्यंत हद्द वाढ न झाल्याने शहराचा विकास होत नसल्याची अनेकांची भावना
जर हद्द वाढ केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची विरोध करणा-या स्थानिकांची भुमिका
त्यामुळे सरकार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हद्द वाढ करणार की जैसे थे परिस्थिती ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष
मालेगाव : मालेगावातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्सच्या माध्यमातून प्रॅक्टिस करणाऱ्या एका 16 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलमधीलच मोहम्मद अथर खुर्शिद अहमद याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले..ही घटना 13 जुलैला पहाटे 3.30 बाजेच्या सुमारास घडली..मोहम्मद अथर खुर्शिद अहमद याने या नर्सिंग कोर्स करणाऱ्या पीडितेला एक फोटो दाखवत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.घडलेल्या प्रकाराबाबत पीडितेने मैत्रिणीकडे व कुटुंबीयांकडे वाच्यता केली..त्यानंतर छावणी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला..दरम्यान, संशयित मोहम्मद अथर खुर्शिद अहमद याच्यावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे..
महाराष्ट्र सहकारी राज्य संघाच्या संचालक निवडणुकी शिंदेंच्या शिवसेनेची इंट्री
शिंदेंच्या शिवसेनेचे कोकण डिविजनमधून अरूण पानसरे यांची बिनविरोध निवड
पानसरे हे शहापूरचे रहिवाशी असून ते सहकार पॅनलमधून निवडणूकीस उभे होते
मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, संजीव कुसाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सहकारी राज्य संघाच्या संचालक निवडणुकीसाठी ‘सहकार पॅनल’चे २१ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत
यात प्रवीण दरेकर त्यांचे बंधु प्रकाश दरेकर आणि अरूण पानसरे याची बिनविरोध निवड झाली आहे
२७ तारखेला महाराष्ट्र सहकारी संघ राज्यची निवडणूक होणार आहे
धाराशिव पोलिसांचे ऑपरेशन गोमाता, चाळीस दिवसात 330 गोवंशाची सुटका
गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकी विरोधात धाराशिव पोलीस ॲक्शन मोडवर
गोवंश तस्करी करणाऱ्या 22 जणांविरोधात गुन्हे दाखल, तर 25 वाहनांसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
आतापर्यंत 7500 किलो गोमांस जप्त, 25 जनावरांची चामडी ही जप्त
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वात पोलिसांची धडक कारवाई
अवैद्यपणे सुरू असलेल्या गोवंश तस्करी विरोधात ऑपरेशन गोमाता राबवत धाराशिव पोलिसांनी गेल्या 40 दिवसात 330 गोवंशाची सुटका केली आहे. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वात गोवंश तस्करी विरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली. आतापर्यंत 22 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 7500 किलो गोमांस देखील जप्त करण्यात आला आहे. गोवंश तस्करी करणाऱ्या 25 गाड्यांसह तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि धाराशिव तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी विरोधात कारवाई पाहायला मिळते.
भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरुच
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सकाळी आठ वाजता ही बैठक
बैठकीत पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती
याआधी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक संपन्न
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठका
मुख्यमंत्र्यांसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची देखील बैठकीला उपस्थिती असणार
जिल्ह्यातील जळगाव - जामोद हुन पुण्यासाठी काल सायंकाळी निघालेल्या एका खाजगी बसचा चालक मध्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा प्रकार प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी सदर व काही अंतरावर थांबवून चालकाला जाब विचारला यावेळी सदर खाजगी बसच्या मालकाला फोनवरून माहिती दिली असता या बस मालकाने सुद्धा उडवा उडवी ची उत्तरे देऊन प्रवाशांचा रोष उडवून घेतला मात्र अशा मध्य धुंद चालकामुळे बसमधील व रस्त्यावरील नागरिकांचे धोक्यात आले होते यावर आता परिवहन विभाग काय कारवाई करणार हे बघणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे बस चालकाने मध्य प्राशन केल्याची कबुली प्रवाशांना दिली.
Bhandara: मतिमंद तरुणी घरी एकटीचं असल्याचं बघून घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणानं तिच्यावर बळजबरी केली. ही संपूर्ण आपबिती पीडितानं कुटुंबीय सायंकाळी घरी आल्यावर हातवारे करीत आणि आरोपीच्या घरी नेतं सांगितली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. अनिकेत बन्सोड (२९) असं आरोपीचं नावं असून ही घटना तुमसर तालुक्यात घडली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्यानं पीडितेचे कुटुंबीय शेतावर गेले असताना ही घटना घडली.
गेटवे ऑफ इंडिया जवळील प्रवासी जेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदिल
स्थानिक रहिवासी संघटनांनी जेट्टीच्या बांधकामविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
जेट्टी ही लोकोपयोगी असल्याने त्याला विरोध करण योग्य नाही उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट
या प्रकरणी १ जुलैला सुनावणी पूर्ण झाली होती मात्र उच्च न्यायालयाने ठेवला होता निर्णय राखून
स्थानिक रहिवासी संघटनांना विश्वासात न घेता प्रकल्प लादल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती
प्रस्तावित जेट्टी ही हेरिटेज १ श्रेणीतील गेट वे ऑफ इंडियाच्या १०० मीटर परिघात असल्याने त्याला वाचवणे गरजेचे असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला होता
तसेच प्रस्तावित जेट्टीकडे जाणारे अरुंद रस्ते त्यामुळे तिथे होऊ शकणारी वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांच्या समस्या याकडे देखील याचिकेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आल्या होत्या
शिवसेनेचे माजी खासदार हेंमत गोडसें पक्षात नाराज
-
हेंमत गोडसें सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहे
-
पक्षाचे संघटनात्मक कामकाज, पक्षातील गटबाजीमुळे हेंमत गोडसें नाराज
-
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करणे आवश्यक असताना पक्ष पातळीवर सुसूत्रता नसल्याने नाराज असल्याची माहिती
लोकसभा निवडणुकीच्या पराभव नंतर गोडसे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी अद्यापही दिली नसल्याने गोडसें गोडसेंच्या गोटात अस्वस्थता आहे
संघटनात्मक रचनेच्या मुद्यावर नाराज असल्यानं हेंमत गोडसें पुढे काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे
रायगड जिल्ह्यात काल दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं यानंतर काही भागात जनजीवन विस्कळून पडले होत. नागोठणे रोहा राज्य मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प पडली होती ही दरड देखील हटवण्यात आल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्व पदावर आली आहेत. शिवाय मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी साचलेलं पाणी सुद्धा ओसरल्यानं महामार्गावरीची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. काल सुट्टी देण्यात आलेल्या शाळा आज नेहमीप्रमाणे सुरू असणार आहे.म्हसळा तालुक्यातील ढोरजे पूल काल दिवसभर पाण्याखाली होता मात्र आज या पुलावरचे पाणी देखील पावसाचा जोर कमी झाल्याने ओसरला आहे. एकंदरीत काल रायगड जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला होता आज पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतय. काल 85.56 mm पावसाची नोंद संध्याकाळ पर्यंत करण्यात आली होती. पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या प्रामुख्याने ज्या नद्या आहेत त्या सुध्दा इशारा पातळीच्या आतमध्ये असून नागरिकांना एकंदरीत दिलासा मिळाला आहे.
परळी मधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 18 महिने उलटूनही आरोपी निष्पन्न होत नसल्याने मुंडे कुटुंबाने न्यायासाठी टोकाचा इशारा दिला.दरम्यान विजयसिंह बाळा बांगर परळीतील मयत व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.याआधीच महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात विजयसिंह बाळा बांगर यांचा जवाब पोलिसांनी नोंदवला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनीती ठरणार
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट, अखेर जयंत पाटील पायउतार, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष... तर रोहित पवारांनाही लवकरच पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यास उरले अवघे तीन दिवस, विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का याकडे लक्ष
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक